शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

तुमच्याकडे शाळेचा दाखला नाही...तुम्हाला देशाच्या बाहेर काढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 13:01 IST

आमच्याकडे शाळेचे दाखल नाही... आधार कार्ड, रेशनकार्ड, मतदान कार्ड आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एनआरसी आणि सीएए कायद्याच्या विरोधात आंदोलने सुरुआंदोलनामध्ये सहभागी नागरिकांना ‘एनआरसी’ आणि ‘सीएए’ची पुरेशी माहिती नसल्याचे स्पष्ट

पुणे :  सरकार आम्हा नागरिकांना देशाच्या बाहेर काढणार आहे... आम्ही आदिवासी नागरिक.. आमच्यात कोणी शिकलेले नाही... आमच्याकडे शाळेचे दाखल नाही... आधार कार्ड, रेशनकार्ड, मतदान कार्ड आहे...पण जातीचा दाखला काढायचा तर दोन-चार हजार खर्च कोण करणार... यामुळेच आम्ही आंदोलनामध्ये सहभागी झालो असून, शासनाचा विरोध करण्यासाठी पुण्यात आलो असल्याची माहिती सोमवारी (दि. २०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदीवासी भटका बहुजन संघटनेच्या वतीने केंद्र शासनाने देशात लागू केलेल्या एनआरसी आणि सीएए कायद्याच्या विरोधात आंदोलनात सहभागी झालेल्या आदिवासी महिलांनी सांगितले.     जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर शहर आणि जिल्ह्यातील विविध संघटना, विविध जाती-धर्मांच्या लोकांकडून केंद्र शासनाने देशात लागू केलेल्या एनआरसी आणि सीएए कायद्याच्या विरोधात आंदोलने सुरु आहेत. परंतु आंदोलन करणाऱ्या व आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या अनेक नागरिकांना ‘एनआरसी’ आणि ‘सीएए’ची पुरेशी माहिती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काही नागरिकांची दिशाभूल करुन आंदोलनामध्ये सहभागी करुन  घेतले जात असल्याचेही उघड झाले आहे. सोमवार (दि.२०) रोजी एनआरसी आणि सीएए या कायद्याच्या निषेधार्थ व जिल्ह्यातील मावळ, खेड, मुळशी, हवेली तालुक्यातील भूमीपूत्र आदिवासी व भटक्या बांधवाच्या मुलभूत न्याय हक्कासाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या काही आदिवासी महिलांना आंदोलनामध्ये कशासाठी सहभागी झालात याबाबत विचारले असता ही माहिती समोर आली.    आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या मावळ तालुक्यातील मानू मंगल मूकणे यांनी सांगितले की, आमच्या गावांमध्ये बैठका घेऊन नागरिकांना तुमच्याकडे शाळेचा दाखला, जातीचे दाखले नाही. त्यामुळे तुम्हाला शासनाकडून देशाबाहेर काढणार असल्याचे सांगितले. तर प्रिया यांनी सांगितले की, गरिबाकडे जाग- जमिन नाही, कागदपत्र नाही, त्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही, सरकारचे काय चालले आहे, काही कळत नाही. आमच्याकडे आधार कार्ड आहे, रेशनकार्ड आणि आणि मतदान कार्डपण आहे.. मग आम्हाला का देशा बाहेर काढणार, आम्हा आदिवासांना काहीच अधिकार नाही का, असा सवाल प्रिया यांनी उपस्थित केला...........आदिवासी दाखला नसणे आणि नागरिकत्व काही संबंध नाहीआदिवासी दाखला अथवा शाळेचा दाखला नसणे यामुळे तुम्ही या देशाचे नागरिक आहात किंवा नाही याचा काही संबंध नाही. आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशनिंग कार्ड असणे हे देखील नागरिकत्वासाठी पुरेसे पुरावे आहेत. आदिवासी दाखला नसल्याने फार तर शासनाच्या आदिवासीसाठी असलेल्या योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागेल. परंतु हा दाखला नसला म्हणजे तुम्ही या देशाचे नागरिक नाही असे काही होत नाही. नागरिकांनी याबाबत गैरसमज करुन घेऊन नये. तसेच देशात एनआरसी आणि सीएए कायदा लागू झाल्यानंतर अद्याप एकही अर्ज आपले नागरिकत्व सिध्द करण्यासाठी जिल्हाधिका-यांकडे आलेला नाही.- डॉ.जयश्री कटारे, निवासी उपजिल्हाधिकारी 

टॅग्स :Puneपुणेcollectorजिल्हाधिकारीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकGovernmentसरकार