शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

झोपडपट्ट्यांमधील जगणंच धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 12:34 AM

लोकमत पाहणी : दाटीवाटीमुळे आगीच्या घटना

पुणे : मिळेल तेथे, वाटेल तशी बांधलेली घरे.... कच्चा बांधकामांवर चढवलेले मजलेच मजले... बेकायदेशीरपणे विजेच्या खाबांवर टाकलेले आकडे.... गॅस रीफीलिंग, बेकरीसारखे अनेक धोकादायक धंदे.... एका माणसाला पायी जाणेदेखील कठीण होईल या पद्धतीने सोडलेली दोन झोपट्यांमधील जागा.... चिंचोळे रस्ते.. ड्रेनेजलाईन, चेंबरवरच उभारलेली घरे... यामुळे अनेक ठिकाणी पुरेसा सूर्यप्रकाशदेखील येऊ शकत नाही... या परिस्थितीमुळे एखाद्या आजारी व्यक्तींला तातडीची मदत लागली तरी मिळणे कठीण... आशा ठिकाणी आग किंवा अन्य कोणत्याही प्रकारची आपत्ती आली तर अग्निशामक बंब, अ‍ॅम्ब्युलन्स पोहोचणेदेखील कठीण... अशा भयानक स्थितीत शहराच्या एकूण लोकसंख्येच्या तब्बल ४२ टक्के म्हणजे १४ लाखांपेक्षा अधिक लोक दररोजचे आपले मरण डोळ्यांसमोर ठेवून जीवन जगत असल्याचे ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीत दिसून आले.

शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट झोपडपट्टीला बुधवारी आग लागली आणि तब्बल शंभराहून अधिक झोपड्या खाक झाल्या. झोपडपट्टीला आग लागल्यानंतर काही वेळातच ३० हून अधिक अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले; परंतु आग विझविण्यासाठी आत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने अग्निशामक दलाच्या जवानांना प्रचंड कसरत करावी लागली. या पार्श्वभूमीवर, शहरातील प्रमुख लोहियानगर वसाहत, मीनाताई ठाकरे वसाहत, रामनगर वसाहत व जनता वसाहत येथे जाऊन प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पाहणी केली. यामध्ये वरील वास्तव समोर आले.झोपडपट्टी दादांमुळे अतिक्रमण वाढतेसध्या शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढलेले आहे. याला सर्वांधिक जबाबदार झोपडपट्टी दादा असून, आपली लीडरशिप वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक अतिक्रमण वाढविण्यास ते प्रोत्सहान देतात. यामुळे पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण येतो. झोपडपट्ट्यांकडे व्हॉट बँक म्हणून पाहण्याच्या दृष्टिकोन बदलल्यास नक्कीत बदल होईल. - डॉ. सिद्धार्थ धेंडे, उपमहापौरलोहियानगर वसाहत : लोहियानगर वसाहतीत प्रचंड दाट लोकवस्ती असून, गल्यांमधील रस्ते एकदम चिंचोळे आहेत. लोहियानगर भागात कच्च्या बांधकामावर तीन-चार मजले उभारले आहेत. यामध्ये अनेक ठिकाणी विजेच्या तारा धोकादायक पद्धतीने घरांच्या पत्र्याला लागल्या आहेत. त्यामुळे शॉर्ट सर्किट होण्याचा प्रचंड धोका असल्याचे निदर्शनास आले.मीनाताई ठाकरे वसाहतया वसाहतीत एकूण १७ मुख्य गल्ल्या आहेत. या सर्व गल्ल्यांना जोडणारा एक समांतर मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर अग्निशामक दलाची गाडी येऊ शकते. परंतु, अंतर्गत रस्ते खूपच अरुंद आहेत. काही गल्ल्यांतून दुचाकीही जाऊ शकत नाही इतक्या अरुंद आहेत, तर काही वसाहतींमध्ये लघुउद्योग तसेच विविध प्रकारची दुकाने आहेत. हे लघुउद्योग अत्यंत असुरक्षितरीत्या चालवले जात असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी दुमजली, तीन मजली घरे आहेत. दुर्घटनेच्या वेळी या घरांतून ताबडतोब बाहेर पडणे अशक्य आहे. येथील लोक खूप दाटीवाटीने राहत असल्याचे दिसून आले, तसेच नागरी सुविधांचा अभाव दिसून आला.जनता वसाहत : प्रचंड दाट लोकवस्ती, गल्ल्यांमधून एकदम चिंचोळे रस्ते, डोंगराच्या पायथ्याशी असल्याने पावसाळ्यात मोठा पाऊस झाला तर खालच्या घरांमध्ये पाणी जाते, वरील सर्व कचरा पावसाने खाली येऊन मोठ्या प्रमाणात घाण साठते, वसाहतीत एकूण १०८ गल्ल्या असून, अग्निशामक दलाची गाडी ७०व्या गल्लीपर्यंतेच जाते. त्यामुळे मोठी दुर्घटना घडल्यास आपत्तकालीन यंत्रणाच पोहोचणे कठीण आहे.