शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

भादलवाडी येथील कामगाराचा आजारपणामुळे मृत्यू, कंपनीने दुर्लक्ष केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 00:07 IST

नीरा-भीमा स्थिरीकरणांतर्गत नदीजोड प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. अकोले, भादलवाडी या ठिकाणी या प्रकल्पांतर्गत बोगद्याचे काम सुरू आहे.

पळसदेव  - नीरा-भीमा स्थिरीकरणांतर्गत नदीजोड प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. अकोले, भादलवाडी या ठिकाणी या प्रकल्पांतर्गत बोगद्याचे काम सुरू आहे. दरम्यान, भादलवाडी येथे सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी बुधवारी (दि. ६) दुपारी एका कामगाराचा अचानक मृत्यू झाला. दरम्यान गेले तीन दिवस हा कामगार आजारी असल्याचे सांगितले जात असून, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप तेथील कामगारांनी केला आहे.राकेशकुमार श्रीकुमार झारीया (वय ४५, रा. जबलपूर, मध्य प्रदेश) असे मृत्यू पावलेल्या कामगाराचे नाव आहे. राकेशकुमार याचा मृत्यू आजारपणामुळे झाला असे सांगितले असले तरीसुद्धा त्याचा मृत्यू संशयास्पद असल्याने त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.दरम्यान जोपर्यंत कंपनीचे अधिकारी या ठिकाणी येत नाहीत, तसेच या ठिकाणी शवविच्छेदन करण्यात येणार नाही, तोपर्यंत मृतदेहाला हात लावू दिला जाणार नाही असा पवित्रा कामगारांनी घेतला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.गेले तीन दिवस कामगार मृत्यूशी झुंंजत असताना एकही अधिकारी फिरकला नाही. त्यामुळेच त्याला वेळीच उपचार मिळाले नाहीत असाही आरोप कामगरांनी केला. पोलीस आल्यावरही सुमारे अर्धा तास मृतदेहाला हात लावूदिला नाही.त्यामुळे अखेर भिगवणचे पोलीस उपनिरीक्षक पवार, पोलीस कर्मचारी सातपुते, राऊत, यांनी या ठिकाणी आपली फिर्याद लिहून घेण्याचे आश्वासन दिले. त्या वेळी कामगार शांत झाले.दुपारी बारा ते सायंकाळी सहापर्यंत मृतदेह पडूनदुपारी बारा वाजता मयत झालेल्या कामगाराचा मृतदेह सायंकाळी सहा वाजेपर्यंत तसाच होता. परंतु दिवसभर कंपनीचा एकही वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी फिरकला नाही. दुपारी तीन वाजता जलसंपदा खात्याचा एक अधिकारी व इतर कंपनीचे कनिष्ठ अधिकारी आले. दरम्यान दिवसभर बोगद्याचे काम बंद होते. अखेर पोलिसांनी फिर्याद लिहून घेतल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनाठी हलविण्यात आला.

टॅग्स :Deathमृत्यूPuneपुणे