शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
3
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
4
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
5
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
6
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
7
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
8
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
9
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
10
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
11
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
12
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
13
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
14
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
15
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
16
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
17
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
18
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
19
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
20
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला

रायगडमधील १५०० गावे अद्याप अंधारातच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 02:50 IST

चार दिवसांपासून नागरिकांचे हाल : १४ हजार विजेचे खांब पडल्याने मोठा फटका

आविष्कार देसाई ।

अलिबाग : निसर्ग चक्रीवादळानेरायगड जिल्ह्याला जबरदस्त तडाखा दिल्याने केवळ दोनच तासांत होत्याचे नव्हते झाले. वादळाचा विध्वंस इतका भयानक होता, की लाखो घरे पत्यांंप्रमाणे कोलमडून जमीनदोस्त झाली. १४ हजार विजेचे खांब जमिनीतून उखडून बाहेर आले आहेत. अद्याप १५०० गावांमध्ये वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. अन्नधान्य आणि पाण्यावाचून नागरिकांचे हाल होत आहेत. सरकारने तातडीने याची दखल घेत रायगडचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यास युध्दपातळीवर काम करण्याची अपेक्षा व्यक्तहोत आहे.

सरकारने रायगडकरांच्या जखमेवर १०० कोटी रुपयांची फुंकर घातली असली, तर रायगडाला पूर्वपदावर यायला बराच अवधी लागणार आहे. तब्बल सव्वाशे वर्षांनी चक्रीवादळाने रायगडला पुन्हा एकदा जबरदस्त आघात केला आहे. वादळाचा तडाखा इतका भयानक होती की, प्रामुख्याने अलिबाग, मुरुड, पेण, रोहे, श्रीवर्धन, माणगाव, म्हसळा या सात तालक्यासह तळा, पोलादपूर, सुधागड, महाड, खालापूर, कर्जत, उरण, पनवेल तालुक्यातील हजारो घरे जमिनदोस्त झाली. घरांचे पत्रे, घरांचे छप्पर कापसासारखे वादळात उडून गेले. दोन तासांच्या वादळी तांडवामुळे विजेचे पोल जमिनीतून उखडून खाली कोसळले. विजेच्या तारांवर महाकाय वृक्ष पडल्याने त्या जमिनीवर लोंबकळू लागल्या. सोसाट्यांचा वारा आणि सोबतीला जोरदार पावसामुळे निसर्गाच्या रौद्ररुपाचे दर्शन अंगावर काटा उभे करणारे होते. काही ठिकाणी शाळांच्या इमारतीही पडल्या आहेत.वादळानंतर जिल्ह्यातील नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत. त्यांनी घराबाहेर पडत वादळाने आणलेला प्रलय आपल्या डोळ्यांनी पाहिला. कोणाच्या घरांचे छप्पर उडाले, तर कोणाची घरे जमीनदोस्त झाली होती. गोठे पावसाच्या पाण्यात वाहून गेले होते. नुकसानग्रस्तांपैकी कोणी घरे गमावली, काहींनी घरांचे छप्पर काहींनी तर आपल्या कुटूंबातील व्यक्ती गमावल्या. आता मदतकार्य सुरू आहे. पण पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू आहे. शहरे आणि निमशहरांमध्ये सोसायट्यांनी जनरेटर भाड्याने आणून पाणी इमारतीवरील टाकीत सोडले आहे. त्यामुळे तेथील प्रश्न मिटला आहे. लाईट नसल्याने मोबाइल बंद, मोबाईल टॉवरही बंद असल्याने अद्यापही संपर्क साधण्यासाठी प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे.आर्थिक उत्पन्नाचे साधन नाहीच्वादळानंतर सामानाची आवरा-आवर सुर करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरु आहे. जमिनदोस्त झालेली घरे पुन्हा उभी करणे हे त्यांच्या समोर फार मोठे आव्हान आहे. घरातील असलेले अन्न-धान्य भिजल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.च्सर्वसामान्यांचे उद्योगधंदे, व्यवसाय वादळामुळे बंद झाले आहेत. आर्थिक उत्पन्नाचे कोणतेच साधन उपलब्ध नाही. त्यामुळे सरकारने या नुकसानग्रस्तांच्या हिताचे निर्णय तातडीने घेणे गरजेचे आहे.३१६ गावांमध्ये वीज सुरळीतजिल्ह्यात एकूण एक लाख ११ हजार ४३२ घरांची पडझड झाली आहे, तर १४ हजार ७०५ विजेचे पोल, तारा पडल्या आहेत. १९०५ गावांमध्ये वीज खंडीत झाली होती, त्यापैकी ३१६ गावांमध्ये पुन्हा वीज सुरू करण्यात प्रशासनाला यश आले आहे. मात्र , १५८९ उर्वरीत गावे अद्यापही अंधारातच चाचपडत आहेत.निसर्ग चक्रीवादळामुळे घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विजेचे खांब, वीज वाहक तारा यांचेही नुकसान झाले आहे. शेती, बागायतींना मोठा फटका बसला आहे. नुकसानीचे पंचनामे सुरु करण्याची प्रक्रीया युध्दपातळीवर करण्यात आली आहे.- पद्मश्री बैनाडे, निवासी उपजिल्हाधिकारी

टॅग्स :Raigadरायगडcycloneचक्रीवादळ