शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

‘सकाळी उठल्यावर चिडायचे नाही...’ अजित पवारांनी स्वतःलाच बजावले; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 11:24 IST

वादग्रस्त वक्तव्य करून उमेदवारची मते घटणार नाहीत, त्याची काळजीही कार्यकर्त्यांनी घ्यावी, असेही ते म्हणाले...

पुणे : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी अनेकदा वादात सापडलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी मतदारांशी बोलताना डोक्यावर बर्फ ठेवण्याचा सल्ला दिला आहे. ‘मी सकाळी उठल्यावर चिडायचे नाही, आवाज वाढवायचा नाही’, असे स्वतःला बजावत असतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनीही मतदारांशी बोलताना सत्तेचा दर्प येणार नाही याची याचे भान ठेवावे,’ असा वडीलकीचा सल्लाही पवार यांनी यावेळी दिला. वादग्रस्त वक्तव्य करून उमेदवारची मते घटणार नाहीत, त्याची काळजीही कार्यकर्त्यांनी घ्यावी, असेही ते म्हणाले.

पुण्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्त आयोजित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, सुनील टिंगरे, सुनील कांबळे, धीरज घाटे, दीपक मानकर, मुरलीधर मोहोळ, शिवाजीराव आढळराव पाटील आदी उपस्थित होते.

निवडणुकीत पुण्यातील मतदारांचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यामुळे महायुतीतील सहकाऱ्यांवर मोठी जबाबदारी असून रुसवे फुगवे दूर करून विरोधकांना धूळ चारावी. मतदारांची स्मरणशक्ती छोटी असल्याने मोदी यांनी केलेले काम मतदारांना पुन्हा सांगावे लागणार आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी कोणतेही हेवेदावे न बाळगता कामाला लागावे. लोकसभेची निवडणूक ही विधानसभेची रंगीत तालीम असल्याचेही त्यांनी सांगितले.

विरोधक सध्या मतदारांच्या मनात शंकाकुशंका निर्माण करण्याचे काम करत आहेत. कोणताही उमेदवार कमकुवत नसून मतदार राजा कोण निवडून येईल हे ठरवतो. केवळ विरोधासाठी विरोध केल्यास विकास होत नाही ही पुणेकरांना पटवून द्यावे लागेल. कार्यकर्त्यांनी एकत्रितरीत्या निवडणुकीला सामोरे जाऊया असे सांगून कार्यकर्त्यांनी वादग्रस्त कृती किंवा वक्तव्य टाळावे. मतदारांशी बोलताना उमेदवाराची मते घटणार नाहीत, याची काळजी घ्यावी. एखादा मतदार मत देणार नाही, असे सांगत असल्यास त्याला विरोध करू नये. मतदाराला मत देण्याचा अधिकार असून आपल्याला मत मागण्याचा अधिकार आहे. त्यामुळे अशा मतदाराला विरोध करून मत नाही दिले तर गेला उडत, अशी भूमिका ठेवल्यास तुम्ही राहाल तिथेच राहाल; पण उमेदवार मात्र उडून जाईल, अशी भीती पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

गमतीचा भाग सोडल्यास लोकांशी नम्रतेने वागा. केंद्र व राज्यात आपले सरकार आहे, त्यामुळे आपल्याला सत्तेचा दर्प येणार नाही, याची काळजी घ्यावी. शेवटच्या कार्यकर्त्यांनी तसेच व्यासपीठावरील सर्वांनी याचे भान ठेवले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPuneपुणेlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक