शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

शेतात जाताना बिबट्या दिसेल का? त्याच्या पावलांचा वावर भरवतोय धडकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 10:23 IST

काही वर्षांपूर्वी नदी पट्ट्यात दिसणारा बिबट्या आता तालुक्यातील बहुतांश भागात दिसू लागला आहे

कारेगाव : शिरुर तालुक्यात मागील काही वर्षांपूर्वी नदी पट्ट्यात दिसणारा बिबट्या आता तालुक्यातील बहुतांश भागात दिसू लागला आहे. परंतु, शेतात जाताना बिबट्या दिसेल का? शेजारील उसात असला तर काय? कृषिपंपाची वीज रात्र पाळीत असेल तर रात्रीच्या वेळेस पाणी कसे धरायचे? याच भीतीत शेतकरी जगत आहे त्यामुळे त्याच्या पावलांचा वावर शेतकरी व शेतमजुरांच्या मनात धडकी भरवत आहे.

दुष्काळी तालुका म्हणून ओळख असणाऱ्या शिरुर तालुक्यात सध्या भीमा, घोडनदी, वेळ, चासकमान डावा कालवा, डिंबा कालवा, चिंचणी यामुळे तालुक्यातील अपवाद वगळला तर बहुतांश भाग ओलिताखाली आला आहे. त्यामुळे बारमाही पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. लहरी बाजारभावामुळे उसासारख्या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. मागील काही वर्षांपूर्वी रानडुकरचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला होता. भुईमूग, मका व अन्य पिके फस्त करत होता. कळपाने रानडुक्कर दिसत असल्याने रात्रीच्या वेळेस कृषी पंप चालू बंद करायला जाण्यासाठी मर्यादा निर्माण झाल्या होत्या. परंतु, आता रानडुकराचे प्रमाण कमी झाले असून बिबट्याचा वावर वाढला आहे. तालुक्यातील सुमारे ७१ गावे बिबट प्रवण क्षेत्रात येत आहेत. सातत्याने पाळीव प्राण्यांवर हल्ले होत असल्याने मर्यादा आल्या आहेत. ऊस पिकाच्या खालोखाल कांदा पीकही मोठ्या प्रमाणात तालुक्यात घेतले जाते. लागवड, खुरपणी यासाठी मजूर सातत्याने लागतात परंतु, तालुक्यात अनेक ठिकाणी यापूर्वी बिबट्याने दिवसा हल्ले केले आहेत. शेतात मजूर सोबतीला कोणी असल्याशिवाय असल्याशिवाय काम करत नाहीत. तसेच रात्रीचा विद्युत पुरवठा पाळी असल्यावर शेतकऱ्यांना पाणी धरण्यासाठी रात्रीच्या वेळेस जावे लागत आहे. अनेकदा दिवसा वीज देण्याची मागणी करूनही दिवसपाळीत वीज मिळत नसल्याने शेतकऱ्यांना पर्याय शिल्लक राहत नाही. रात्रीच्या अंधारात बिबट्या दिसेल का याच धास्तीखाली शेतकरी जीव मुठीत धरून रात्री पाणी धरण्यासाठी जात आहे.

वनविभागामार्फत अधिकाधिक जनजागृती करणे आवश्यक

शिरुर, जुन्नर, खेड, आंबेगाव तालुक्यात अनेकदा बिबट्याने शेतकऱ्यांवर हल्ले केले आहेत. या भागात सिंचनाखालील क्षेत्र अधिक आहे. रात्रपाळीत कृषिपंप विद्युत पुरवठा असल्यावर शेतकऱ्यांना रात्री पाणी धरणे, कृषिपंप चालू बंद करणे, यासाठी जावे लागत आहे. त्यामुळे महावितरणने दिवसपाळीत विद्युत पुरवठा करणे गरजेचे आहे, तसेच वनविभागामार्फत अधिकाधिक जनजागृती करणे आवश्यक आहे.- नाथाभाऊ शेवाळेजनता दल (सेक्युलर)

एकटे न जाताना दोघांनी जावे

शेतकऱ्यांनी घराच्या परिसरात स्वच्छता ठेवावी. शक्य असल्यास घर व गोठ्याला कुंपण घालावे. घरालगत ऊस लागवड करू नये. रात्रीच्या वेळेस शेतात जाताना काठी हातात ठेवावी व मोबाइलवर गाणी लावावी. एकटे न जाताना दोघांनी जावे. - मनोहर म्हसेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी शिरुर.

टॅग्स :Puneपुणेleopardबिबट्याFarmerशेतकरीforest departmentवनविभाग