शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

मासेमारी करणाऱ्या १० चिनी जहाजांची रत्नागिरी समुद्रात घुसखोरी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 05:13 IST

तटरक्षक दलामुळे प्रकार उघडकीस; सहा दिवस उलटून कारवाई नाही

आविष्कार देसाई 

अलिबाग : रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रामध्ये चिनी कंपनीच्या मासेमारी करणाºया १० जहाजांनी बेकायदा प्रवेश करून आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. दोन जहाजांनी ६ जून रोजी तर आठ जहाजांनी १२ जून रोजी रत्नागिरी समुद्रात १२ नॉटीकल माईल क्षेत्रात प्रवेश केला. यातील काही जहाजातून सॅटेलाइट फोनचा वापर करून संदेश वहन केले जात असल्याचे भारतीय तटरक्षक दलाला त्यांच्या रडारवर आढळल्याने चीनच्या जहाजांच्या घुसखोरीचा प्रयत्न उघडकीस आल्याचे सूत्रांनी सांगितले. तब्बल सहा दिवस झाले तरी अद्याप त्या जहाजांवर कोणतीच कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे. रत्नागिरी समुद्रात ती जहाजे सीज करण्यात आली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

फू युवान यू या चिनी कंपनीच्या २०० जहाज ताफा अरबी समुद्रातून फिशिंगसाठी निघाला होता. त्यातील १० जहाजांनी कायद्याचे उल्लंघन करत १२ नॉटीकल माइल क्षेत्रामध्ये प्रवेश केला. त्या जहाजांवर इंडोनेशिया आणि फिलीपाईन्स देशातील क्रू मेंबर असून त्यातील दोन जणांच्या पासपोर्टची मुदत संपल्याचे सांगितले जाते आहे. याबाबत रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. भारतीय तटरक्षक दलाचे रत्नागिरी जिल्ह्याचे प्रमुख अतुल दांडेकर यांच्याशी संपर्क साधला असता जिल्हाधिकाऱ्यांसोबत मिटिंगमध्ये असल्याचे सांगितले.चीन समुद्रावर अधिराज्य गाजवण्याच्या तयारीत असताना भारताला मात्र आपल्या आंतरराष्ट्रीय सीमा सुरक्षित करता आल्या नसल्याचे त्या निमित्ताने अधोरेखित होते.उद्देशावर प्रश्नचिन्ह२०० नॉटीकल माइलपर्यंत विविध देशातील जहाजांना समुद्रातून जाता येते, मात्र त्याच्या पुढे यायचे असल्यास संबंधित देशाची परवानगी घ्यावी लागते. तसेच दोन्ही देशाचे झेंडे जहाजावर लावणे बंधनकारक असते. मासेमारी करणाºया जहाजांना सॅटेलाइट फोन वापरण्याची परवानगी नसते. त्यामुळे चिनी जहाजे नेमक्या कोणत्या उद्देशासाठी भारतीय समुद्रात घुसले असा प्रश्न आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीboat clubबोट क्लबchinaचीनRaigadरायगड