शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

अद्यापही १०७ ग्रामस्थ बेपत्ता, २२ जणांचा मृत्यू; डोंगरानं पायथ्याचं गाव गिळलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 09:37 IST

जिल्हाधिकारी; निर्वासितांचा मुक्काम वर्षभर कंटेनरमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्क

अलिबाग : खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावातील ४६ घरांपैकी सतरा ते अठरा घरांवर दरड कोसळली आहे. या वाडीत २३१ नागरिक होते. दुर्घटनेत आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. ६७ नागरिकांना निवारा केंद्रात ठेवले असून, १०७ जण बेपत्ता आहेत. ८ जखमींवर एमजीएम व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निर्वासितांची वर्षभर राहण्याची सोय कंटेनरमध्ये करण्यात येणार आहे

आतापर्यंत १०२ जणांचा शोध लागला आहे. इर्शाळवाडी गावातील नागरिकांसाठी तात्पुरती ३२ कंटेनर घरे सर्व सुविधांसह उपलब्ध करून देण्यात आली आहेत. निर्वासित झालेले आणि मृत कुटुंबांच्या वारसांसाठी चौक येथे जागा प्रस्तावित केली असून, शासनाकडे प्रस्ताव पाठविणार असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

इर्शाळवाडी दरड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या उपाययोजना, बचाव मोहीम, निर्वासित झालेल्या कुटुंबांची केलेली व्यवस्था आदींबाबत जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी माहिती दिली. इर्शाळवाडी गावातील १०२ जणांची आतापर्यंत ओळख पटलेली आहे. १०७ ग्रामस्थ बेपत्ता आहेत. काही जण नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेर आहेत. काही नातेवाइकांकडे गेली आहेत. तसेच काही विद्यार्थी हे आश्रमशाळेत आहेत. त्यांचा शोध प्रशासनातर्फे घेतला जात आहे. ६७ जणांना शाळेत ठेवले आहे. त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था केली आहे. एक हजार जण मदतकार्य करीत असल्याची जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी माहिती दिली. 

कायमस्वरूपी वसाहतीसाठी जागा प्रस्तावितचौक हद्दीतील सर्व्हे नंबर २७ ही शासकीय जागा इर्शाळवाडी ग्रामस्थांच्या कायमस्वरूपी वसाहतीसाठी प्रस्तावित करण्यात आलेली आहे. घरे बांधून देण्याबाबत सिडकोसोबत बोलणी शासन, प्रशासन स्तरावर केली जाणार आहेत. मदत व पुनर्वसन विभागामार्फत प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.     - डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी, रायगड

औषध फवारणीइर्शाळवाडीची दुर्घटना होऊन ३० तासांहून अधिक कालावधी लोटल्याने शुक्रवारी परिसरात दुर्गंधी सुटली. सध्या शोधमोहीम सुरू असल्याने हजारो जण याठिकाणी मदतकार्य करीत आहेत. दुर्गंधीमुळे रोगराई पसरू नये, यासाठी परिसरात आरोग्य विभागातर्फे औषध फवारणी करण्यात आली आहे.

अशी असेल व्यवस्थाn मुंबई-पुणे जुन्या महामार्गालगत असलेल्या जागेत ३२ कंटेनर घरांची वसाहत उभारली गेली आहे. वीज आणि पाण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. n कंटेनरमध्ये घरात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू, कपडे, गृहोपयोगी वस्तूंसह सोयीयुक्त साहित्य भरून दिले जाणार आहे. तसेच २० शौचालय, २० स्वच्छतागृह सुविधाही उपलब्ध केली आहे. n शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि शालोपयोगी वस्तूंचा खर्च प्रशासनातर्फे केला जाणार आहे.

अधिकारी सतर्क असल्याने, यंत्रणा वेळेवर घटनास्थळीहवामान विभागाने जिल्ह्याला मंगळवार, बुधवार दोन दिवस रेड अलर्ट जाहीर केला होता. कोणतीही नैसर्गिक आपत्ती ओढवली तर अधिकारी सतर्क असावेत, यासाठी बुधवारी सर्व अधिकाऱ्यांनी जागे राहण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. अधिकारी जागे राहावेत म्हणून रात्री अकरा आणि एक वाजता व्हीसी ठेवण्यात आली होती. त्यामुळे सर्व अधिकारी सतर्क होते. इर्शाळवाडी येथे दुर्घटना घडल्याचे कळल्यानंतर खालापूर प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.

टॅग्स :RainपाऊसRaigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरण