शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमधील १५०० गावे अद्याप अंधारातच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 02:50 IST

चार दिवसांपासून नागरिकांचे हाल : १४ हजार विजेचे खांब पडल्याने मोठा फटका

आविष्कार देसाई ।

अलिबाग : निसर्ग चक्रीवादळानेरायगड जिल्ह्याला जबरदस्त तडाखा दिल्याने केवळ दोनच तासांत होत्याचे नव्हते झाले. वादळाचा विध्वंस इतका भयानक होता, की लाखो घरे पत्यांंप्रमाणे कोलमडून जमीनदोस्त झाली. १४ हजार विजेचे खांब जमिनीतून उखडून बाहेर आले आहेत. अद्याप १५०० गावांमध्ये वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. अन्नधान्य आणि पाण्यावाचून नागरिकांचे हाल होत आहेत. सरकारने तातडीने याची दखल घेत रायगडचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यास युध्दपातळीवर काम करण्याची अपेक्षा व्यक्तहोत आहे.

सरकारने रायगडकरांच्या जखमेवर १०० कोटी रुपयांची फुंकर घातली असली, तर रायगडाला पूर्वपदावर यायला बराच अवधी लागणार आहे. तब्बल सव्वाशे वर्षांनी चक्रीवादळाने रायगडला पुन्हा एकदा जबरदस्त आघात केला आहे. वादळाचा तडाखा इतका भयानक होती की, प्रामुख्याने अलिबाग, मुरुड, पेण, रोहे, श्रीवर्धन, माणगाव, म्हसळा या सात तालक्यासह तळा, पोलादपूर, सुधागड, महाड, खालापूर, कर्जत, उरण, पनवेल तालुक्यातील हजारो घरे जमिनदोस्त झाली. घरांचे पत्रे, घरांचे छप्पर कापसासारखे वादळात उडून गेले. दोन तासांच्या वादळी तांडवामुळे विजेचे पोल जमिनीतून उखडून खाली कोसळले. विजेच्या तारांवर महाकाय वृक्ष पडल्याने त्या जमिनीवर लोंबकळू लागल्या. सोसाट्यांचा वारा आणि सोबतीला जोरदार पावसामुळे निसर्गाच्या रौद्ररुपाचे दर्शन अंगावर काटा उभे करणारे होते. काही ठिकाणी शाळांच्या इमारतीही पडल्या आहेत.वादळानंतर जिल्ह्यातील नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत. त्यांनी घराबाहेर पडत वादळाने आणलेला प्रलय आपल्या डोळ्यांनी पाहिला. कोणाच्या घरांचे छप्पर उडाले, तर कोणाची घरे जमीनदोस्त झाली होती. गोठे पावसाच्या पाण्यात वाहून गेले होते. नुकसानग्रस्तांपैकी कोणी घरे गमावली, काहींनी घरांचे छप्पर काहींनी तर आपल्या कुटूंबातील व्यक्ती गमावल्या. आता मदतकार्य सुरू आहे. पण पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू आहे. शहरे आणि निमशहरांमध्ये सोसायट्यांनी जनरेटर भाड्याने आणून पाणी इमारतीवरील टाकीत सोडले आहे. त्यामुळे तेथील प्रश्न मिटला आहे. लाईट नसल्याने मोबाइल बंद, मोबाईल टॉवरही बंद असल्याने अद्यापही संपर्क साधण्यासाठी प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे.आर्थिक उत्पन्नाचे साधन नाहीच्वादळानंतर सामानाची आवरा-आवर सुर करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरु आहे. जमिनदोस्त झालेली घरे पुन्हा उभी करणे हे त्यांच्या समोर फार मोठे आव्हान आहे. घरातील असलेले अन्न-धान्य भिजल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.च्सर्वसामान्यांचे उद्योगधंदे, व्यवसाय वादळामुळे बंद झाले आहेत. आर्थिक उत्पन्नाचे कोणतेच साधन उपलब्ध नाही. त्यामुळे सरकारने या नुकसानग्रस्तांच्या हिताचे निर्णय तातडीने घेणे गरजेचे आहे.३१६ गावांमध्ये वीज सुरळीतजिल्ह्यात एकूण एक लाख ११ हजार ४३२ घरांची पडझड झाली आहे, तर १४ हजार ७०५ विजेचे पोल, तारा पडल्या आहेत. १९०५ गावांमध्ये वीज खंडीत झाली होती, त्यापैकी ३१६ गावांमध्ये पुन्हा वीज सुरू करण्यात प्रशासनाला यश आले आहे. मात्र , १५८९ उर्वरीत गावे अद्यापही अंधारातच चाचपडत आहेत.निसर्ग चक्रीवादळामुळे घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विजेचे खांब, वीज वाहक तारा यांचेही नुकसान झाले आहे. शेती, बागायतींना मोठा फटका बसला आहे. नुकसानीचे पंचनामे सुरु करण्याची प्रक्रीया युध्दपातळीवर करण्यात आली आहे.- पद्मश्री बैनाडे, निवासी उपजिल्हाधिकारी

टॅग्स :Raigadरायगडcycloneचक्रीवादळ