शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

महसूलचे ११३ कर्मचारी बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 00:21 IST

८३ जण उपचारानंतर झाले बरे : रायगडमध्ये प्रादुर्भाव वाढत असला, तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक

निखिल म्हात्रे।लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, सरकारी कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने बाधित होत आहेत. महसूल खात्यात आजपर्यंत ११३ रुग्ण आढळले असून, ८६ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. २६ जण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर एका नायब तहसीलदारांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असला, तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रहिवासी क्षेत्रातील नागरिकांसह डॉक्टर, नर्स, पोलीस कर्मचारी सफाई कामगार व इतर कोरोना योद्ध्यांनाही कोरोना विषाणूची लागण झाली, परंतु कोरोनाने आपला मोर्चा शासकीय कार्यालयांकडे वळविला असून, शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी कोरोना विषाणूच्या दुष्ट चक्रात सापडत आहेत. कोरोना संसर्ग व त्याच्या साखळी तोडण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्याची बाधा होत असल्याने आता संसर्गाचा धोका वाढत चालला आहे.लॉकडाऊन कालावधीत नागरिकांची कामे कामे ताटकळत न राहण्यासाठी, तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आरोग्य व पोलीस यंत्रणेसह महसूल विभाग अहोरात्र मेहनत घेत होता. अडकलेल्या नागरिकांना स्थलांतर करण्याचे कामही महसूल विभागाने जवळून केल्याने त्यांना संसर्गाला सामोरे जावे लागले आहे. आणखीही महसूलचे कर्मचारी नागरिकांच्या सेवेत आहेत.नागरिकांबरोबर शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी स्वत:ची काळजी घेण अत्यावश्यक आहे. कार्यालयात सोशल डिस्टंन्सचे पालन करून काम करणे गरजेचे आहे. कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची घेण्यासाठी स्वॅब टेस्ट, अ‍ॅन्टिजन टेस्ट घेण्यात आल्या आहेत, तसेच प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सी-व्हिटॅमिन टॅबलेट, मास्क व सॅनिटायजरही पुरविण्यात आले.- निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगडनागरिकांनाचा निष्काळजीपणा घातक : महसूल अधिकारी व कर्मचाºयांमध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण अधिक असले, तरी बरे होण़्याचे प्रमाणही वाढले आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी त्याची साखळी तोडण्यासाठी आरोग्य प्रशासनासह जिल्हा प्रशासन अहोरात्र मेहनत करीत आहे. मात्र, नागरिकांनाचा निष्काळजीपणा घातक ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेऊनच काम करणे अत्यावश्यक आहे.नायब तहसीलदारांचा मृत्यूरायगड जिल्ह्यात आतापर्यंत २ प्रांताधिकारी, १ तहसीलदार, ४ नायब तहसीलदार, २८ तलाठी, १ लघू लेखक, २८ लिपिक, १६ अव्वल कारकून, ४ चालक, १४ शिपाई, ६ मंडळ अधिकारी, ६ कोतवाल, २ सफाई कामगार असे एकूण ११३ रुग्ण आढळले असून, ८६ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. २६ जण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर १ नायब तहसीलदारांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस