शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

शहाण्यासारखे जगावे, वेड्यासारखे लिहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 02:10 IST

संदीप खरे यांच्या ‘मी अन् माझा आवाज’ कवितासंग्रहाचे प्रकाशन

पुणे : ‘दर क्षणाला बदलते ती कविता, आयुष्य सहज जगताना झाडावर जे फूल उमलते ती कविता. शहाण्यासारखे जगावे आणि वेड्यासारखं लिहावे. खांद्यावर झेंडा घेऊन समाजसेवा करण्यापेक्षा आपापल्या क्षेत्रात काम करणे ही समाजसेवाच आहे. प्रेम करावेसे वाटणे आणि कविता लिहिणे हे सजीव असण्याचे लक्षण असते’, अशा शब्दांत कवी संदीप खरे यांनी उपस्थितांना कवितेच्या गावाची सफर घडवली.रसिक साहित्य परिवारातर्फे संदीप खरे यांच्या ‘मी अन् माझा आवाज’ या नव्या कवितासंग्रहाचे प्रकाशन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी व जितेंद्र जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात संदीप खरे व जितेंद्र जोशी यांनी कवितांचे वाचन करत वातावरण काव्यमय केले.‘शब्द जड वापरले की कविता उत्तम होत नाही, तर साधी सोपी कविताही जगण्याचा संदेश देऊन जाते’, असे सांगत खरे यांनी त्यांच्याच कवितांची उदाहरणे दिली. ‘एखादा कवी संगीतकाराबरोबर त्याच्याच कविता चालबद्ध करून दीड हजारांहून अधिक कार्यक्रम करतो, या गोष्टीचा अनेकांना त्रास होतो.कवीला चांगले पैसे मिळत असतील तरी कुणकुण सुरू होते. एखादा कवी त्याच्या प्रतिभेचे चांगले पैसे घेत असेल तर तुमच्या बापाचे काय जाते,’ असा खोचक सवालही जोशी यांनी उपस्थित केला.मृणाल कुलकर्णी आणि डॉ. सलील कुलकर्णी यांनीही आपले विचार मांडले. जी कलाकृती लोकाभिमुख होते तीच अधिक सुंदर असते. मराठी शब्दांचे भांडार वापरून कविता करणारे ज्येष्ठ कवी आणि संदीप खरे यांच्यासारखे कवी हे एका पातळीवर असायला हवेत, असे सलील कुलकर्णी यांनी सांगितले. मृणाल कुलकर्णी यांनी ‘सायकल’ या कवितेचे वाचन केले.

टॅग्स :sandeep khareसंदीप खरेPuneपुणे