शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

१९९ बोटी अद्याप रायगडात परतल्या नाहीत, ‘ओखी’च्या चक्रव्यूहामध्ये अडकण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 12:53 AM

‘ओखी’ वादळाने केरळ आणि तामिळनाडू राज्यांना चांगलाच तडाखा देत, हाहाकार उडवल्यानंतर आता ते महाराष्ट्राच्या दिशेन घोंघावत निघाले आहे.

आविष्कार देसाईअलिबाग : ‘ओखी’ वादळाने केरळ आणि तामिळनाडू राज्यांना चांगलाच तडाखा देत, हाहाकार उडवल्यानंतर आता ते महाराष्ट्राच्या दिशेन घोंघावत निघाले आहे. सोमवार, मंगळवार असे सलग दोन दिवस हे वादळ तेथे थैमान घालणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याचा फटका कोकणसह मुंबईलाही बसणार आहे. कोकणातील रायगड जिल्ह्यातील २५० मच्छीमार बोटींपैकी १९९ बोटी खोल समुद्रामध्ये मासेमारीसाठी गेल्याने त्या अद्याप परतलेल्या नाहीत. त्या बोटी लवकर परत न आल्यास ओखीच्या चक्रव्यूहामध्ये अडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.केरळ आणि तामिळनाडू राज्यामध्ये ‘ओखी’ वादळामुळे आतापर्यंत १४ जणांचा बळी गेला आहे. महाराष्ट्राच्या दिशेने ताशी ६० किलोमीटर वेगाने निघालेले हे वादळ कोकणासह मुंबईत सोमवार आणि मंगळवार या दिवशी घोंघावणार आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन तसेच तटरक्षक दलाने गोव्यापासून डहाणूपर्यंत हाय अलर्ट जारी केला आहे.रायगड जिल्ह्यामध्ये तब्बल एक हजार ९८३ यांत्रिक बोटी आहेत, तर बिगरयांत्रिक बोटींची संख्याही १११ आहे. २५० बोटी या मासेमारी करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच खोल समुद्रामध्ये गेल्या आहेत. त्यापैकी १९९ बोटी समुद्रामध्येच आहेत. त्यांना माघारी बोलावण्यासाठी संदेश पाठवले आहेत. मात्र, ते अद्यापही परतले नाहीत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच गुजरात राज्यापर्यंत मासेमारी करण्यासाठी येथून बोटी जातात. अचानक ओखीने तडाखा दिल्याने समुद्रामध्ये अडकलेल्या बोटींवरील खलाशांसह कर्मचाºयांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. रायगड जिल्ह्यातील सुमारे १३० बोंटीवरच वायरलेस यंत्रणा बसवण्यात आलेली आहे. खोल समुद्रात बोटी असल्याने मोबाइलवर संपर्क साधणे कठीण जात आहे. त्यामुळे ज्या बोटींना ओखीच्या तडाख्याचा संदेश प्राप्त झाला आहे. त्यांच्यामार्फत उर्वरित बोटींना संदेश पोहोचण्याची वाट बघण्यावाचून काहीच पर्याय प्रशासनाकडे राहिलेला नाही.सोमवारपासून पुढील ४८ तास जिल्ह्यासाठी हाय अलर्ट देण्यात आला आहे. समुद्रामध्ये जाण्यास तसेच मासेमारी करण्यास मनाई करण्यात आली आहे. या कालावधीमध्ये समुद्र खवळलेला राहणार आहे, तसेच पाऊसही पडण्याची शक्यता आहे. तापमानात वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे.- सागर पाठक,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, रायगडताशी ६० किलोमीटर वेगाने निघालेले वादळ कोकणात सोमवार, मंगळवारी घोंघावणारहवामान खात्याने ओखी वादळासंदर्भात दिलेल्या इशाºयानंतर रायगडमधील सर्व मच्छीमार संस्थांना सर्तकतेच्या सूचना दिल्या आहेत. रायगडच्या समुद्रामध्ये २५० बोटी या मासेमारी करण्यासाठी गेल्या आहेत. त्यातील ५१ परत आल्या आहेत, तर १९९ बोटी अद्यापही समुद्रामध्ये आहेत. त्यांच्याशी संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. समुद्रामध्ये मासेमारी करण्यास मज्जाव केला आहे. समुद्रकिनारी राहणाºया नागरिकांनीही सतर्क राहावे.- अविनाश नाखवा, सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय‘ओखी’च्या तडाख्यामुळे पुढील तीन दिवस समुद्र खवळलेला असल्याने समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे समुद्रकिनारी असलेली घरे, हॉटेल्स, कॉटेज यांनीही दक्ष राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.१रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे ८० मच्छीमार संस्था आहेत. त्यांच्याकडे छोट्या-मोठ्या अशा एकूण एक हजार ९८३ बोटी आहेत. सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय विभागाने त्यांचा एक वॉटस् अ‍ॅप ग्रुप तयार केला आहे. त्यांच्यामार्फतही त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शक्य होईल तेवढ्या लवकर माघारी येण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. २रायगड जिल्ह्यामध्ये विशेष करून अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. पर्यटकांच्या मनोरंजनासाठी समुद्र सफरीसाठी तैनात केलेल्या स्पीड बोटी, बनना बोट, एटीव्ही असे विविध साहित्य समुद्रकिनाºयावरून हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, असे अलिबाग बीच स्पीड बोटिंग क्लबचे प्रकाश भगत यांनी सांगितले. 

टॅग्स :fishermanमच्छीमार