शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

देव तारी त्याला कोण मारी ! कात्रजच्या बोगद्या शेजारील खोल दरीत उडी मारूनही तरुणी जिवंत..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 17:02 IST

धनकवडी भागात राहणाऱ्या अस्मिता वाघ (वय २२) हिने रागाच्या भरात कात्रज घाटातील दरीत उडी मारली.

- अभिजीत डुंगरवाल- पुणे (कात्रज) : रागाच्या भरातच तिने मंगळवारी रात्री घर सोडले. ती थेट चालत निघाली ती कात्रजच्या घाटाकडे.. राग इतका टोकाचा की पोरीने कात्रजच्या बोगद्या शेजारी असलेल्या खोल दरीत उडी मारली.. पण म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी हीच म्हण खरी ठरावी तसा प्रसंग अस्मिता वाघ या नावाच्यातरुणीसोबत सोबत घडला..परंतु, उडी मारल्यानंतर ती एका दगडाला अडकल्याने तिचा जीव वाचला. सध्या कात्रज भागात चर्चेचा विषय बनली आहे. धनकवडी भागात राहणाऱ्या अस्मिता वाघ (वय २२) हिने रागाच्या भरात कात्रज घाटातील दरीत उडी मारली. परंतु, एका दगडाला अडकल्याने तिचा जीव वाचला. मात्र, रान डुकरांनी पाया शेजारी घेराव घातल्यामुळे रात्री ९ ते सकाळी ३ वाजेपर्यत तिची मृत्यूशी झुंज चालूच होती. याविषयी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,  मंगळवारी (दि.२ ) तारखेला सायंकाळी अस्मिता वाघ ही घरातून रागाच्या भरात कात्रज घाटाकडे निघुन गेली होती.ती घाटाजवळ असताना तिच्या ओळखीतील एका व्यक्तीने तिला पाहिले व तिच्या वडीलांना या बाबत फोन वरून कळवले.ती व्यक्ती व तिचे वडील आनंद वाघ यांनी तिला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र तिने रागाच्या भरात रात्री ९ च्या सुमारास कात्रज येथील जुन्या बोगद्याच्या शेजारी असलेल्या खोल दरीत उडी मारली. प्रचंड अंधार असल्यामुळे त्यांना ती खाली दिसेनासी झाली.त्यांनी तातडीने कंट्रोल रूमला या प्रकाराची माहिती कळवल.माहिती मिळताच कात्रज चौकीतील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीशैल चवडशेट्टी,पोलीस उपनिरीक्षक सुबराव लाड, व त्यांचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहचले.अंधार असल्यामुळे व दरी खोल असल्याने पोलिसांनी अग्निशामक दलाला घटनास्थळी बोलावले.दोरीच्या सहय्याने पोलीस उपनिरीक्षक सुबराव लाड व पोलीस शिपाई बाळासाहेब नगराळे यांनी ५०० फुट खोल दरीत खाली जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला. दोन तास शोध घेऊनही पोलिसांना ती सापडली नाही. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीशैल चवडशेट्टी,व अग्निशामक दलाचे काही कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांनी बॉटरी चमकवत व जोराने तिच्या नावच्या आरोळ्या देण्यास सुरुवात केली. तिला पोलिसांचे आवाज ही येत होते, मात्र, रानडुकरे पाया शेजारीच असल्यामुळे ती गप्प बसली होती. त्यानंतर ३ च्या सुमारास रानडुकरे त्या ठिकाणाहून इतरत्र गेल्यावर तिने आवाज दिला. पोलिसांच्या सहाय्याने तिला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.ती वर येताच तिच्या नातेवाईकांनी व पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला.

भारती विद्यापीठ पोलिसांनी दाखवलेल्या कर्तबगारीला आनंद वाघ यांनी आपल्या डोळ्यातील अश्रुंनी सलाम केला. पोलिसांच्या या कामगिरीचे कात्रज भागात कौतुक होत आहे.दोन संकटातून अस्मिता वाचल्यामुळे देव तारी त्याला कोण मारी ही म्हण कात्रज भागात चर्चिली जात आहे. 

टॅग्स :katrajकात्रज