शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

तहसीलदारांची बदली रोखण्यासाठी एकवटले युवक, सोशल नेटवर्किंगवरून मोहीम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 00:27 IST

इंदापूर तालुक्यात वाळूमाफियांची पळताभुई थोडी करणारे तहसीलदार श्रीकांत पाटील यांची बदली झाल्यामुळे वाळूमाफियात उल्हासाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही वाळूमाफियांनी बोटीवरून फटाके वाजवीत जल्लोष व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भिगवण : इंदापूर तालुक्यात वाळूमाफियांची पळताभुई थोडी करणारे तहसीलदार श्रीकांत पाटील यांची बदली झाल्यामुळे वाळूमाफियात उल्हासाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही वाळूमाफियांनी बोटीवरून फटाके वाजवीत जल्लोष व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पाटील यांची बदली होण्यासाठी एक वर्षाचा कार्यकाळ शिल्लक असतानाही तरी देखील कार्यकाळ संपण्यापूर्वी झालेल्या बदलीमागे कोणाचा हात आहे, असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, या बदलीविरोधात स्थानिक तरुण एकवटले असून, बदली रद्द करण्यासाठी सोशल नेटवर्किंग साईट्सवर त्यांनी मोहीम राबबिली आहे.

‘ना खाउंगा ना खाने दुंगा’ या म्हणीचा वापर करीत दोन वर्षे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी उजनीमधील वाळूमाफियांना जेरीस आणले होते. उजनीतील काळे सोन्याची आस असणाऱ्यांच्या अनेकांचे डोळे दिपवीत तहसीलदारांनी कारवाई सुरूच ठेवत लाखो रुपयांचे वाळू उपसा करणारी साधनसामग्री नष्ट केली. तालुक्यातील पोलीस ठाण्याबाहेर वाळूवाहतूक करणाºया गाड्या त्यांनी जप्त केल्या होत्या. त्यांची बदली झाल्याचा निरोप मिळताच वाळूमाफियांनी आनंद व्यक्त केला. मात्र, सामान्य नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. बदलीला विरोध असल्याचे सांगत त्यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत बदली करू नये अशी मागणी केली आहे. तालुक्यातील १०० गावांतून तहसीलदार पाटील यांची बदली करू नये, अशी निवेदने मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांना पाठविली जाणार आहेत.अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संघटक तुषार झेंडे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांना मेल करून तहसीलदार यांची बदली रद्द करण्याची मागणी केली आहे. राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन यांच्या कार्यालयाने या मेलची दखल घेत पुढील कार्यवाहीसाठी प्रधान सचिव महसूल व वन विभाग मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे पाठविला असल्याची माहिती झेंडे पाटील यांनी दिली.साहेबांंची बदली रद्द करायचीच...तहसीलदार पाटील यांची बदली व्हावी यासाठी देव पाण्यात घालून बसलेल्या वाळूमाफिया आणि मुरूममाफियांच्या पाटील यांची बदली झाल्याने श्रावण महिन्यातच उजनी किनारी पार्ट्या रंगल्या. याबाबत परिसरात जोरदार चर्चा रंगली. तहसीलदार पाटील यांच्या मागे तालुक्यातील युवावर्गाने ताकद उभी केली आहे. ‘साहेबांची बदली रद्द करायचीच’ असा संदेश सोशल मीडियावर फिरत आहे. एकूणच तहसीलदारांच्या बदलीविरोधात जनमत उसळल्याने वाळूमाफिया मात्र धास्तावले आहेत.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया