शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शब्दफुलांनी सुरांना बहर : काव्य आणि गझल मैफल रंगली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 02:12 IST

निमित्त होते ज्येष्ठ गझलकार रमण रणदिवे यांच्या सत्तरीतील पदार्पणानिमित्त सर्वोत्कर्ष पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित ‘रेशीमधागे’ या काव्य आणि गझल मैफलीचे.

पुणे : संगीतातल्या जाणिवा काव्य लेखनासाठी उपयुक्त ठरत असल्याने शब्दांमध्ये दडलेले सूर नकळतपणे ऐकू येऊ लागतात. मनाच्या आंतरिकतेमध्ये एकप्रकारे संगीत सुरू असते, अशी शब्दांची सुंदरपणे गुंफण करणाऱ्या ज्येष्ठ गझलकार रमण रणदिवे यांच्या काव्यशब्दांमधून बहरलेल्या सुरांच्या अद्वैतामध्ये रसिक तादात्म्य पावले. मनासारखे कळते का?, तो गुलाबी वेदनांचा, तुझीच लाट शोधते अजून सागरात मी, अशा एकेक गझलांमधून शब्दरूपी फुलांची ओंजळ रसिकांसमोर रिती झाली.. आणि त्या सुमनांच्या सुगंधात रसिक देहभान हरपले.

निमित्त होते ज्येष्ठ गझलकार रमण रणदिवे यांच्या सत्तरीतील पदार्पणानिमित्त सर्वोत्कर्ष पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित ‘रेशीमधागे’ या काव्य आणि गझल मैफलीचे. भावगीतात भाव आणि गझलमध्ये रंग असतात. गझल सुखदु:खाची मिरवणूक नसते ते जीवनानुभवाचे छोटे छोटे तुकडे असतात. विविध वेगळे भाव गझलमध्ये उमटतात असे सांगून रमण रणदिवे एकीकडे गझलचे अंतरंग उलगडत होते आणि दुसरीकडे अनुराधा मराठे, राजेश दातार, योगीता गोडबोले यांच्या कंठस्वरातून रणदिवे यांच्या गझलचे शब्द रसिकांच्या हृदयाचा नकळतपणे ठाव घेत होते. शब्द आणि सुरांचा अद्वितीय संगम रसिकांनी मैफलीत अनुभवला. रणदिवे यांचे तीन सुपुत्र नीलेश, निखिल आणि नितीश रणदिवे मैफलीमध्ये वादनाची साथ करीत होते, हे या कार्यक्रमाचे वेगळेपण ठरले.चंद्र मागू कसा उधार तुझा, कळे ना लाजताना हा कसा रागावला चाफा या रचनेतील भाव अनुराधा मराठे यांनी स्वरांमधून सुंदरपणे व्यक्त केले. राजेश दातार यांनी मनासारखे कळते का?, तो गुलाबी वेदनांचा, जमेल तेव्हा जमेल त्याने जमेत घ्यावे गाणे या गझलचे सादरीकरण करून सायंकाळच्या गर्द अंधारात प्रकाशाची अनुभूतीदिली.तुझीच लाट शोधते अजून सागरात मी, रे सावळ्या घना बरसून जा, धुंद असू दे चंद्र नभिचा, धुंद असू दे रात्र या योगीता गोडबोले यांच्या स्वरांमध्ये रसिक हरवून गेले. श्रीपाद उंब्रेकर यांनी सुंदर संवादातून मैफलीची एकेक कडी गुंफली.कलाकाराच्या पाठीवर कौतुकाची थाप हवी४कलाकारांच्या पाठीवर आशीर्वादाच्या कौतुकाची थाप आणि मित्रांचा हातात हात असावा लागतो, अशी भावना रमण रणदिवे यांनी व्यक्त केली. शांताबाई शेळके यांनी पहिल्या गझलच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली होती. त्यांच्याशी घरोब्याचे सूर जुळले होते.४कुणालाही विचार करून लिहिता येणार नाही अशा त्या बोलायच्या. त्या गोष्टी वेल्हाळ होत्या. पहिला संग्रह १९९० मध्ये आला. तेव्हा शंकर वैद्य, शांता शेळके, सुरेश भट, सुरेशचंद्र नाडकर्णी यांच्यासारख्या प्रज्ञावंतांच्या प्रकाशवनात माझी कविता पारखून घेता आली, याचा मनस्वी आनंद होतो. कलावंताने तृप्त असू नये विद्यार्थी राहायला हवे असे त्यांनी सांगितले.गटा-तटाचे राजकारणआज सर्वच क्षेत्रात गटा-तटाचे राजकारण आहे. कलाकारांनाही गटा-तटाच्या राजकारणाला सामोरे जावे लागते अशा शब्दांत रमण रणदिवे यांनी कलाकारांची व्यथा मांडली.माहिती नसणारेच कार्यशाळा घेतातगझलच्या तंत्राची माहिती नाही ते गझलच्या कार्यशाळा घेतात. स्वत: निसरड्या रस्त्यावर उभे आहेत आणि इतरांना आधार द्यायचा प्रयत्न करतात, असे सांगून त्यांनी तथाकथित गझलकरांना फटकारले.

टॅग्स :Puneपुणे