शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

शहाण्यासारखे जगावे, वेड्यासारखे लिहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 02:10 IST

संदीप खरे यांच्या ‘मी अन् माझा आवाज’ कवितासंग्रहाचे प्रकाशन

पुणे : ‘दर क्षणाला बदलते ती कविता, आयुष्य सहज जगताना झाडावर जे फूल उमलते ती कविता. शहाण्यासारखे जगावे आणि वेड्यासारखं लिहावे. खांद्यावर झेंडा घेऊन समाजसेवा करण्यापेक्षा आपापल्या क्षेत्रात काम करणे ही समाजसेवाच आहे. प्रेम करावेसे वाटणे आणि कविता लिहिणे हे सजीव असण्याचे लक्षण असते’, अशा शब्दांत कवी संदीप खरे यांनी उपस्थितांना कवितेच्या गावाची सफर घडवली.रसिक साहित्य परिवारातर्फे संदीप खरे यांच्या ‘मी अन् माझा आवाज’ या नव्या कवितासंग्रहाचे प्रकाशन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी व जितेंद्र जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात संदीप खरे व जितेंद्र जोशी यांनी कवितांचे वाचन करत वातावरण काव्यमय केले.‘शब्द जड वापरले की कविता उत्तम होत नाही, तर साधी सोपी कविताही जगण्याचा संदेश देऊन जाते’, असे सांगत खरे यांनी त्यांच्याच कवितांची उदाहरणे दिली. ‘एखादा कवी संगीतकाराबरोबर त्याच्याच कविता चालबद्ध करून दीड हजारांहून अधिक कार्यक्रम करतो, या गोष्टीचा अनेकांना त्रास होतो.कवीला चांगले पैसे मिळत असतील तरी कुणकुण सुरू होते. एखादा कवी त्याच्या प्रतिभेचे चांगले पैसे घेत असेल तर तुमच्या बापाचे काय जाते,’ असा खोचक सवालही जोशी यांनी उपस्थित केला.मृणाल कुलकर्णी आणि डॉ. सलील कुलकर्णी यांनीही आपले विचार मांडले. जी कलाकृती लोकाभिमुख होते तीच अधिक सुंदर असते. मराठी शब्दांचे भांडार वापरून कविता करणारे ज्येष्ठ कवी आणि संदीप खरे यांच्यासारखे कवी हे एका पातळीवर असायला हवेत, असे सलील कुलकर्णी यांनी सांगितले. मृणाल कुलकर्णी यांनी ‘सायकल’ या कवितेचे वाचन केले.

टॅग्स :sandeep khareसंदीप खरेPuneपुणे