शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

‘विश्व संमेलन’ लाडके अन् ‘अखिल भारतीय’ मात्र दोडके..!

By श्रीकिशन काळे | Updated: January 23, 2025 18:28 IST

मराठी संमेलनासाठी दुजाभाव का ?, अनिवासी भारतीयांचा अनुदानाला नकार

पुणे : एकीकडे दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुढील महिन्यात होत आहे, त्याला रेल्वेसाठी तिप्पट दर आकारला आहे. तर दुसरीकडे मात्र सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे होऊ घातलेल्या तिसऱ्या विश्व मराठी संमेलनासाठी परदेशातून येणाऱ्या मराठी व्यक्तींना ७५ हजार रूपये अनुदान देण्यात येणार आहे. सरकारकडून असा दुजाभाव का केला जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. सरकारचे अनुदान परदेशी मराठी लोकांनी स्वीकारू नये, असे आवाहन कॅलिफोर्नियामधील मराठी भाषक अभय पाटील यांनी केले.

दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जाणाऱ्यांसाठी रेल्वे तिकिटातही सूट देण्यात आलेली नसताना ‘विश्व मराठी संमेलना’साठी परदेशातून येणाऱ्या अनिवासी मराठीजनांना तब्बल ७५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. दोन्ही संमेलनांचे स्वतंत्र उद्देश असले, तरी मराठी हा समान धागा असताना सरकारी पातळीवरील या विरोधाभासाची साहित्य वर्तुळात चर्चा आहे. दुसरीकडे, अमेरिकेतीलच मराठीजनांनी करदात्यांच्या पैशांतून मिळणारे हे अनुदान नाकारण्याची भूमिका घेतली आहे.

महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने पुण्यात ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान विश्व मराठी संमेलन घेण्यात येत आहे. त्यासाठी परदेशी मराठी लोकांना आमंत्रण दिले आहे. तसेच संमेलनाला येणाऱ्या परदेशी मराठी लोकांना प्रवास खर्चापोटी प्रत्येकी ७५ हजार रुपये अनुदान महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येणार आहे. खरंतर परदेशी व्यक्तींना सरकारकडे अनुदान देण्याची मागणी केली नव्हती. तरी देखील सरकारकडून अनुदान जाहीर केले.

-----------------------------

‘विश्व मराठी संमेलनांसाठी कोणीही अनुदानाची मागणी केली नव्हती. तरी राज्य सरकार प्रत्येकी ७५ हजार रुपये देते. पण परदेशातील काही मंडळी दर वर्षी ते पैसे घेत नाहीत. स्वीकारू नये असेही आवाहन करतात. तरी देखील महाराष्ट्र सरकार ते पैसे देतच राहते. दुसरीकडे, मात्र दिल्लीतील संमेलनासाठी केंद्र सरकार रेल्वे प्रवासात सवलत द्यायला तयार नाही. असा दुजाभाव सरकारच्या प्रतिमेला बाधा आणणारा आहे. - श्रीपाद भालचंद्र जोशी, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष

...म्हणून अनुदान देतो !काही दिवसांपूर्वी पुण्यात मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते की, परदेशातील व्यक्ती विश्व संमेलनाला येतात. ते महाराष्ट्राचेच असतात. त्यामुळे त्यांनी या संमेलनात सहभागी व्हावे, म्हणून त्यांना अनुदान दिले जाते.’’अनुदान घेऊ नका !महाराष्ट्र सरकार विश्व संमेलनाला येणाऱ्यांना अनुदान देणार आहे. पण ते घेऊ नये असे आवाहन कॅलिफोर्नियामधील मराठी भाषक अभय पाटील यांनी केले. पाटील यांच्या पत्राची बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष प्रसाद पानवलकर यांनी देखील दखल घेतली. त्यांनी पाठिंबा दिला. ती रक्कम इतर चांगल्या कामासाठी द्यावी, असेही त्यांनी सूचवले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रmarathiमराठी