शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
2
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
3
Mumbai: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसची प्रवाशांना धडक; अनेकजण जखमी
4
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
5
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
6
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
7
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
8
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
9
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
10
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
11
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
12
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
13
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
14
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
15
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
16
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
17
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
18
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
19
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
20
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
Daily Top 2Weekly Top 5

‘संगीतकार’ होण्यात स्त्रियांना रस नाही - उषा खन्ना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2020 22:38 IST

किशोरकुमार आाणि लता मंगेशकर यांच्यासोेबत ‘शायद मेरे शादी का खयाल आया है,’ या गाण्याचे रेकॉर्डिंग करत होतो, त्या वेळी किशोरदांनी अचानक गायक म्हणून स्वत: काही बदल केले. परंतु, ते बदल गाण्याची उंची वाढविणारे ठरले.

- दीपक कुलकर्णी   ‘‘वयाच्या सतराव्या वर्षी हिंदी सिनेमासृष्टीत गायिका होण्यासाठी आले; पण त्या वेळी लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्यासारख्या तगड्या गायिकांच्या आव्हानासमोर निभाव लागणे अशक्यप्राय वाटू लागले. आणि मग स्वत:च्या ध्येयाला थोडी कलाटणी देत सिनेमासृष्टीत संगीतकार म्हणून काम करण्याचे ठरविले. या पाच-सहा दशकांच्या कालावधीत अनेक सिनेमांना संगीत देण्याचे भाग्य लाभले. तरीदेखील रसिकांनी माझ्या सांगीतिक योगदानाला पूर्णपणे स्वीकारले नसल्याचे मनात होते; पण मागच्या वर्षी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मान झाला. हा पुरस्कार म्हणजे रसिकांचीच वाहवा असल्याची भावना मनात दाटून आली,’’ अशा भावना हिंदी सिनेमासृष्टीतील ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांनी व्यक्त केल्या.संगीतकार म्हणून गाजवलेल्या प्रदीर्घ कारकिर्दीविषयी काय वाटते?ल्ल गायिका होण्याचे स्वप्न गुंडाळून संगीतकार म्हणून काम करण्याचा धाडसी निर्णय घेतला. कुटुंब काळजीत होते; पण वडिलांच्या पाठिंब्यामुळे बिनधास्तपणे स्वत:ला अजमावत राहिले. जे-जे काही नावीन्यपूर्ण करता आले ते-ते केले. आपण केलेल्या कामांना रसिकांचा दाद मिळाली, ही भावना लता मंगेशकर पुरस्कारामुळे जागृत झाली. संगीतकार म्हणून काम करताना निर्माता, दिग्दर्शक आणि रसिक अशा अनेकांची मने जिंकण्याची कला आत्मसात करता आली.सध्याच्या ‘रिमिक्स’ गाण्यांबद्दल संगीतकार म्हणून काय वाटते?ल्ल जुन्या गाण्यांना धांगडधिंगा स्वरूपात संगीतबद्ध करीत ‘रिमिक्स’ नावाने अशी गाणी सिनेमात वापरण्यात येतात. काही काळ तरुणाई या गाण्यांना डोक्यावरसुद्धा घेते; पण त्यांना श्रवणीय दर्जा नसतो. तसेच, जुन्या गाण्यांची आवश्कता भासणे हे नव्याची कल्पनानिर्मिती हरवत चालल्याचे लक्षण आहे. परंतु, ही गाणी रसिकांच्या मनावर जास्त काळ अधिराज्य गाजवू शकत नाहीत. ती काळाच्या ओघात हरवून जाणार, हे नक्की. जुन्या गाण्यांचा दर्जा आजदेखील टिकून राहण्यामागे त्या वेळी गीतकार आणि संगीतकार व वाद्यवृंद यांनी घेतलेली अविरत मेहनत हे मूळ कारण आहे.महिला संगीतकार म्हणून काम करताना अडचणी आल्या ?ल्ल संगीतक्षेत्रात तेव्हा पुरुषांची मक्तेदारी होती. तरी दिग्गजांसोबत शिकत काम करीत राहिले. लतादीदी, आशा भोसले, मन्ना डे, मोहंम्मद रफी यांच्यासोबत काम करता आले. ही सर्व मंडळी महान होती. असे कलाकार पुन्हा होणे नाही. अरिजित सिंग, श्रेया घोषाल, सोनू निगम, अलका याज्ञिक ही मंडळी रिअ‍ॅलिटी शोमधून पुढे आली; परंतु त्यांनी पैशाला आपले ध्येय बनू दिले नाही. आपल्या गाण्यावर ते सतत मेहनत घेत राहिले. त्यामुळेच ते आज यशाच्या उंच शिखरावर पोहोचले आहेत.संगीतकार म्हणून करियरची निवड करताना महिला अजूनही तितक्या सक्षमपणे समोर येत नाहीत. महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी मी नेहमीच तयार आहे. महिलांनी संगीतकार म्हणून कारकीर्द घडविण्यात कोणताही न्यूनगंड बाळगू नये. पुरुषांची मक्तेदारी असतानाही मला या क्षेत्रात काम करताना अडचण आली नव्हती.

टॅग्स :musicसंगीतPuneपुणे