शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

यशवंत सहकारी कारखाना आता भाडेतत्वावर; सहकारमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 19:26 IST

थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखाना आता भाडेतत्वावर चालविण्याच्या निर्णय राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासमवेत मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देकराराची (मुदत) निविदा तत्काळ काढण्याचा कारखाना प्रशासनास देण्यात आल्या सूचनायशवंत भविष्यात सुरु व्हावा यासाठी आवश्यक त्या सर्व पर्यायांवर चर्चा

लोणी काळभोर : तत्कलीन संचालक मंडळाने केलेल्या कथित गैरव्यवहारामुळे गेल्या सहा वर्षांपासून गाळपाविना बंद पडलेला थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखाना आता भाडेतत्वावर चालविण्याच्या निर्णय राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासमवेत मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. कराराची (मुदत) निविदा तत्काळ काढण्याचा सूचना कारखाना प्रशासनास देण्यात आल्या आहेत. गेली काही दिवस हा कारखाना जागा विकून सुल करण्याचा प्रयत्न यशस्वी होत नसल्याने हा निर्णय घेतण्यात आल्याचे समजते. कारखाना भाडेतत्वावर सुरू करण्यासाठी कारखान्यावरील १७२ कोटी कर्जाचा अर्थिक आराखडाही तयार करण्याचा सूचना सहकारमंत्र्यांनी कारखाना प्रशासनास दिल्या आहेत. विविध अडचणींमुळे आजारी व बंद पडलेले कारखाने पूर्ववत सुरू व्हावेत म्हणून सहकारमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्य करत असलेल्या समितीची मुंबईत बैठक घेण्यात आली. या बैठकीस शिरूर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे, राज्याचे साखर आयुक्त संभाजी कडू पाटील, साखर संचालक किशोर तोष्णीवाल, प्रादेशिक सहसंचालक शशिकांत घोरपडे, यशवंतचे आवसायक अधिकारी बी. जे. देशमुख यांचसमवेत अधिकारी वर्ग उपस्थित होते.बैठकीमध्ये सहकारमंत्र्यांनी यशवंतची सध्याच्या अर्थिक स्थितीचा आढावा घेतला. यांवेळी आमदार पाचर्णे यांनी कारखान्यावरील बँक व विविध वित्तीय संस्थाच्या कर्जाचा मुद्दा उपस्थित केला. यांमध्ये त्यांनी कारखान्यावरील २७ कोटी रूपयांचा कर्जासाठी तब्बल ३०० कोटी रुपये किमतीची मिळकत राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात असलेची बाब उपस्थितांच्या निदर्शनात आणून दिली. व यशवंतच्या स्थावर व जंगम मालमत्तेची विक्री न करता शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कारखाना सुरू करण्याची विनंती सहकारमंत्र्यांना केली. यांनंतर बंद पडल्यानंतर गेली सहा वर्षे प्रशासनाने कारखान्यासंदर्भात कोणते निर्णय घेतले यांबाबत चर्चा झाली.बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनाध्यक्ष राजु शेट्टी, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील हे सहभागी झाले होते. यामध्ये यशवंत भविष्यात सुरु व्हावा यासाठी आवश्यक त्या सर्व पर्यायांवर चर्चा करण्यात आली. विशेष सर्वसाधारण सभेत शेतकरी सभासदांनी  भाडेतत्त्वावर कारखाना सुरू करण्याचा ठराव संमत केला होता. त्यानुसार यशवंत चालू  करण्याचा निर्णय झाला आहे. १७२ कोटी कर्जानुसार कारखान्याचा अर्थिक आराखडा भाडेतत्वावर चालू करण्यास तयार करून सर्व भाडेतत्वाची मुदत निश्चित करून निविदा काढण्याचा सूचना संबधितांना देण्यात आल्या आहेत.

सदर बैठकीत यशवंत भाडेतत्त्वावर चालू करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. एकूण देणी व कारखाना भाडेतत्वावर चालवण्यास दिल्यानंतर त्याची वसूली किती वर्षांनी होईल याबाबत यशवंतचा आर्थिक आराखडा तयार करून त्यानंतर साखर आयुक्तांची परवानगी घेऊन भाडेतत्वाची निविदा प्रक्रिया राबविणार आहे.-बी. जे. देशमुख, आवसायक, यशवंत कारखाना  

 

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र