शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

अद्यापही १०७ ग्रामस्थ बेपत्ता, २२ जणांचा मृत्यू; डोंगरानं पायथ्याचं गाव गिळलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 09:37 IST

जिल्हाधिकारी; निर्वासितांचा मुक्काम वर्षभर कंटेनरमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्क

अलिबाग : खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावातील ४६ घरांपैकी सतरा ते अठरा घरांवर दरड कोसळली आहे. या वाडीत २३१ नागरिक होते. दुर्घटनेत आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. ६७ नागरिकांना निवारा केंद्रात ठेवले असून, १०७ जण बेपत्ता आहेत. ८ जखमींवर एमजीएम व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निर्वासितांची वर्षभर राहण्याची सोय कंटेनरमध्ये करण्यात येणार आहे

आतापर्यंत १०२ जणांचा शोध लागला आहे. इर्शाळवाडी गावातील नागरिकांसाठी तात्पुरती ३२ कंटेनर घरे सर्व सुविधांसह उपलब्ध करून देण्यात आली आहेत. निर्वासित झालेले आणि मृत कुटुंबांच्या वारसांसाठी चौक येथे जागा प्रस्तावित केली असून, शासनाकडे प्रस्ताव पाठविणार असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

इर्शाळवाडी दरड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या उपाययोजना, बचाव मोहीम, निर्वासित झालेल्या कुटुंबांची केलेली व्यवस्था आदींबाबत जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी माहिती दिली. इर्शाळवाडी गावातील १०२ जणांची आतापर्यंत ओळख पटलेली आहे. १०७ ग्रामस्थ बेपत्ता आहेत. काही जण नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेर आहेत. काही नातेवाइकांकडे गेली आहेत. तसेच काही विद्यार्थी हे आश्रमशाळेत आहेत. त्यांचा शोध प्रशासनातर्फे घेतला जात आहे. ६७ जणांना शाळेत ठेवले आहे. त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था केली आहे. एक हजार जण मदतकार्य करीत असल्याची जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी माहिती दिली. 

कायमस्वरूपी वसाहतीसाठी जागा प्रस्तावितचौक हद्दीतील सर्व्हे नंबर २७ ही शासकीय जागा इर्शाळवाडी ग्रामस्थांच्या कायमस्वरूपी वसाहतीसाठी प्रस्तावित करण्यात आलेली आहे. घरे बांधून देण्याबाबत सिडकोसोबत बोलणी शासन, प्रशासन स्तरावर केली जाणार आहेत. मदत व पुनर्वसन विभागामार्फत प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.     - डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी, रायगड

औषध फवारणीइर्शाळवाडीची दुर्घटना होऊन ३० तासांहून अधिक कालावधी लोटल्याने शुक्रवारी परिसरात दुर्गंधी सुटली. सध्या शोधमोहीम सुरू असल्याने हजारो जण याठिकाणी मदतकार्य करीत आहेत. दुर्गंधीमुळे रोगराई पसरू नये, यासाठी परिसरात आरोग्य विभागातर्फे औषध फवारणी करण्यात आली आहे.

अशी असेल व्यवस्थाn मुंबई-पुणे जुन्या महामार्गालगत असलेल्या जागेत ३२ कंटेनर घरांची वसाहत उभारली गेली आहे. वीज आणि पाण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. n कंटेनरमध्ये घरात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू, कपडे, गृहोपयोगी वस्तूंसह सोयीयुक्त साहित्य भरून दिले जाणार आहे. तसेच २० शौचालय, २० स्वच्छतागृह सुविधाही उपलब्ध केली आहे. n शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि शालोपयोगी वस्तूंचा खर्च प्रशासनातर्फे केला जाणार आहे.

अधिकारी सतर्क असल्याने, यंत्रणा वेळेवर घटनास्थळीहवामान विभागाने जिल्ह्याला मंगळवार, बुधवार दोन दिवस रेड अलर्ट जाहीर केला होता. कोणतीही नैसर्गिक आपत्ती ओढवली तर अधिकारी सतर्क असावेत, यासाठी बुधवारी सर्व अधिकाऱ्यांनी जागे राहण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. अधिकारी जागे राहावेत म्हणून रात्री अकरा आणि एक वाजता व्हीसी ठेवण्यात आली होती. त्यामुळे सर्व अधिकारी सतर्क होते. इर्शाळवाडी येथे दुर्घटना घडल्याचे कळल्यानंतर खालापूर प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.

टॅग्स :RainपाऊसRaigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरण