शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

सत्याच्या प्रेमात पडावे कविता लिहिण्यासाठी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 02:56 IST

‘‘सत्याच्या प्रेमात पडावे कविता लिहिण्यासाठी, आयुष्याला थेट भिडावे कविता लिहिण्यासाठी, उभ्या जगाची व्यथा असू दे छोटी अथवा मोठी,

पुणे : ‘‘सत्याच्या प्रेमात पडावे कविता लिहिण्यासाठी,आयुष्याला थेट भिडावे कविता लिहिण्यासाठी,उभ्या जगाची व्यथा असू दे छोटी अथवा मोठी,गळ्यात पडूनी तिच्या रडावे कविता लिहिण्यासाठी...’’या गझलकार रमण रणदिवे यांच्या कवितेने श्रोत्यांना कविता कशी लिहावी याची अनुभूती दिली.निमित्त होते ‘लोकमत’तर्फे आयोजित काव्यॠतू स्पर्धेच्या लोगोच्या अनावरण सोहळ्याचे. कवितेचा प्रवास वैयक्तिक ते वैश्विक असा होत असतो. कवितेतून जगणे अणि जगण्यातून कविता उमटते, अशा शब्दांत मान्यवर कवींनी कवितेच्या गावाची सफर घडवली.युवराज ढमाले कॉर्प प्रस्तुत आणि चाटे ग्रुप आॅफ एज्युकेशनच्या सहयोगाने ‘काव्यऋतू’ पुरस्काराचा वितरण सोहळा व कविसंमेलन सोमवारी (दि. १३) आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या लोगोचा अनावरण सोहळा ज्येष्ठ गझलकार रमण रणदिवे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, ज्येष्ठ कवी हिमांशू कुलकर्णी, कवयित्री आश्लेषा महाजन या मान्यवरांच्या हस्ते झाला. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांनी स्वागत केले. या वेळी कवींनी कवितेच्या निर्मितीची प्रक्रिया, कवितेची सद्य:स्थिती यावर प्रकाश टाकत कवितांचे सादरीकरण करत वातावरण ‘शब्द शब्द जपून ठेव’ असे केले.रमण रणदिवे म्हणाले, ‘खेड्यापाड्यातही कविता लिहिली जात आहे, हे आशादायी चित्र आहे. कविता म्हणजे रक्त-मांसाच्या अस्तित्वाला आलेला जाणिवांचा मोहोर असतो. कविता माणसाच्या मनातला कोलाहल असतो. चुकून झालेला अथवा मुद्दाम केलेला स्पर्श स्त्रीला अचूक कळतो, त्याप्रमाणे मुद्दाम केलेली कविता चाणाक्ष रसिकाला अचूक कळते. त्यामुळे कविता अत्यंत जबाबदारीने लिहिली पाहिजे. मानवी नातेसंबंधातील लळ्यापेक्षा कवितेचा लळा अथांग असतो. कविता सर्वांत प्रामाणिक आणि सोबत करणारी असते. समाजाच्या संक्रमण काळात कवीने प्रामाणिकपणे मार्गदर्शन करायचे असते, मानवतेची मंदिरे वाचवायची असतात. ’आश्लेषा महाजन म्हणाल्या, ‘मी कवितेतून बोलते, कवितेचा विचार करते म्हणून मला कविता स्फुरते. कविता सुचण्याचा क्षण अत्यंत आनंद देणारा असतो. दृकश्राव्य माध्यमे प्रभावी होत असतानाही कवितेचे अस्तित्व टिकून आहे. सध्या अभिरुची आणि अभिव्यक्तीचे लोकशाहीकरण झाले आहे. या काळातही कविता अंतर्मुख करते. कवीने स्वान्तसुखाय लिहिलेली कविता इतरांपर्यंत प्रभावीपणे पोहोचते. रसिकांना, वाचकांच्या मनात शिरून त्यांचेच भाव प्रतिबिंबित करणारी, शाश्वत मूल्ये देणारी, प्रकाशाकडे नेणारी कविता लिहिण्याचा माझा प्रयत्न असतो. कवितेतून उमटणारे सकारात्मक भाव प्रेरणा देतात.’जागतिकीकरणानंतर निर्माण झालेला जगण्याचा तीव्र संघर्ष आणि अस्तित्वाचा प्रश्न कवी ताकदीने मांडत आहेत. आजची मराठी कविता केवळ पुण्या-मुंबईची राहिलेली नाही, ग्रामीण भागातील कवीही दर्जेदार लेखन करत आहेत. कविता अत्यंत छान वळणावर पोहोचलेली आहे. कवितेची विविध विलोभनीय रूपे मनाला भावतात.’कविता शिकवता येत नाही१ कविता ही व्यक्तिसापेक्ष असते. कोणाला कोणती कविता आवडावी, हे पूर्णपणे व्यक्तीच्या अभिरुचीवर अवलंबून असते. कविता शिकवता येत नाही किंवा कार्यशाळा घेता येत नाही.२ मी कविता करत नाही, तर ती आतून येते. जीवनाकडे कानांनी पाहतो आणि डोळ्यांनी ऐकतो, तेव्हा कविता निर्माण होते. कवी दु:खी असेल तरच त्याला दु:खी कविता सुचतात, असे होत नाही. कवी प्रत्येक जीवनप्रवाहात सामील होतो.३ जीवनानुभवाकडे संवेदनशीलतेने पाहण्याची दृष्टी कविता शिकवून जाते. आजकाल आयुष्याचा आकृतिबंध मर्यादित झाला आहे. दीर्घकविता वाचायला, ऐकायला कोणाकडे वेळ नाही. मात्र, कवितेला मोजपट्टी कशी लावणार, हाही प्रश्न आहे, असे कवी हिमांशू कुलकर्णी यांनी सांगितले.