शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
2
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
5
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
6
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
7
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
8
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
9
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
10
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
11
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
12
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
14
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
15
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
16
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
17
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
18
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
19
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
20
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

Sawai Gandharva Bhimsen Mahotsav: यंदा महोत्सव किमान ५० टक्के उपस्थितीत साजरा करून द्यावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 13:59 IST

यंदाही ‘खुल्या मैदानांवरील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी २५ टक्के उपस्थितीची अट राज्य शासनाने घातली आहे

पुणे: साहित्य संंमेलन, हॉटेल, बसस्थानके, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणच्या गर्दीतून कोरोना विषाणू पसरत नाही. मग सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवामधूनच त्याचा प्रसार होईल असे शासनाला का वाटते, असा सवाल कलाकारांनी उपस्थित केला आहे. भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे यंदाचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने यंदा हा महोत्सव किमान ५० टक्के उपस्थितीसह साजरा करु द्यावा असे आवाहन करत सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रसिक मंडळींनी मोहीम सुरू केली आहे.

हा महोत्सव कधी घेण्यासाठी उत्सुक आहात असा प्रश्न गुगल फॉर्मद्वारे विचारला जात आहे. यात पन्नास टक्के लोकांच्या उपस्थितीमध्ये कोव्हीडचे नियम पाळून किंवा फेब्रुवारी महिन्यात जन्मशताब्दी वर्षाबरोबर की कोरोनाचे नियम शिथिल झाल्यानंतर असे तीन पर्याय देण्यात आले आहेत. हा गुगल फॉर्म सर्व कलाकार आणि रसिकांना पाठविला जात आहे.

जागतिक पातळीवरील प्रतिष्ठेचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव गेली सात दशके सुरू आहे. गेल्यावर्षी कोरोना निर्बंधांमुळे हा महोत्सव रद्द झाला. यंदाही ‘खुल्या मैदानांवरील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी २५ टक्के उपस्थितीची अट राज्य शासनाने घातली असल्याने हा महोत्सव होऊ शकणार नाही,’ असे निवेदन महोत्सवाचे आयोजक आर्य संगीत प्रसारक मंडळाने प्रसिद्ध केले आहे. मात्र तो व्हावा अशी महोत्सवाच्या जगभरच्या चाहत्यांची इच्छा आहे.

“सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाने अनेक पिढ्या संस्कारित केल्या आहेत. महोत्सव इतकी वर्षे होत आहे त्याला काहीतरी अर्थ आहे ना? संगीत केवळ चरितार्थाचे साधन नाही, तर ती एक साधना आहे. यंदा पंडितजींचे जन्मशताब्दी वर्ष आहे. हा महोत्सव व्हायला हवा असे तबलावादक पंडित विजय घाटे यांनी सांगितले आहे.'' 

“गेली पावणेदोन वर्षे आम्ही कलाकार भरडले गेलो आहेत. बंदिस्त नाट्यगृहात एसी असूनही ५० टक्के क्षमतेने कार्यक्रमांना परवानगी आहे. पण खुल्या मैदानात मात्र २५ टक्के क्षमतेची अट हेच पटत नाही. खुल्या मैदानात किमान ५० टक्के उपस्थितीची परवानगी मिळावी या हेतूनेच सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रसिक मंडळींनी ही मोहीम सुरू केली आहे असे तबलावादक भरत कामत यांनी सांगितले आहे.''

टॅग्स :Puneपुणेartकलाmusicसंगीतcorona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकार