शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्याकडे शाळेचा दाखला नाही...तुम्हाला देशाच्या बाहेर काढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 13:01 IST

आमच्याकडे शाळेचे दाखल नाही... आधार कार्ड, रेशनकार्ड, मतदान कार्ड आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एनआरसी आणि सीएए कायद्याच्या विरोधात आंदोलने सुरुआंदोलनामध्ये सहभागी नागरिकांना ‘एनआरसी’ आणि ‘सीएए’ची पुरेशी माहिती नसल्याचे स्पष्ट

पुणे :  सरकार आम्हा नागरिकांना देशाच्या बाहेर काढणार आहे... आम्ही आदिवासी नागरिक.. आमच्यात कोणी शिकलेले नाही... आमच्याकडे शाळेचे दाखल नाही... आधार कार्ड, रेशनकार्ड, मतदान कार्ड आहे...पण जातीचा दाखला काढायचा तर दोन-चार हजार खर्च कोण करणार... यामुळेच आम्ही आंदोलनामध्ये सहभागी झालो असून, शासनाचा विरोध करण्यासाठी पुण्यात आलो असल्याची माहिती सोमवारी (दि. २०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदीवासी भटका बहुजन संघटनेच्या वतीने केंद्र शासनाने देशात लागू केलेल्या एनआरसी आणि सीएए कायद्याच्या विरोधात आंदोलनात सहभागी झालेल्या आदिवासी महिलांनी सांगितले.     जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर शहर आणि जिल्ह्यातील विविध संघटना, विविध जाती-धर्मांच्या लोकांकडून केंद्र शासनाने देशात लागू केलेल्या एनआरसी आणि सीएए कायद्याच्या विरोधात आंदोलने सुरु आहेत. परंतु आंदोलन करणाऱ्या व आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या अनेक नागरिकांना ‘एनआरसी’ आणि ‘सीएए’ची पुरेशी माहिती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काही नागरिकांची दिशाभूल करुन आंदोलनामध्ये सहभागी करुन  घेतले जात असल्याचेही उघड झाले आहे. सोमवार (दि.२०) रोजी एनआरसी आणि सीएए या कायद्याच्या निषेधार्थ व जिल्ह्यातील मावळ, खेड, मुळशी, हवेली तालुक्यातील भूमीपूत्र आदिवासी व भटक्या बांधवाच्या मुलभूत न्याय हक्कासाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या काही आदिवासी महिलांना आंदोलनामध्ये कशासाठी सहभागी झालात याबाबत विचारले असता ही माहिती समोर आली.    आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या मावळ तालुक्यातील मानू मंगल मूकणे यांनी सांगितले की, आमच्या गावांमध्ये बैठका घेऊन नागरिकांना तुमच्याकडे शाळेचा दाखला, जातीचे दाखले नाही. त्यामुळे तुम्हाला शासनाकडून देशाबाहेर काढणार असल्याचे सांगितले. तर प्रिया यांनी सांगितले की, गरिबाकडे जाग- जमिन नाही, कागदपत्र नाही, त्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही, सरकारचे काय चालले आहे, काही कळत नाही. आमच्याकडे आधार कार्ड आहे, रेशनकार्ड आणि आणि मतदान कार्डपण आहे.. मग आम्हाला का देशा बाहेर काढणार, आम्हा आदिवासांना काहीच अधिकार नाही का, असा सवाल प्रिया यांनी उपस्थित केला...........आदिवासी दाखला नसणे आणि नागरिकत्व काही संबंध नाहीआदिवासी दाखला अथवा शाळेचा दाखला नसणे यामुळे तुम्ही या देशाचे नागरिक आहात किंवा नाही याचा काही संबंध नाही. आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशनिंग कार्ड असणे हे देखील नागरिकत्वासाठी पुरेसे पुरावे आहेत. आदिवासी दाखला नसल्याने फार तर शासनाच्या आदिवासीसाठी असलेल्या योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागेल. परंतु हा दाखला नसला म्हणजे तुम्ही या देशाचे नागरिक नाही असे काही होत नाही. नागरिकांनी याबाबत गैरसमज करुन घेऊन नये. तसेच देशात एनआरसी आणि सीएए कायदा लागू झाल्यानंतर अद्याप एकही अर्ज आपले नागरिकत्व सिध्द करण्यासाठी जिल्हाधिका-यांकडे आलेला नाही.- डॉ.जयश्री कटारे, निवासी उपजिल्हाधिकारी 

टॅग्स :Puneपुणेcollectorजिल्हाधिकारीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकGovernmentसरकार