शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

अद्यापही १०७ ग्रामस्थ बेपत्ता, २२ जणांचा मृत्यू; डोंगरानं पायथ्याचं गाव गिळलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 09:37 IST

जिल्हाधिकारी; निर्वासितांचा मुक्काम वर्षभर कंटेनरमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्क

अलिबाग : खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावातील ४६ घरांपैकी सतरा ते अठरा घरांवर दरड कोसळली आहे. या वाडीत २३१ नागरिक होते. दुर्घटनेत आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. ६७ नागरिकांना निवारा केंद्रात ठेवले असून, १०७ जण बेपत्ता आहेत. ८ जखमींवर एमजीएम व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निर्वासितांची वर्षभर राहण्याची सोय कंटेनरमध्ये करण्यात येणार आहे

आतापर्यंत १०२ जणांचा शोध लागला आहे. इर्शाळवाडी गावातील नागरिकांसाठी तात्पुरती ३२ कंटेनर घरे सर्व सुविधांसह उपलब्ध करून देण्यात आली आहेत. निर्वासित झालेले आणि मृत कुटुंबांच्या वारसांसाठी चौक येथे जागा प्रस्तावित केली असून, शासनाकडे प्रस्ताव पाठविणार असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

इर्शाळवाडी दरड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या उपाययोजना, बचाव मोहीम, निर्वासित झालेल्या कुटुंबांची केलेली व्यवस्था आदींबाबत जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी माहिती दिली. इर्शाळवाडी गावातील १०२ जणांची आतापर्यंत ओळख पटलेली आहे. १०७ ग्रामस्थ बेपत्ता आहेत. काही जण नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेर आहेत. काही नातेवाइकांकडे गेली आहेत. तसेच काही विद्यार्थी हे आश्रमशाळेत आहेत. त्यांचा शोध प्रशासनातर्फे घेतला जात आहे. ६७ जणांना शाळेत ठेवले आहे. त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था केली आहे. एक हजार जण मदतकार्य करीत असल्याची जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी माहिती दिली. 

कायमस्वरूपी वसाहतीसाठी जागा प्रस्तावितचौक हद्दीतील सर्व्हे नंबर २७ ही शासकीय जागा इर्शाळवाडी ग्रामस्थांच्या कायमस्वरूपी वसाहतीसाठी प्रस्तावित करण्यात आलेली आहे. घरे बांधून देण्याबाबत सिडकोसोबत बोलणी शासन, प्रशासन स्तरावर केली जाणार आहेत. मदत व पुनर्वसन विभागामार्फत प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.     - डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी, रायगड

औषध फवारणीइर्शाळवाडीची दुर्घटना होऊन ३० तासांहून अधिक कालावधी लोटल्याने शुक्रवारी परिसरात दुर्गंधी सुटली. सध्या शोधमोहीम सुरू असल्याने हजारो जण याठिकाणी मदतकार्य करीत आहेत. दुर्गंधीमुळे रोगराई पसरू नये, यासाठी परिसरात आरोग्य विभागातर्फे औषध फवारणी करण्यात आली आहे.

अशी असेल व्यवस्थाn मुंबई-पुणे जुन्या महामार्गालगत असलेल्या जागेत ३२ कंटेनर घरांची वसाहत उभारली गेली आहे. वीज आणि पाण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. n कंटेनरमध्ये घरात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू, कपडे, गृहोपयोगी वस्तूंसह सोयीयुक्त साहित्य भरून दिले जाणार आहे. तसेच २० शौचालय, २० स्वच्छतागृह सुविधाही उपलब्ध केली आहे. n शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि शालोपयोगी वस्तूंचा खर्च प्रशासनातर्फे केला जाणार आहे.

अधिकारी सतर्क असल्याने, यंत्रणा वेळेवर घटनास्थळीहवामान विभागाने जिल्ह्याला मंगळवार, बुधवार दोन दिवस रेड अलर्ट जाहीर केला होता. कोणतीही नैसर्गिक आपत्ती ओढवली तर अधिकारी सतर्क असावेत, यासाठी बुधवारी सर्व अधिकाऱ्यांनी जागे राहण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. अधिकारी जागे राहावेत म्हणून रात्री अकरा आणि एक वाजता व्हीसी ठेवण्यात आली होती. त्यामुळे सर्व अधिकारी सतर्क होते. इर्शाळवाडी येथे दुर्घटना घडल्याचे कळल्यानंतर खालापूर प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.

टॅग्स :RainपाऊसRaigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरण