शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

विमेन अचिवर्स / भारती भंडारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:28 IST

6 नोव्हेंबर 1969 हा त्यांचा जन्मदिन. नगर कॉलेजमध्ये त्यांनी बी.कॉम ची पदवी संपादन केली आणि शालेय शिक्षण कन्या विद्या ...

6 नोव्हेंबर 1969 हा त्यांचा जन्मदिन. नगर कॉलेजमध्ये त्यांनी बी.कॉम ची पदवी संपादन केली आणि शालेय शिक्षण कन्या विद्या मंदिर शाळेमध्ये झालं. आशापुरा ट्रस्ट,जितो, लायन्स क्लब, संगिनी महिला मंडळ अशा संस्थांशी त्या संलग्न आहेत. संगिनी महिला मंडळ आणि जितो या संस्थांमध्ये अजूनही कार्यरत आहेत. या संस्थांमध्ये संचालक म्हणून त्यांनी कामगिरी सांभाळली आहे. जितो बोर्डावर कार्याध्यक्ष म्हणून त्या काम करत करत आहेत.

संगिनी महिला मंडळ ह्या महिला उत्कर्ष मंडळाची त्यांनी स्वतः स्थापना केलेली आहे. या मंडळाची दर दोन महिन्यांनी बैठक आयोजित केली जाते.

''''''''जितो च्या बीटूबी समितीमध्ये त्या काम करतात. ''''''''बीटूबी''''''''च्या माध्यमातून पुण्याचा अरोरा टाॅवर्स मध्ये जैन समाजातल्या महिलांच्या वस्तूंचे, कलाकृतींचे प्रदर्शन त्यांनी भरवलं होतं. त्याला महिलांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. जैन समाजातील महिलांनी तयार केलेल्या वस्तू किंवा पदार्थांच्या या प्रदर्शनामध्ये खाद्यपदार्थ, कपडे अशा गोष्टीं साठी प्रत्येकी दोन तास वेळ प्रदर्शनात देण्यात आला होता. राखी पौर्णिमा किंवा तत्सम सण असतील तर त्या त्या वस्तूंचे प्रदर्शन, खाद्यपदार्थाची जत्रा अशा प्रकारचं महिलांना प्रशिक्षण देऊन प्रदर्शन आयोजित करण्याचं या महिला मंडळाचं वैशिष्ट्य आहे.

यंदा कोरोनामुळे जीतो येथे एक दिवसाचं प्रदर्शन आयोजित केलं होतं.

छोट्या-छोट्या व्यावसायिक महिलांचं अनुभव कथन करायला व्यासपीठ निर्माण झाल्यामुळे महिला मंडळाच्या माध्यमातून महिलांची करमणूक आणि अर्थार्जनाचे साधन अशी दुहेरी कामगिरी होत आहे.

आठ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या संगिनी महिला मंडळाच्या 70 ते 75 सदस्य आहेत.

त्यांच्या पतीचा स्वतःचा व्यवसाय आहे. परंतु घरातल्या जबाबदाऱ्यांमुळे आणि महिला मंडळांच्या किंवा अन्य संस्थांच्या कामामुळे त्या स्वतःचा व्यवसाय करण्यापेक्षा पतीलाच व्यवसाय मध्ये मदत करतात. भारती यांचा विवाह झाला त्यावेळी त्या मोठी सून म्हणून त्यांच्या घरात आल्या. तेव्हापासून त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या आल्या. त्यांना स्वतःला तीन मुलं आहेत. त्यामुळे त्यांनी कुटुंब सांभाळायचे आणि पतीने व्यवसाय सांभाळायचा असा दोघांनी निश्चित केलं होतं. दिरांचा, मुलींचा विवाह अशा जबाबदाऱ्या कमी झाल्यानंतर त्या सामाजिक कार्यामध्ये गेल्या दहा-बारा वर्षांपासून स्वताला झोकून दिलं.

रविवार पेठ येथील वास्तव्य सोडून भंडारी कुटुंब सॅलिस्बरी पार्क येथे स्थायिक झाले. त्यावेळी त्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये काही बदल करायला सुरुवात केली. त्यांच्या पतीला सामाजिक कार्याची खूप आवड आहे. त्यामुळे त्यांनी काही संस्थांशी त्यांचा परिचय करून दिला. धाकट्या मुलीचं लग्न झालं त्यावेळी तिने भारतीताईंना एक पत्र लिहिलं होतं. ते त्यांना दुसऱ्या दिवशी मिळालं. त्यामध्ये मुलीनं लिहिलं होतं की तू आता समाजासाठी आणि स्वतःसाठी जग. कुटुंबासाठी खूप काम केलेलं आहे आणि तेव्हापासून त्यांनी विविध संस्थांची स्वतःला जोडून घेणे सुरू केलं आणि तो त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. तेव्हापासून जगासाठी जगायला त्यांनी सुरुवात केली.

पती विजय भंडारी आदर्श

आपले पती विजयजी भंडारी हेच प्रेरणास्थान असल्याचे त्या नमूद करतात. ज्यावेळी निराशा आली त्यावेळी एका मित्राच्या भावनेतून ती समजावून घेऊन त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आपण नैराश्य भावना विसरून जाऊन उत्साहानं कामाला लागलो. पूर्वी सामाजिक संस्थांमध्ये जाण्याचा कंटाळा करत असून परंतु आता त्यासाठी आवर्जून वेळ काढतो असं भारतीताई भंडारी यांनी नमूद केलं.

सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचा मानव सेवा पुरस्कार, लायन्स पुरस्कार असे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

महिलांनी उद्योग व्यवसाय करावा किंवा नोकरी करावी परंतु त्याच वेळी आपल्या कुटुंबालाही चांगला वेळ द्यावा दोन्ही जबाबदाऱ्या महिला समर्थपणे सांभाळू शकतात हे आपण स्वतःच्या उदाहरणावरुन सांगू शकतो असा त्यांचा महिलांना, विशेषतः तरुणींना संदेश आहे.