शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हांला गावकऱ्यांनी ‘सरपंच ’ म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे : चंद्रकांत दळवी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 18:26 IST

सरपंच पदाचा कार्यकाल संपला तरीही गावात तुम्हाला सरपंच म्हणूनच ओळखले गेले पाहिजे, असे काम सर्व सरपंचांनी करण्याची गरज आहे.

ठळक मुद्देसरपंचांनी गावात १२ ते १५ तास काम केले तरीही ते कमीच

पुणे : गावाची आर्थिक उन्नती, भौगोलिक विकास, मानवी विकास करणे आणि गावातील नागरिकांचे जीवनमान उंचावणे हा दृष्टीकोन समोर ठेवून सरपंचांनी आपल्या कार्यपध्दतीत आवश्यक बदल केले पाहिजेत. तसेच सरपंच पदाचा कार्यकाल संपला तरीही गावात तुम्हाला सरपंच म्हणूनच ओळखले गेले पाहिजे, असे काम सर्व सरपंचांनी करण्याची गरज असल्याचे माजी पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी सांगितले. गावात पायाभूस सुविधा निर्माण करण्याबरोबरच गावातील प्रत्येक कुटुंबांना शेतीबरोबर एक जोड धंदा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. दूध उत्पादन किंवा शेळीपालन हा उपयुक्त जोड धंदा आहे, असे नमूद करून दळवी म्हणाले,गावात विकास कामे करण्यासाठी शासनाच्या ९५ टक्के योजना उपयोगी पडतात. त्यामुळे पाण्याची सुविधा नसल्यास पाणलोट विकासाची कामे,भूजल पातळी वाढवून गावातील शेतीला आवश्यक पाणी उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. तसेच गावातील महिलांच्या क्रयशक्तीचा गावाच्या विकासाठी उपयोग करून घेणे गरजेचे आहे. गावातील नागरिकांना वेळेत कर्ज उपलब्ध करून देवून त्याची परत फेड करण्याकडेही लक्ष द्यावे. सरपंचांना सल्ला देताना चंद्रकांत दळवी म्हणाले, सरपंचांनी गावात १२ ते १५ तास काम केले तरीही ते कमीच आहे.गावात पाच वर्ष काम केल्यानंतर तुम्हाला सरपंच म्हणूनच ओळखले पाहिजे. तसेच त्यानंतर गावातील एक जबाबदार कार्यकर्ता आणि सन्माननिय नागरिक म्हणून तुमच्याकडे पाहिले जाईल. मी माझा निढळ या गावात सुमारे ३५ वर्षांपासून काम करत आहे. निढळ आणि हिरवे बाजार आणि राळेगण या गावातील नागरिकांची कार्यशाळा घेवून विकास कामांची माहिती देण्यात आली आहे.त्यामुळे सरपंचांनी चांगले काम करणा-या गावांना भेटी देवून त्यांच्या कार्यापध्दतीचा अभ्यास करावा.

टॅग्स :PuneपुणेsarpanchसरपंचChandrakant Dalviचंद्रकांत दळवी