शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शब्दफुलांनी सुरांना बहर : काव्य आणि गझल मैफल रंगली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 02:12 IST

निमित्त होते ज्येष्ठ गझलकार रमण रणदिवे यांच्या सत्तरीतील पदार्पणानिमित्त सर्वोत्कर्ष पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित ‘रेशीमधागे’ या काव्य आणि गझल मैफलीचे.

पुणे : संगीतातल्या जाणिवा काव्य लेखनासाठी उपयुक्त ठरत असल्याने शब्दांमध्ये दडलेले सूर नकळतपणे ऐकू येऊ लागतात. मनाच्या आंतरिकतेमध्ये एकप्रकारे संगीत सुरू असते, अशी शब्दांची सुंदरपणे गुंफण करणाऱ्या ज्येष्ठ गझलकार रमण रणदिवे यांच्या काव्यशब्दांमधून बहरलेल्या सुरांच्या अद्वैतामध्ये रसिक तादात्म्य पावले. मनासारखे कळते का?, तो गुलाबी वेदनांचा, तुझीच लाट शोधते अजून सागरात मी, अशा एकेक गझलांमधून शब्दरूपी फुलांची ओंजळ रसिकांसमोर रिती झाली.. आणि त्या सुमनांच्या सुगंधात रसिक देहभान हरपले.

निमित्त होते ज्येष्ठ गझलकार रमण रणदिवे यांच्या सत्तरीतील पदार्पणानिमित्त सर्वोत्कर्ष पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित ‘रेशीमधागे’ या काव्य आणि गझल मैफलीचे. भावगीतात भाव आणि गझलमध्ये रंग असतात. गझल सुखदु:खाची मिरवणूक नसते ते जीवनानुभवाचे छोटे छोटे तुकडे असतात. विविध वेगळे भाव गझलमध्ये उमटतात असे सांगून रमण रणदिवे एकीकडे गझलचे अंतरंग उलगडत होते आणि दुसरीकडे अनुराधा मराठे, राजेश दातार, योगीता गोडबोले यांच्या कंठस्वरातून रणदिवे यांच्या गझलचे शब्द रसिकांच्या हृदयाचा नकळतपणे ठाव घेत होते. शब्द आणि सुरांचा अद्वितीय संगम रसिकांनी मैफलीत अनुभवला. रणदिवे यांचे तीन सुपुत्र नीलेश, निखिल आणि नितीश रणदिवे मैफलीमध्ये वादनाची साथ करीत होते, हे या कार्यक्रमाचे वेगळेपण ठरले.चंद्र मागू कसा उधार तुझा, कळे ना लाजताना हा कसा रागावला चाफा या रचनेतील भाव अनुराधा मराठे यांनी स्वरांमधून सुंदरपणे व्यक्त केले. राजेश दातार यांनी मनासारखे कळते का?, तो गुलाबी वेदनांचा, जमेल तेव्हा जमेल त्याने जमेत घ्यावे गाणे या गझलचे सादरीकरण करून सायंकाळच्या गर्द अंधारात प्रकाशाची अनुभूतीदिली.तुझीच लाट शोधते अजून सागरात मी, रे सावळ्या घना बरसून जा, धुंद असू दे चंद्र नभिचा, धुंद असू दे रात्र या योगीता गोडबोले यांच्या स्वरांमध्ये रसिक हरवून गेले. श्रीपाद उंब्रेकर यांनी सुंदर संवादातून मैफलीची एकेक कडी गुंफली.कलाकाराच्या पाठीवर कौतुकाची थाप हवी४कलाकारांच्या पाठीवर आशीर्वादाच्या कौतुकाची थाप आणि मित्रांचा हातात हात असावा लागतो, अशी भावना रमण रणदिवे यांनी व्यक्त केली. शांताबाई शेळके यांनी पहिल्या गझलच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली होती. त्यांच्याशी घरोब्याचे सूर जुळले होते.४कुणालाही विचार करून लिहिता येणार नाही अशा त्या बोलायच्या. त्या गोष्टी वेल्हाळ होत्या. पहिला संग्रह १९९० मध्ये आला. तेव्हा शंकर वैद्य, शांता शेळके, सुरेश भट, सुरेशचंद्र नाडकर्णी यांच्यासारख्या प्रज्ञावंतांच्या प्रकाशवनात माझी कविता पारखून घेता आली, याचा मनस्वी आनंद होतो. कलावंताने तृप्त असू नये विद्यार्थी राहायला हवे असे त्यांनी सांगितले.गटा-तटाचे राजकारणआज सर्वच क्षेत्रात गटा-तटाचे राजकारण आहे. कलाकारांनाही गटा-तटाच्या राजकारणाला सामोरे जावे लागते अशा शब्दांत रमण रणदिवे यांनी कलाकारांची व्यथा मांडली.माहिती नसणारेच कार्यशाळा घेतातगझलच्या तंत्राची माहिती नाही ते गझलच्या कार्यशाळा घेतात. स्वत: निसरड्या रस्त्यावर उभे आहेत आणि इतरांना आधार द्यायचा प्रयत्न करतात, असे सांगून त्यांनी तथाकथित गझलकरांना फटकारले.

टॅग्स :Puneपुणे