शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जागतिक महिला दिन विशेष : साहित्य प्रकारांतील ‘या ’ प्रांतात महिलांची वानवा का? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 07:00 IST

कथा, कादंबरी, काव्य, गझल, बालसाहित्य आदी प्रकारांत महिलांनी दिलेले योगदान उल्लेखनीय...मात्र,

ठळक मुद्देपूर्वीपासूनच पुरुषांइतके व्यासपीठ, स्वातंत्र्य महिलांच्या वाट्याला कमी प्रमाणात ललित लेखन किंवा भावनाप्रधान विषय मांडताना तुलनेत तितक्या अभ्यासाची नसते आवश्यकता

दीपक कुलकर्णी -पुणे : पुरुषी वर्चस्ववादी परंपरेची चौकट मोडून महिलांनी आजमिताला वैविध्यपूर्ण क्षेत्रात यशाची नवनवीन शिखिरे काबीज केली आहे. त्यात शिक्षण, कला, क्रीडा, नोकरी, व्यवसाय यांसोबतच साहित्य क्षेत्राचा समावेश होतो. साहित्य विश्वात कथा, कादंबरी, काव्य, गझल, बालसाहित्य आदी प्रकारांत महिलांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. मात्र, ऐतिहासिक, विज्ञानकथा, रहस्य, किंवा विनोदी असे साहित्यप्रकार हाताळण्यामध्ये महिलांचे प्रमाण अगदी बोटावर मोजण्याइतपत आहे. नेमके हे साहित्य प्रकार स्त्री लेखिकांकडून उपेक्षित राहण्यापाठीमागचे वास्तव काय असा सवाल उपस्थित होतो. जागतिक महिला दिनानिमित्त (दि. ८ मार्च ) ‘लोकमत’ने या साहित्य विश्वातील मान्यवर महिलांशी साधलेल्या संवादातून टाकलेला प्रकाशझोत. मराठी साहित्यामध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिला कार्यरत आहे. त्यांनी इतर भाषेतील साहित्याचे अनुवाद सुध्दा तितक्यात हिरीरीने केले आहे. हे साहित्य प्रकार हाताळताना स्त्रीवादी चळवळीला न्याय देण्याचा यथोचित प्रयत्न केला आहे. पण साहित्य विश्वातील ऐतिहासिक, वैज्ञानिक, व रहस्य प्रकार हाताळणाऱ्या महिलांचे प्रमाण कमी जाणवते. याविषयी ज्येष्ठ कवयित्री डॉ. अश्विनी धोंगडे म्हणाल्या, आपल्या इतिहासामध्ये पुरुषी वर्चस्ववाद पाहायला मिळतो. त्यात स्त्रीला मिळालेली दुय्यम वागणूक, तिच्यावर झालेले अत्याचार असे कटू अनुभव पदरी आहे. त्यात इतक्या वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर आता कुठेतरी स्त्री- पुरुष समानतेचा धागा गुंफण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे भूतकाळात रमण्यापेक्षा वर्तमानावर आधारित लेखनावर स्त्रिया जास्त भर देतात. त्या आपल्या भावना कथा, काव्य, कादंबरी यांच्या माध्यमातून व्यक्त होतात. त्याउलट विज्ञान, रहस्य, इतिहास या साहित्य प्रकारांमध्ये अभ्यास, संशोधन फार महत्वाचे ठरते. आणि कुटुंब व्यवस्था, नोकरीच्या धावपळीत लेखनासाठी तितकासा वेळ देणे शक्य होत नाही. त्यामुळे कदाचित हे साहित्य प्रकार महिलांकडून दुर्लक्षित राहिले.         किशोर मासिकाच्या माजी संपादिका व ज्येष्ठ लेखिका ज्ञानदा नाईक म्हणाल्या, ऐतिहासिक, विज्ञान, रहस्य या विषयांत लेखन करताना महिला अभावानेच दिसतात. कारण त्या क्षेत्रातले लेखन तसे सोपे नाही. त्यासाठी वाचन, संशोधन यांच्या अभिरुचीसोबतच चिंतन, संयम,मनन यांची बैठक लागते. तसेच पुरेसा वेळ देणेही गरजेचे असते. मात्र, ललित लेखन किंवा भावनाप्रधान विषय मांडताना तुलनेत तितक्या अभ्यासाची आवश्यकता नसते. मुळातच आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे मराठी साहित्यात काव्य, कादंबरी, कथा यांच्या तुलनेत विज्ञान, रहस्य किंवा ऐतिहासिक साहित्य निर्मितीचे प्रमाणच नगण्य आहे. मात्र, नवीन पिढी महिला ही कमतरता भरुन काढेल याची खात्री वाटते.कारण त्यांची दुर्लक्षित बाबींमध्ये काम करण्यासाठीची धडपड, नवनिर्मितीची ओढ ही वाखाण्ण्याजोगी आहे.  ..............मराठी साहित्यात स्त्रियांचे योगदान जसे नाकारता येत नाही तसे काही साहित्य प्रकार हाताळण्यात त्यांचे प्रमाण कमी आहे हे वास्तव देखील विसरुन चालणार नाही. स्त्री पुरुष समानता समाजात रुजत असली तरी कौटुंबिक पार्श्वभूमीवर लहानपणापासून जोपासले जाणारे स्त्री- पुरुष यांच्यातले काही गोष्टीतले बेसिक फरक ऐतिहासिक, विज्ञान, रहस्य यांसारख्या साहित्य प्रकारात लेखन करताना महिलांन अडथळे ठरतात. पूर्वीपासूनच पुरुषांइतके व्यासपीठ, स्वातंत्र्य महिलांच्या वाट्याला कमी प्रमाणात आले आहे. देवयानी अभ्यंकर, कॉन्टिनेन्टल प्रकाशन 

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्यhistoryइतिहासscienceविज्ञानWomenमहिला