शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

यशवंत सहकारी कारखाना आता भाडेतत्वावर; सहकारमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 19:26 IST

थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखाना आता भाडेतत्वावर चालविण्याच्या निर्णय राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासमवेत मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देकराराची (मुदत) निविदा तत्काळ काढण्याचा कारखाना प्रशासनास देण्यात आल्या सूचनायशवंत भविष्यात सुरु व्हावा यासाठी आवश्यक त्या सर्व पर्यायांवर चर्चा

लोणी काळभोर : तत्कलीन संचालक मंडळाने केलेल्या कथित गैरव्यवहारामुळे गेल्या सहा वर्षांपासून गाळपाविना बंद पडलेला थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखाना आता भाडेतत्वावर चालविण्याच्या निर्णय राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासमवेत मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. कराराची (मुदत) निविदा तत्काळ काढण्याचा सूचना कारखाना प्रशासनास देण्यात आल्या आहेत. गेली काही दिवस हा कारखाना जागा विकून सुल करण्याचा प्रयत्न यशस्वी होत नसल्याने हा निर्णय घेतण्यात आल्याचे समजते. कारखाना भाडेतत्वावर सुरू करण्यासाठी कारखान्यावरील १७२ कोटी कर्जाचा अर्थिक आराखडाही तयार करण्याचा सूचना सहकारमंत्र्यांनी कारखाना प्रशासनास दिल्या आहेत. विविध अडचणींमुळे आजारी व बंद पडलेले कारखाने पूर्ववत सुरू व्हावेत म्हणून सहकारमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्य करत असलेल्या समितीची मुंबईत बैठक घेण्यात आली. या बैठकीस शिरूर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे, राज्याचे साखर आयुक्त संभाजी कडू पाटील, साखर संचालक किशोर तोष्णीवाल, प्रादेशिक सहसंचालक शशिकांत घोरपडे, यशवंतचे आवसायक अधिकारी बी. जे. देशमुख यांचसमवेत अधिकारी वर्ग उपस्थित होते.बैठकीमध्ये सहकारमंत्र्यांनी यशवंतची सध्याच्या अर्थिक स्थितीचा आढावा घेतला. यांवेळी आमदार पाचर्णे यांनी कारखान्यावरील बँक व विविध वित्तीय संस्थाच्या कर्जाचा मुद्दा उपस्थित केला. यांमध्ये त्यांनी कारखान्यावरील २७ कोटी रूपयांचा कर्जासाठी तब्बल ३०० कोटी रुपये किमतीची मिळकत राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात असलेची बाब उपस्थितांच्या निदर्शनात आणून दिली. व यशवंतच्या स्थावर व जंगम मालमत्तेची विक्री न करता शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कारखाना सुरू करण्याची विनंती सहकारमंत्र्यांना केली. यांनंतर बंद पडल्यानंतर गेली सहा वर्षे प्रशासनाने कारखान्यासंदर्भात कोणते निर्णय घेतले यांबाबत चर्चा झाली.बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनाध्यक्ष राजु शेट्टी, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील हे सहभागी झाले होते. यामध्ये यशवंत भविष्यात सुरु व्हावा यासाठी आवश्यक त्या सर्व पर्यायांवर चर्चा करण्यात आली. विशेष सर्वसाधारण सभेत शेतकरी सभासदांनी  भाडेतत्त्वावर कारखाना सुरू करण्याचा ठराव संमत केला होता. त्यानुसार यशवंत चालू  करण्याचा निर्णय झाला आहे. १७२ कोटी कर्जानुसार कारखान्याचा अर्थिक आराखडा भाडेतत्वावर चालू करण्यास तयार करून सर्व भाडेतत्वाची मुदत निश्चित करून निविदा काढण्याचा सूचना संबधितांना देण्यात आल्या आहेत.

सदर बैठकीत यशवंत भाडेतत्त्वावर चालू करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. एकूण देणी व कारखाना भाडेतत्वावर चालवण्यास दिल्यानंतर त्याची वसूली किती वर्षांनी होईल याबाबत यशवंतचा आर्थिक आराखडा तयार करून त्यानंतर साखर आयुक्तांची परवानगी घेऊन भाडेतत्वाची निविदा प्रक्रिया राबविणार आहे.-बी. जे. देशमुख, आवसायक, यशवंत कारखाना  

 

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र