शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

तुम्हांला गावकऱ्यांनी ‘सरपंच ’ म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे : चंद्रकांत दळवी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 18:26 IST

सरपंच पदाचा कार्यकाल संपला तरीही गावात तुम्हाला सरपंच म्हणूनच ओळखले गेले पाहिजे, असे काम सर्व सरपंचांनी करण्याची गरज आहे.

ठळक मुद्देसरपंचांनी गावात १२ ते १५ तास काम केले तरीही ते कमीच

पुणे : गावाची आर्थिक उन्नती, भौगोलिक विकास, मानवी विकास करणे आणि गावातील नागरिकांचे जीवनमान उंचावणे हा दृष्टीकोन समोर ठेवून सरपंचांनी आपल्या कार्यपध्दतीत आवश्यक बदल केले पाहिजेत. तसेच सरपंच पदाचा कार्यकाल संपला तरीही गावात तुम्हाला सरपंच म्हणूनच ओळखले गेले पाहिजे, असे काम सर्व सरपंचांनी करण्याची गरज असल्याचे माजी पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी सांगितले. गावात पायाभूस सुविधा निर्माण करण्याबरोबरच गावातील प्रत्येक कुटुंबांना शेतीबरोबर एक जोड धंदा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. दूध उत्पादन किंवा शेळीपालन हा उपयुक्त जोड धंदा आहे, असे नमूद करून दळवी म्हणाले,गावात विकास कामे करण्यासाठी शासनाच्या ९५ टक्के योजना उपयोगी पडतात. त्यामुळे पाण्याची सुविधा नसल्यास पाणलोट विकासाची कामे,भूजल पातळी वाढवून गावातील शेतीला आवश्यक पाणी उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. तसेच गावातील महिलांच्या क्रयशक्तीचा गावाच्या विकासाठी उपयोग करून घेणे गरजेचे आहे. गावातील नागरिकांना वेळेत कर्ज उपलब्ध करून देवून त्याची परत फेड करण्याकडेही लक्ष द्यावे. सरपंचांना सल्ला देताना चंद्रकांत दळवी म्हणाले, सरपंचांनी गावात १२ ते १५ तास काम केले तरीही ते कमीच आहे.गावात पाच वर्ष काम केल्यानंतर तुम्हाला सरपंच म्हणूनच ओळखले पाहिजे. तसेच त्यानंतर गावातील एक जबाबदार कार्यकर्ता आणि सन्माननिय नागरिक म्हणून तुमच्याकडे पाहिले जाईल. मी माझा निढळ या गावात सुमारे ३५ वर्षांपासून काम करत आहे. निढळ आणि हिरवे बाजार आणि राळेगण या गावातील नागरिकांची कार्यशाळा घेवून विकास कामांची माहिती देण्यात आली आहे.त्यामुळे सरपंचांनी चांगले काम करणा-या गावांना भेटी देवून त्यांच्या कार्यापध्दतीचा अभ्यास करावा.

टॅग्स :PuneपुणेsarpanchसरपंचChandrakant Dalviचंद्रकांत दळवी