शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

महसूलचे ११३ कर्मचारी बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 00:21 IST

८३ जण उपचारानंतर झाले बरे : रायगडमध्ये प्रादुर्भाव वाढत असला, तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक

निखिल म्हात्रे।लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, सरकारी कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने बाधित होत आहेत. महसूल खात्यात आजपर्यंत ११३ रुग्ण आढळले असून, ८६ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. २६ जण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर एका नायब तहसीलदारांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असला, तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रहिवासी क्षेत्रातील नागरिकांसह डॉक्टर, नर्स, पोलीस कर्मचारी सफाई कामगार व इतर कोरोना योद्ध्यांनाही कोरोना विषाणूची लागण झाली, परंतु कोरोनाने आपला मोर्चा शासकीय कार्यालयांकडे वळविला असून, शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी कोरोना विषाणूच्या दुष्ट चक्रात सापडत आहेत. कोरोना संसर्ग व त्याच्या साखळी तोडण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्याची बाधा होत असल्याने आता संसर्गाचा धोका वाढत चालला आहे.लॉकडाऊन कालावधीत नागरिकांची कामे कामे ताटकळत न राहण्यासाठी, तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आरोग्य व पोलीस यंत्रणेसह महसूल विभाग अहोरात्र मेहनत घेत होता. अडकलेल्या नागरिकांना स्थलांतर करण्याचे कामही महसूल विभागाने जवळून केल्याने त्यांना संसर्गाला सामोरे जावे लागले आहे. आणखीही महसूलचे कर्मचारी नागरिकांच्या सेवेत आहेत.नागरिकांबरोबर शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी स्वत:ची काळजी घेण अत्यावश्यक आहे. कार्यालयात सोशल डिस्टंन्सचे पालन करून काम करणे गरजेचे आहे. कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची घेण्यासाठी स्वॅब टेस्ट, अ‍ॅन्टिजन टेस्ट घेण्यात आल्या आहेत, तसेच प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सी-व्हिटॅमिन टॅबलेट, मास्क व सॅनिटायजरही पुरविण्यात आले.- निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगडनागरिकांनाचा निष्काळजीपणा घातक : महसूल अधिकारी व कर्मचाºयांमध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण अधिक असले, तरी बरे होण़्याचे प्रमाणही वाढले आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी त्याची साखळी तोडण्यासाठी आरोग्य प्रशासनासह जिल्हा प्रशासन अहोरात्र मेहनत करीत आहे. मात्र, नागरिकांनाचा निष्काळजीपणा घातक ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेऊनच काम करणे अत्यावश्यक आहे.नायब तहसीलदारांचा मृत्यूरायगड जिल्ह्यात आतापर्यंत २ प्रांताधिकारी, १ तहसीलदार, ४ नायब तहसीलदार, २८ तलाठी, १ लघू लेखक, २८ लिपिक, १६ अव्वल कारकून, ४ चालक, १४ शिपाई, ६ मंडळ अधिकारी, ६ कोतवाल, २ सफाई कामगार असे एकूण ११३ रुग्ण आढळले असून, ८६ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. २६ जण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर १ नायब तहसीलदारांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस