शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मासेमारी करणाऱ्या १० चिनी जहाजांची रत्नागिरी समुद्रात घुसखोरी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 05:13 IST

तटरक्षक दलामुळे प्रकार उघडकीस; सहा दिवस उलटून कारवाई नाही

आविष्कार देसाई 

अलिबाग : रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रामध्ये चिनी कंपनीच्या मासेमारी करणाºया १० जहाजांनी बेकायदा प्रवेश करून आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. दोन जहाजांनी ६ जून रोजी तर आठ जहाजांनी १२ जून रोजी रत्नागिरी समुद्रात १२ नॉटीकल माईल क्षेत्रात प्रवेश केला. यातील काही जहाजातून सॅटेलाइट फोनचा वापर करून संदेश वहन केले जात असल्याचे भारतीय तटरक्षक दलाला त्यांच्या रडारवर आढळल्याने चीनच्या जहाजांच्या घुसखोरीचा प्रयत्न उघडकीस आल्याचे सूत्रांनी सांगितले. तब्बल सहा दिवस झाले तरी अद्याप त्या जहाजांवर कोणतीच कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे. रत्नागिरी समुद्रात ती जहाजे सीज करण्यात आली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

फू युवान यू या चिनी कंपनीच्या २०० जहाज ताफा अरबी समुद्रातून फिशिंगसाठी निघाला होता. त्यातील १० जहाजांनी कायद्याचे उल्लंघन करत १२ नॉटीकल माइल क्षेत्रामध्ये प्रवेश केला. त्या जहाजांवर इंडोनेशिया आणि फिलीपाईन्स देशातील क्रू मेंबर असून त्यातील दोन जणांच्या पासपोर्टची मुदत संपल्याचे सांगितले जाते आहे. याबाबत रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. भारतीय तटरक्षक दलाचे रत्नागिरी जिल्ह्याचे प्रमुख अतुल दांडेकर यांच्याशी संपर्क साधला असता जिल्हाधिकाऱ्यांसोबत मिटिंगमध्ये असल्याचे सांगितले.चीन समुद्रावर अधिराज्य गाजवण्याच्या तयारीत असताना भारताला मात्र आपल्या आंतरराष्ट्रीय सीमा सुरक्षित करता आल्या नसल्याचे त्या निमित्ताने अधोरेखित होते.उद्देशावर प्रश्नचिन्ह२०० नॉटीकल माइलपर्यंत विविध देशातील जहाजांना समुद्रातून जाता येते, मात्र त्याच्या पुढे यायचे असल्यास संबंधित देशाची परवानगी घ्यावी लागते. तसेच दोन्ही देशाचे झेंडे जहाजावर लावणे बंधनकारक असते. मासेमारी करणाºया जहाजांना सॅटेलाइट फोन वापरण्याची परवानगी नसते. त्यामुळे चिनी जहाजे नेमक्या कोणत्या उद्देशासाठी भारतीय समुद्रात घुसले असा प्रश्न आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीboat clubबोट क्लबchinaचीनRaigadरायगड