शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

'हिंदू म्हणवून घेणाऱ्या स्त्रियांनी दररोज डॉ. आंबेडकरांच्या पायांचे पूजन केले पाहिजे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 19:38 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘हिंदू मॅरेज बिल’ याचा आग्रह धरला नसता तर आज हिंदू स्त्रियांचे काय झाले असते, याचा विचारही करवत नाही. त्यामुळे स्वत:ला हिंदू म्हणवून घेणाऱ्या सर्व स्त्रियांनी दररोज डॉ. आंबेडकर यांच्या पायांचे पूजन केले पाहिजे.

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘हिंदू मॅरेज बिल’ याचा आग्रह धरला नसता तर आज हिंदू स्त्रियांचे काय झाले असते, याचा विचारही करवत नाही. त्यामुळे स्वत:ला हिंदू म्हणवून घेणाऱ्या सर्व स्त्रियांनी दररोज डॉ. आंबेडकर यांच्या पायांचे पूजन केले पाहिजे. तसेच आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्यांनी आपल्या अनुयायांना मुस्लिम धर्माची दीक्षा दिली नाही, याचेही सर्व हिंदूंनी आयुष्यभर आभार मानले पाहिजेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी रविवारी केले.

स्वा. सावरकर वाङ्मय वक्तृत्व स्पर्धा समितीच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास समितीचे पदाधिकारी सु. ह. जोशी, विद्याधर नारगोलकर, दिलीप पुरोहित, आरती दातार, वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक मिलिंद वेर्लेकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी समितीतर्फे आयोजित वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण गोखले यांच्या हस्ते करण्यात आले. गोखले म्हणाले, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विज्ञानवाद लोकांना पटत नाही. गाय हा पशू आहे, असे सावरकरांनी सांगितल्याने स्वत:ला हिंदू म्हणवणारा सावरकर यांच्यापासून दूर जातो; ही दुर्दैवाची गोष्ट आहे. सावरकरभक्त, सावरकरप्रेमी बनण्यापेक्षा सावरकर विचारप्रेमी व्हावे, सावरकरांचे विचारच कदाचित आपल्या देशाला वाचवू शकतील. तसेच हिंदू आणि हिंदुत्वाची व्याख्या सावरकरांकडून मिळते; ती समजून घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. सावरकर आणि आंबेडकर एकत्र आले असते तर आजचा भारत वेगळा दिसला असता. सावरकरांनी कधीही दुसऱ्या धर्माचा द्वेष केला नाही. त्यामुळे संपूर्ण सावरकर समजून घेण्यासाठी कदाचित दुसरा जन्म घ्यावा लागेल. 

पुढेा ते म्हणाले की, 'देशातील आदर्शवत असणाऱ्या व्यक्तींना देवत्वाचे स्वरूप दिले जाते. मात्र, त्या व्यक्ती पूर्वी माणूसच होत्या. त्यांच्याकडूनही काही चूक झाल्या असतील. हे कोणीही मान्य करत नाही. देशाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे.सावरकरांची हिंदुत्वाची खरी व्याख्या समजून घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे ब्राह्मण ही जात नसून पदवी आहे. जो शुद्ध होतो तो बुद्ध होतो. तसेच आमचे श्रीराम मोठे, आमचे कृष्ण मोठे म्हणून आम्ही मोठे, असे म्हणणे चुकीचे आहे. त्यातच कथाकथित राजकारण्यांकडून जातीचे विष पेरले जाते. समाजातून नेहमी एकांगी विचार केला जातो आणि परंपरने दिलेल्या गोष्टी पुढे घेऊन जाण्याकडे लक्ष दिले जाते. परंतु, प्रत्येक गोष्टीचा दुसऱ्याही बाजूने विचार व्हायला हवा., असेही गोखले यांनी या वेळी सांगितले.

टॅग्स :Vikram Gokhaleविक्रम गोखलेDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीHinduहिंदूmarriageलग्न