शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
4
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
5
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
6
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
7
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
8
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
9
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
10
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
11
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
12
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
13
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
14
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
15
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
16
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
17
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
18
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
19
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
20
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...

विमेन अचिवर्स / भारती भंडारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:28 IST

6 नोव्हेंबर 1969 हा त्यांचा जन्मदिन. नगर कॉलेजमध्ये त्यांनी बी.कॉम ची पदवी संपादन केली आणि शालेय शिक्षण कन्या विद्या ...

6 नोव्हेंबर 1969 हा त्यांचा जन्मदिन. नगर कॉलेजमध्ये त्यांनी बी.कॉम ची पदवी संपादन केली आणि शालेय शिक्षण कन्या विद्या मंदिर शाळेमध्ये झालं. आशापुरा ट्रस्ट,जितो, लायन्स क्लब, संगिनी महिला मंडळ अशा संस्थांशी त्या संलग्न आहेत. संगिनी महिला मंडळ आणि जितो या संस्थांमध्ये अजूनही कार्यरत आहेत. या संस्थांमध्ये संचालक म्हणून त्यांनी कामगिरी सांभाळली आहे. जितो बोर्डावर कार्याध्यक्ष म्हणून त्या काम करत करत आहेत.

संगिनी महिला मंडळ ह्या महिला उत्कर्ष मंडळाची त्यांनी स्वतः स्थापना केलेली आहे. या मंडळाची दर दोन महिन्यांनी बैठक आयोजित केली जाते.

''''''''जितो च्या बीटूबी समितीमध्ये त्या काम करतात. ''''''''बीटूबी''''''''च्या माध्यमातून पुण्याचा अरोरा टाॅवर्स मध्ये जैन समाजातल्या महिलांच्या वस्तूंचे, कलाकृतींचे प्रदर्शन त्यांनी भरवलं होतं. त्याला महिलांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. जैन समाजातील महिलांनी तयार केलेल्या वस्तू किंवा पदार्थांच्या या प्रदर्शनामध्ये खाद्यपदार्थ, कपडे अशा गोष्टीं साठी प्रत्येकी दोन तास वेळ प्रदर्शनात देण्यात आला होता. राखी पौर्णिमा किंवा तत्सम सण असतील तर त्या त्या वस्तूंचे प्रदर्शन, खाद्यपदार्थाची जत्रा अशा प्रकारचं महिलांना प्रशिक्षण देऊन प्रदर्शन आयोजित करण्याचं या महिला मंडळाचं वैशिष्ट्य आहे.

यंदा कोरोनामुळे जीतो येथे एक दिवसाचं प्रदर्शन आयोजित केलं होतं.

छोट्या-छोट्या व्यावसायिक महिलांचं अनुभव कथन करायला व्यासपीठ निर्माण झाल्यामुळे महिला मंडळाच्या माध्यमातून महिलांची करमणूक आणि अर्थार्जनाचे साधन अशी दुहेरी कामगिरी होत आहे.

आठ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या संगिनी महिला मंडळाच्या 70 ते 75 सदस्य आहेत.

त्यांच्या पतीचा स्वतःचा व्यवसाय आहे. परंतु घरातल्या जबाबदाऱ्यांमुळे आणि महिला मंडळांच्या किंवा अन्य संस्थांच्या कामामुळे त्या स्वतःचा व्यवसाय करण्यापेक्षा पतीलाच व्यवसाय मध्ये मदत करतात. भारती यांचा विवाह झाला त्यावेळी त्या मोठी सून म्हणून त्यांच्या घरात आल्या. तेव्हापासून त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या आल्या. त्यांना स्वतःला तीन मुलं आहेत. त्यामुळे त्यांनी कुटुंब सांभाळायचे आणि पतीने व्यवसाय सांभाळायचा असा दोघांनी निश्चित केलं होतं. दिरांचा, मुलींचा विवाह अशा जबाबदाऱ्या कमी झाल्यानंतर त्या सामाजिक कार्यामध्ये गेल्या दहा-बारा वर्षांपासून स्वताला झोकून दिलं.

रविवार पेठ येथील वास्तव्य सोडून भंडारी कुटुंब सॅलिस्बरी पार्क येथे स्थायिक झाले. त्यावेळी त्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये काही बदल करायला सुरुवात केली. त्यांच्या पतीला सामाजिक कार्याची खूप आवड आहे. त्यामुळे त्यांनी काही संस्थांशी त्यांचा परिचय करून दिला. धाकट्या मुलीचं लग्न झालं त्यावेळी तिने भारतीताईंना एक पत्र लिहिलं होतं. ते त्यांना दुसऱ्या दिवशी मिळालं. त्यामध्ये मुलीनं लिहिलं होतं की तू आता समाजासाठी आणि स्वतःसाठी जग. कुटुंबासाठी खूप काम केलेलं आहे आणि तेव्हापासून त्यांनी विविध संस्थांची स्वतःला जोडून घेणे सुरू केलं आणि तो त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. तेव्हापासून जगासाठी जगायला त्यांनी सुरुवात केली.

पती विजय भंडारी आदर्श

आपले पती विजयजी भंडारी हेच प्रेरणास्थान असल्याचे त्या नमूद करतात. ज्यावेळी निराशा आली त्यावेळी एका मित्राच्या भावनेतून ती समजावून घेऊन त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आपण नैराश्य भावना विसरून जाऊन उत्साहानं कामाला लागलो. पूर्वी सामाजिक संस्थांमध्ये जाण्याचा कंटाळा करत असून परंतु आता त्यासाठी आवर्जून वेळ काढतो असं भारतीताई भंडारी यांनी नमूद केलं.

सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचा मानव सेवा पुरस्कार, लायन्स पुरस्कार असे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

महिलांनी उद्योग व्यवसाय करावा किंवा नोकरी करावी परंतु त्याच वेळी आपल्या कुटुंबालाही चांगला वेळ द्यावा दोन्ही जबाबदाऱ्या महिला समर्थपणे सांभाळू शकतात हे आपण स्वतःच्या उदाहरणावरुन सांगू शकतो असा त्यांचा महिलांना, विशेषतः तरुणींना संदेश आहे.