शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मासेमारी करणाऱ्या १० चिनी जहाजांची रत्नागिरी समुद्रात घुसखोरी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 05:13 IST

तटरक्षक दलामुळे प्रकार उघडकीस; सहा दिवस उलटून कारवाई नाही

आविष्कार देसाई 

अलिबाग : रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रामध्ये चिनी कंपनीच्या मासेमारी करणाºया १० जहाजांनी बेकायदा प्रवेश करून आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. दोन जहाजांनी ६ जून रोजी तर आठ जहाजांनी १२ जून रोजी रत्नागिरी समुद्रात १२ नॉटीकल माईल क्षेत्रात प्रवेश केला. यातील काही जहाजातून सॅटेलाइट फोनचा वापर करून संदेश वहन केले जात असल्याचे भारतीय तटरक्षक दलाला त्यांच्या रडारवर आढळल्याने चीनच्या जहाजांच्या घुसखोरीचा प्रयत्न उघडकीस आल्याचे सूत्रांनी सांगितले. तब्बल सहा दिवस झाले तरी अद्याप त्या जहाजांवर कोणतीच कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे. रत्नागिरी समुद्रात ती जहाजे सीज करण्यात आली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

फू युवान यू या चिनी कंपनीच्या २०० जहाज ताफा अरबी समुद्रातून फिशिंगसाठी निघाला होता. त्यातील १० जहाजांनी कायद्याचे उल्लंघन करत १२ नॉटीकल माइल क्षेत्रामध्ये प्रवेश केला. त्या जहाजांवर इंडोनेशिया आणि फिलीपाईन्स देशातील क्रू मेंबर असून त्यातील दोन जणांच्या पासपोर्टची मुदत संपल्याचे सांगितले जाते आहे. याबाबत रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. भारतीय तटरक्षक दलाचे रत्नागिरी जिल्ह्याचे प्रमुख अतुल दांडेकर यांच्याशी संपर्क साधला असता जिल्हाधिकाऱ्यांसोबत मिटिंगमध्ये असल्याचे सांगितले.चीन समुद्रावर अधिराज्य गाजवण्याच्या तयारीत असताना भारताला मात्र आपल्या आंतरराष्ट्रीय सीमा सुरक्षित करता आल्या नसल्याचे त्या निमित्ताने अधोरेखित होते.उद्देशावर प्रश्नचिन्ह२०० नॉटीकल माइलपर्यंत विविध देशातील जहाजांना समुद्रातून जाता येते, मात्र त्याच्या पुढे यायचे असल्यास संबंधित देशाची परवानगी घ्यावी लागते. तसेच दोन्ही देशाचे झेंडे जहाजावर लावणे बंधनकारक असते. मासेमारी करणाºया जहाजांना सॅटेलाइट फोन वापरण्याची परवानगी नसते. त्यामुळे चिनी जहाजे नेमक्या कोणत्या उद्देशासाठी भारतीय समुद्रात घुसले असा प्रश्न आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीboat clubबोट क्लबchinaचीनRaigadरायगड