शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

पर्यावरण विरुद्ध विकास असे चित्र चुकीचे : एम. के. रणजितसिंह; वसुंधरा सन्मान पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 11:55 IST

किर्लाेस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सांगता समारंभात वनमहर्षी मारुती चितमपल्ली यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

ठळक मुद्दे‘वातावरणबदलाचा घातक परिणाम जंगलाप्रमाणे समुद्राखालील जीवसृष्टीवरही : दीपक आपटे महाराष्ट्रात वन्यजीव व्यवस्थापनाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही : मारुती चितमपल्ली

पुणे : ‘पर्यावरण विरुद्ध विकास असे चित्र निर्माण होणे चुकीचे आहे. सांस्कृतिक, पुरातत्त्व संवर्धनाप्रमाणे पर्यावरणसंवर्धनाची सुरुवात शाळा आणि महाविद्यालयापासून व्हायला हवी. निसर्गसंवर्धनावर आपला सामाजिक-आर्थिक विकास,  अन्नसुरक्षा अवलंबून आहेत. त्यामुळे पर्यावरणासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. यात प्रशासन आणि राजकीय घटकांची महत्त्वाची भूमिका आहे. राजकारणी लोकांचे फक्त पुढच्या निवडणुकीकडे लक्ष असते, हे बदलायला हवे,’ अशा शब्दांत ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक एम. के. रणजितसिंह यांनी मार्मिक टिपण्णी केली.किर्लाेस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सांगता समारंभात वनमहर्षी मारुती चितमपल्ली यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. भारताचे संवर्धन प्रणालीचे उत्कृष्ट नेतृत्व एम. के. रणजितसिंह यांना वसुंधरा सन्मान, पर्यावरण पत्रकार आरती कुलकर्णी यांना इको जनार्लिस्ट, बी. एन. एस. एस. इंडियाचे अध्यक्ष डॉ. दीपक आपटे यांना ग्रीन टीचर पुरस्कार प्रदान करण्यात आले.दीपक आपटे म्हणाले, ‘‘वातावरणबदलाचा घातक परिणाम जंगलाप्रमाणे समुद्राखालील जीवसृष्टीवरही होत आहे. मात्र, तेथील पर्यावरणऱ्हासाकडे दुर्लक्ष होत आहे.‘‘जमिनीच्या तुलनेत समुद्राखाली वावरणे हे खूपच कठीण आहे, हे त्यातले एक महत्वाचे कारण. पण, पर्यावरणऱ्हासाचे उत्तर सागरातच आहे, हे विसरून चालणार नाही. पर्यावरणसंवर्धनाचा संबंध विज्ञानाशी नसून, राजकीय इच्छाशक्तीशी आहे.’’या वेळी आरती किर्लोस्कर, आर. आर. देशपांडे, माधव चंद्रचूड आदी मान्यवर उपस्थित होते. 

महाराष्ट्रात वन्यजीव व्यवस्थापनाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. वन्यजीवनाबद्दल सखोल अभ्यास होताना दिसत नाही. राष्ट्रीय उद्यान, अभयारण्ये पाहण्यासाठी जाताना व्याघ्रदर्शन घडले पाहिजे, असा पर्यटकांचा आग्रह असतो. पर्यटन व्यवसाय करणारे लोकही वाघ दिसेल, अशी जाहिरात करतात. रस्त्यांच्या कडेला बोअरवेल घेऊन तेथील टाक्या पाण्याने भरल्या जातात. जंगलात मात्र जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था नसते. अशा वेळी प्राण्यांना तिथे येण्याशिवाय पर्याय राहत नाही. हा प्रकार थांबायला हवा.- मारुती चितमपल्ली

टॅग्स :Puneपुणे