शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

पर्यावरण विरुद्ध विकास असे चित्र चुकीचे : एम. के. रणजितसिंह; वसुंधरा सन्मान पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 11:55 IST

किर्लाेस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सांगता समारंभात वनमहर्षी मारुती चितमपल्ली यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

ठळक मुद्दे‘वातावरणबदलाचा घातक परिणाम जंगलाप्रमाणे समुद्राखालील जीवसृष्टीवरही : दीपक आपटे महाराष्ट्रात वन्यजीव व्यवस्थापनाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही : मारुती चितमपल्ली

पुणे : ‘पर्यावरण विरुद्ध विकास असे चित्र निर्माण होणे चुकीचे आहे. सांस्कृतिक, पुरातत्त्व संवर्धनाप्रमाणे पर्यावरणसंवर्धनाची सुरुवात शाळा आणि महाविद्यालयापासून व्हायला हवी. निसर्गसंवर्धनावर आपला सामाजिक-आर्थिक विकास,  अन्नसुरक्षा अवलंबून आहेत. त्यामुळे पर्यावरणासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. यात प्रशासन आणि राजकीय घटकांची महत्त्वाची भूमिका आहे. राजकारणी लोकांचे फक्त पुढच्या निवडणुकीकडे लक्ष असते, हे बदलायला हवे,’ अशा शब्दांत ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक एम. के. रणजितसिंह यांनी मार्मिक टिपण्णी केली.किर्लाेस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सांगता समारंभात वनमहर्षी मारुती चितमपल्ली यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. भारताचे संवर्धन प्रणालीचे उत्कृष्ट नेतृत्व एम. के. रणजितसिंह यांना वसुंधरा सन्मान, पर्यावरण पत्रकार आरती कुलकर्णी यांना इको जनार्लिस्ट, बी. एन. एस. एस. इंडियाचे अध्यक्ष डॉ. दीपक आपटे यांना ग्रीन टीचर पुरस्कार प्रदान करण्यात आले.दीपक आपटे म्हणाले, ‘‘वातावरणबदलाचा घातक परिणाम जंगलाप्रमाणे समुद्राखालील जीवसृष्टीवरही होत आहे. मात्र, तेथील पर्यावरणऱ्हासाकडे दुर्लक्ष होत आहे.‘‘जमिनीच्या तुलनेत समुद्राखाली वावरणे हे खूपच कठीण आहे, हे त्यातले एक महत्वाचे कारण. पण, पर्यावरणऱ्हासाचे उत्तर सागरातच आहे, हे विसरून चालणार नाही. पर्यावरणसंवर्धनाचा संबंध विज्ञानाशी नसून, राजकीय इच्छाशक्तीशी आहे.’’या वेळी आरती किर्लोस्कर, आर. आर. देशपांडे, माधव चंद्रचूड आदी मान्यवर उपस्थित होते. 

महाराष्ट्रात वन्यजीव व्यवस्थापनाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. वन्यजीवनाबद्दल सखोल अभ्यास होताना दिसत नाही. राष्ट्रीय उद्यान, अभयारण्ये पाहण्यासाठी जाताना व्याघ्रदर्शन घडले पाहिजे, असा पर्यटकांचा आग्रह असतो. पर्यटन व्यवसाय करणारे लोकही वाघ दिसेल, अशी जाहिरात करतात. रस्त्यांच्या कडेला बोअरवेल घेऊन तेथील टाक्या पाण्याने भरल्या जातात. जंगलात मात्र जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था नसते. अशा वेळी प्राण्यांना तिथे येण्याशिवाय पर्याय राहत नाही. हा प्रकार थांबायला हवा.- मारुती चितमपल्ली

टॅग्स :Puneपुणे