शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

भादलवाडी येथील कामगाराचा आजारपणामुळे मृत्यू, कंपनीने दुर्लक्ष केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 00:07 IST

नीरा-भीमा स्थिरीकरणांतर्गत नदीजोड प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. अकोले, भादलवाडी या ठिकाणी या प्रकल्पांतर्गत बोगद्याचे काम सुरू आहे.

पळसदेव  - नीरा-भीमा स्थिरीकरणांतर्गत नदीजोड प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. अकोले, भादलवाडी या ठिकाणी या प्रकल्पांतर्गत बोगद्याचे काम सुरू आहे. दरम्यान, भादलवाडी येथे सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी बुधवारी (दि. ६) दुपारी एका कामगाराचा अचानक मृत्यू झाला. दरम्यान गेले तीन दिवस हा कामगार आजारी असल्याचे सांगितले जात असून, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप तेथील कामगारांनी केला आहे.राकेशकुमार श्रीकुमार झारीया (वय ४५, रा. जबलपूर, मध्य प्रदेश) असे मृत्यू पावलेल्या कामगाराचे नाव आहे. राकेशकुमार याचा मृत्यू आजारपणामुळे झाला असे सांगितले असले तरीसुद्धा त्याचा मृत्यू संशयास्पद असल्याने त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.दरम्यान जोपर्यंत कंपनीचे अधिकारी या ठिकाणी येत नाहीत, तसेच या ठिकाणी शवविच्छेदन करण्यात येणार नाही, तोपर्यंत मृतदेहाला हात लावू दिला जाणार नाही असा पवित्रा कामगारांनी घेतला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.गेले तीन दिवस कामगार मृत्यूशी झुंंजत असताना एकही अधिकारी फिरकला नाही. त्यामुळेच त्याला वेळीच उपचार मिळाले नाहीत असाही आरोप कामगरांनी केला. पोलीस आल्यावरही सुमारे अर्धा तास मृतदेहाला हात लावूदिला नाही.त्यामुळे अखेर भिगवणचे पोलीस उपनिरीक्षक पवार, पोलीस कर्मचारी सातपुते, राऊत, यांनी या ठिकाणी आपली फिर्याद लिहून घेण्याचे आश्वासन दिले. त्या वेळी कामगार शांत झाले.दुपारी बारा ते सायंकाळी सहापर्यंत मृतदेह पडूनदुपारी बारा वाजता मयत झालेल्या कामगाराचा मृतदेह सायंकाळी सहा वाजेपर्यंत तसाच होता. परंतु दिवसभर कंपनीचा एकही वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी फिरकला नाही. दुपारी तीन वाजता जलसंपदा खात्याचा एक अधिकारी व इतर कंपनीचे कनिष्ठ अधिकारी आले. दरम्यान दिवसभर बोगद्याचे काम बंद होते. अखेर पोलिसांनी फिर्याद लिहून घेतल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनाठी हलविण्यात आला.

टॅग्स :Deathमृत्यूPuneपुणे