शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पत्नीच्या मृत्यूनंतर तिच्या विरहात काही तासांतच पतीनेही सोडले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 13:03 IST

इंदापूर तालुक्यातील बावडा गावामधील घटना...

नीरा नरसिंहपूर (पुणे) : पती-पत्नीचे नाते हे जगातील सर्वांत घट्ट नाते मानले जाते. लग्नाची गाठ बांधतानाच ते एकमेकांसोबत जगण्याची आणि सुख दुःखात शेवटपर्यंत साथ देण्याचे वचन घेतात. मात्र, मृत्यूनंतरही एकमेकांची साथ दिलेल्या पती-पत्नीच्या घटना तुम्ही क्वचितच ऐकल्या असतील; पण अशी घटना घडली आहे इंदापूर तालुक्यातील बावडा गावामध्ये या घटनेत पत्नीच्या मृत्यूनंतर तिच्या विरहात काही तासांनंतरच पतीनेही प्राण सोडले.

७७ वर्षांच्या हवई हनुमंत कांबळे यांचे शनिवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. ही घटना त्यांचे ८२ वर्षांचे पती हनुमंत कांबळे यांना कळताच त्यांना जबरदस्त मानसिक धक्का बसला. गेल्या अनेक दिवसांपासून वृद्धापकाळातील अनेक व्याधींना धैर्याने तोंड देणाऱ्या हनुमंत यांचा धीर तुटला आणि चौदा तासांत सायंकाळी हनुमंत यांनी पत्नीच्या विरहात प्राण सोडले.

हवई आणि हनुमंत हे दोघे बावडा गावातील रहिवाशी असून सुमारे पन्नास वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. अत्यंत गरीब परिस्थितीत दोघांनी एकमेकांना साथ देत संसाराचा गाडा मोठ्या कष्टाने ओढला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडIndapurइंदापूर