शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

‘सकाळी उठल्यावर चिडायचे नाही...’ अजित पवारांनी स्वतःलाच बजावले; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 11:24 IST

वादग्रस्त वक्तव्य करून उमेदवारची मते घटणार नाहीत, त्याची काळजीही कार्यकर्त्यांनी घ्यावी, असेही ते म्हणाले...

पुणे : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी अनेकदा वादात सापडलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी मतदारांशी बोलताना डोक्यावर बर्फ ठेवण्याचा सल्ला दिला आहे. ‘मी सकाळी उठल्यावर चिडायचे नाही, आवाज वाढवायचा नाही’, असे स्वतःला बजावत असतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनीही मतदारांशी बोलताना सत्तेचा दर्प येणार नाही याची याचे भान ठेवावे,’ असा वडीलकीचा सल्लाही पवार यांनी यावेळी दिला. वादग्रस्त वक्तव्य करून उमेदवारची मते घटणार नाहीत, त्याची काळजीही कार्यकर्त्यांनी घ्यावी, असेही ते म्हणाले.

पुण्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्त आयोजित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, सुनील टिंगरे, सुनील कांबळे, धीरज घाटे, दीपक मानकर, मुरलीधर मोहोळ, शिवाजीराव आढळराव पाटील आदी उपस्थित होते.

निवडणुकीत पुण्यातील मतदारांचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यामुळे महायुतीतील सहकाऱ्यांवर मोठी जबाबदारी असून रुसवे फुगवे दूर करून विरोधकांना धूळ चारावी. मतदारांची स्मरणशक्ती छोटी असल्याने मोदी यांनी केलेले काम मतदारांना पुन्हा सांगावे लागणार आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी कोणतेही हेवेदावे न बाळगता कामाला लागावे. लोकसभेची निवडणूक ही विधानसभेची रंगीत तालीम असल्याचेही त्यांनी सांगितले.

विरोधक सध्या मतदारांच्या मनात शंकाकुशंका निर्माण करण्याचे काम करत आहेत. कोणताही उमेदवार कमकुवत नसून मतदार राजा कोण निवडून येईल हे ठरवतो. केवळ विरोधासाठी विरोध केल्यास विकास होत नाही ही पुणेकरांना पटवून द्यावे लागेल. कार्यकर्त्यांनी एकत्रितरीत्या निवडणुकीला सामोरे जाऊया असे सांगून कार्यकर्त्यांनी वादग्रस्त कृती किंवा वक्तव्य टाळावे. मतदारांशी बोलताना उमेदवाराची मते घटणार नाहीत, याची काळजी घ्यावी. एखादा मतदार मत देणार नाही, असे सांगत असल्यास त्याला विरोध करू नये. मतदाराला मत देण्याचा अधिकार असून आपल्याला मत मागण्याचा अधिकार आहे. त्यामुळे अशा मतदाराला विरोध करून मत नाही दिले तर गेला उडत, अशी भूमिका ठेवल्यास तुम्ही राहाल तिथेच राहाल; पण उमेदवार मात्र उडून जाईल, अशी भीती पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

गमतीचा भाग सोडल्यास लोकांशी नम्रतेने वागा. केंद्र व राज्यात आपले सरकार आहे, त्यामुळे आपल्याला सत्तेचा दर्प येणार नाही, याची काळजी घ्यावी. शेवटच्या कार्यकर्त्यांनी तसेच व्यासपीठावरील सर्वांनी याचे भान ठेवले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPuneपुणेlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक