शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

तहसीलदारांची बदली रोखण्यासाठी एकवटले युवक, सोशल नेटवर्किंगवरून मोहीम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 00:27 IST

इंदापूर तालुक्यात वाळूमाफियांची पळताभुई थोडी करणारे तहसीलदार श्रीकांत पाटील यांची बदली झाल्यामुळे वाळूमाफियात उल्हासाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही वाळूमाफियांनी बोटीवरून फटाके वाजवीत जल्लोष व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भिगवण : इंदापूर तालुक्यात वाळूमाफियांची पळताभुई थोडी करणारे तहसीलदार श्रीकांत पाटील यांची बदली झाल्यामुळे वाळूमाफियात उल्हासाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही वाळूमाफियांनी बोटीवरून फटाके वाजवीत जल्लोष व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पाटील यांची बदली होण्यासाठी एक वर्षाचा कार्यकाळ शिल्लक असतानाही तरी देखील कार्यकाळ संपण्यापूर्वी झालेल्या बदलीमागे कोणाचा हात आहे, असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, या बदलीविरोधात स्थानिक तरुण एकवटले असून, बदली रद्द करण्यासाठी सोशल नेटवर्किंग साईट्सवर त्यांनी मोहीम राबबिली आहे.

‘ना खाउंगा ना खाने दुंगा’ या म्हणीचा वापर करीत दोन वर्षे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी उजनीमधील वाळूमाफियांना जेरीस आणले होते. उजनीतील काळे सोन्याची आस असणाऱ्यांच्या अनेकांचे डोळे दिपवीत तहसीलदारांनी कारवाई सुरूच ठेवत लाखो रुपयांचे वाळू उपसा करणारी साधनसामग्री नष्ट केली. तालुक्यातील पोलीस ठाण्याबाहेर वाळूवाहतूक करणाºया गाड्या त्यांनी जप्त केल्या होत्या. त्यांची बदली झाल्याचा निरोप मिळताच वाळूमाफियांनी आनंद व्यक्त केला. मात्र, सामान्य नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. बदलीला विरोध असल्याचे सांगत त्यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत बदली करू नये अशी मागणी केली आहे. तालुक्यातील १०० गावांतून तहसीलदार पाटील यांची बदली करू नये, अशी निवेदने मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांना पाठविली जाणार आहेत.अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संघटक तुषार झेंडे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांना मेल करून तहसीलदार यांची बदली रद्द करण्याची मागणी केली आहे. राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन यांच्या कार्यालयाने या मेलची दखल घेत पुढील कार्यवाहीसाठी प्रधान सचिव महसूल व वन विभाग मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे पाठविला असल्याची माहिती झेंडे पाटील यांनी दिली.साहेबांंची बदली रद्द करायचीच...तहसीलदार पाटील यांची बदली व्हावी यासाठी देव पाण्यात घालून बसलेल्या वाळूमाफिया आणि मुरूममाफियांच्या पाटील यांची बदली झाल्याने श्रावण महिन्यातच उजनी किनारी पार्ट्या रंगल्या. याबाबत परिसरात जोरदार चर्चा रंगली. तहसीलदार पाटील यांच्या मागे तालुक्यातील युवावर्गाने ताकद उभी केली आहे. ‘साहेबांची बदली रद्द करायचीच’ असा संदेश सोशल मीडियावर फिरत आहे. एकूणच तहसीलदारांच्या बदलीविरोधात जनमत उसळल्याने वाळूमाफिया मात्र धास्तावले आहेत.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया