शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

तेवीस कोटींच्या वाघोली वाढीव पाणीपुरवठा योजनेचे रखडले काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 15:24 IST

- ठेकेदाराचा आडमुठेपणा, महापालिका अधिकाऱ्यांची निष्क्रियता; पाण्याविना वाघोलीकरांचे हाल

वाघोली : मागील सहा वर्षांपासून वाघोलीची वाढीव पाणीपुरवठा योजना रखडलेली आहे. यासाठी २३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. फक्त भिजलेले रोहित्र बसविणे बाकी आहे. मात्र, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे काम पुढे जात नाही. अधिकारी बघ्याच्या भूमिकेत असल्याने वाघोलीकरांना पाण्याच्या समस्येशी तोंड द्यावे लागत आहे.

पीएमआरडीए अंतर्गत २०१९ मध्ये वाघोलीची वाढीव पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेशी संबंधित पाच दशलक्ष लिटर क्षमता असणाऱ्या योजनेसाठी २३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वाघोली-आव्हाळवाडी भागासाठी पिण्याचे पाणी वढू खुर्द येथील बंधाऱ्यामधून आणले जाणार आहे.

या योजनेचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे;  मात्र सहा वर्षांपासून शिल्लक १० टक्के काम पूर्ण झालेले नाही. वढू येथील जॉकवेलजवळील बंधाऱ्यावर विजेचे रोहित्र बसविण्याचे काम आणि काही किरकोळ काम बाकी आहे. मात्र, असे काम एक वर्षापासूनही पूर्ण झालेले नाही. रोहित्र बसवल्यानंतर चाचणी करून वाघोलीकरांसाठी पाणीपुरवठा सुरू केला जाईल. ठेकेदार काम वेळेत पूर्ण न केल्यामुळे पीएमआरडीएने त्याला दंडही ठोठावला आहे.

तरीही ठेकेदार सतत अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे अधिकारी सांगतात. ठेकेदाराने 'जोपर्यंत दंडाची रक्कम रद्द केली जात नाही तोपर्यंत काम करणार नाही' अशी आडमुठेपणाची भूमिका घेतली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सध्या वाघोलीत पूर्वीच्या पाणीपुरवठा योजनेतून काही भागाला पाणी मिळते. मात्र, सोसायटींना वर्षाला लाखो रुपये खर्च करून टँकरने पाणी विकत घ्यावे लागते. या सगळ्या प्रकारांमुळे वाघोलीकर आणि सोसायटीतील नागरिकांमध्ये संताप व्यक्त झाला आहे. याच्या विरोधात वाघोलीतील नागरिकांनी रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. वाघोलीकरांकडून अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त करण्यात येत असल्याचे विजय जाचक म्हणाले.

कामाच्या भिंतींना भेगा

जलशुद्धीकरण परिसराची दुरवस्था झाली असून या केंद्र परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडी, झुडपे वाढली आहेत. या ठिकाणी दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत. योजनेचा माहिती फलक गायब आहे. कामाच्या भिंतींना भेगा पडल्या आहेत.

नागरिक काय म्हणतात ?

काम पूर्ण करून घेणे हे पीएमआरडीएची जबाबदारी आहे. मात्र सहा वर्षे झाली तरी काम पूर्ण होत नाही. अधिकारी आणि ठेकेदार यांची अनास्था किती वाटते! महिनाभरात काम झाले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा स्थानिक रहिवाशी प्रकाश जमधडे यांनी दिला. आम्ही १५ वर्षापासून वाघोलीत राहतो. तेव्हापासून पाण्याशिवाय हाल होतात. वर्षाला लाखो रुपये टँकरवर खर्च करतो. पालिकेचा कर चुकत नाही. याचे दोषी अधिकारी का? की ठेकेदार? असा प्रश्न सुधीर बेंद्रे यांनी केला. प्रदीप सातव म्हणतात, शासन एवढे उदासीन का आहे? एक प्रकल्प वेळेत पूर्ण करू शकत नाही? कर भरणाऱ्याला वर्षाला लाखो रुपये पाण्यावर का खर्च करावे लागतात? हे काम पूर्ण न होणे यासाठी अधिकारी जबाबदार आहेत.

वढू खुर्द येथील बंधाऱ्यावर रोहित्र बसविण्याचे काम बाकी असून ते लवकर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लवकरच योजना सुरू केली जाईल.- विवेक विसपुते, उपअभियंता, पीएमआरडीए 

English
हिंदी सारांश
Web Title : Wagholi's Water Supply Project Delayed, Despite Funds Allocation: Residents Angered

Web Summary : Wagholi's ₹23 crore water project is stalled for six years due to official apathy and contractor delays. Only a transformer needs installing. Residents face water scarcity, buying water via tankers. Frustrated citizens threaten protests over the stalled project.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड