शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

‘विश्व संमेलन’ लाडके अन् ‘अखिल भारतीय’ मात्र दोडके..!

By श्रीकिशन काळे | Updated: January 23, 2025 18:28 IST

मराठी संमेलनासाठी दुजाभाव का ?, अनिवासी भारतीयांचा अनुदानाला नकार

पुणे : एकीकडे दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुढील महिन्यात होत आहे, त्याला रेल्वेसाठी तिप्पट दर आकारला आहे. तर दुसरीकडे मात्र सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे होऊ घातलेल्या तिसऱ्या विश्व मराठी संमेलनासाठी परदेशातून येणाऱ्या मराठी व्यक्तींना ७५ हजार रूपये अनुदान देण्यात येणार आहे. सरकारकडून असा दुजाभाव का केला जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. सरकारचे अनुदान परदेशी मराठी लोकांनी स्वीकारू नये, असे आवाहन कॅलिफोर्नियामधील मराठी भाषक अभय पाटील यांनी केले.

दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जाणाऱ्यांसाठी रेल्वे तिकिटातही सूट देण्यात आलेली नसताना ‘विश्व मराठी संमेलना’साठी परदेशातून येणाऱ्या अनिवासी मराठीजनांना तब्बल ७५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. दोन्ही संमेलनांचे स्वतंत्र उद्देश असले, तरी मराठी हा समान धागा असताना सरकारी पातळीवरील या विरोधाभासाची साहित्य वर्तुळात चर्चा आहे. दुसरीकडे, अमेरिकेतीलच मराठीजनांनी करदात्यांच्या पैशांतून मिळणारे हे अनुदान नाकारण्याची भूमिका घेतली आहे.

महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने पुण्यात ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान विश्व मराठी संमेलन घेण्यात येत आहे. त्यासाठी परदेशी मराठी लोकांना आमंत्रण दिले आहे. तसेच संमेलनाला येणाऱ्या परदेशी मराठी लोकांना प्रवास खर्चापोटी प्रत्येकी ७५ हजार रुपये अनुदान महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येणार आहे. खरंतर परदेशी व्यक्तींना सरकारकडे अनुदान देण्याची मागणी केली नव्हती. तरी देखील सरकारकडून अनुदान जाहीर केले.

-----------------------------

‘विश्व मराठी संमेलनांसाठी कोणीही अनुदानाची मागणी केली नव्हती. तरी राज्य सरकार प्रत्येकी ७५ हजार रुपये देते. पण परदेशातील काही मंडळी दर वर्षी ते पैसे घेत नाहीत. स्वीकारू नये असेही आवाहन करतात. तरी देखील महाराष्ट्र सरकार ते पैसे देतच राहते. दुसरीकडे, मात्र दिल्लीतील संमेलनासाठी केंद्र सरकार रेल्वे प्रवासात सवलत द्यायला तयार नाही. असा दुजाभाव सरकारच्या प्रतिमेला बाधा आणणारा आहे. - श्रीपाद भालचंद्र जोशी, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष

...म्हणून अनुदान देतो !काही दिवसांपूर्वी पुण्यात मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते की, परदेशातील व्यक्ती विश्व संमेलनाला येतात. ते महाराष्ट्राचेच असतात. त्यामुळे त्यांनी या संमेलनात सहभागी व्हावे, म्हणून त्यांना अनुदान दिले जाते.’’अनुदान घेऊ नका !महाराष्ट्र सरकार विश्व संमेलनाला येणाऱ्यांना अनुदान देणार आहे. पण ते घेऊ नये असे आवाहन कॅलिफोर्नियामधील मराठी भाषक अभय पाटील यांनी केले. पाटील यांच्या पत्राची बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष प्रसाद पानवलकर यांनी देखील दखल घेतली. त्यांनी पाठिंबा दिला. ती रक्कम इतर चांगल्या कामासाठी द्यावी, असेही त्यांनी सूचवले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रmarathiमराठी