शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Sharad Pawar: राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार का? शरद पवारांनी सांगितला तो किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 14:20 IST

राज्यातील कायदा, सुव्यवस्था बिघडली असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. राष्ट्रपती राजवटीची भाषा केली जात आहे

पुणे/मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सध्या राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. सध्या राज्यात जे चाललंय ते महाराष्ट्राच्या राजकीय सस्कृतीला न शोभणारं आहे. सरकार गेल्यानं काही जण अस्वस्थ आहेत, सगळेच माझ्यासारखे नसतात. सत्ता गेल्यानं वाईट वाटणं स्वाभाविक आहे. पण, सत्ता येत जात असते. सत्ता गेल्यानं इतकं अस्वस्थ होण्याचं कारण नाही, असे म्हणत शरद पवारांनी भाजपला टोला लगावला. तसेच, राष्ट्रपती राजवट आणि समान नागरी कायद्यावरही पवार यांनी भाष्य केलं. 

राज्यातील कायदा, सुव्यवस्था बिघडली असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. राष्ट्रपती राजवटीची भाषा केली जात आहे. त्यावर पवारांनी भाष्य केलं. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. अलिकडच्या काळात व्यक्तीगत टिकांच्या माध्यमातून वातावरण बिघडत आहे. राज्याच्या राजकारणात मी आणि बाळासाहेब ठाकरेंनी एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला. एकदा औरंगाबादेत एकदा आम्हा दोघांचीही सभा झाली होती. या सभेत आम्ही एकमेकांवर तुटून पडलो. मात्र, बापूसाहेब काळदाते आणि अनंता भालेराव यांच्यासमवेत आम्ही रात्री एकत्र बसून गप्पा मारायचो. दुपारच्या सभेचा उल्लेखही त्या बैठकीत होत नसत. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ही परंपरा चालत आहे. अनेकदा विधानसभेतही आम्ही सत्ताधारी विरोधक म्हणून भांडलो. पण, संध्याकाळी एकत्र बसून राज्याच्या हितासंदर्भात चर्चा करत, अशा आठवणीही शरद पवारांनी सांगितल्या. राष्ट्रपती राजवटीच्या चर्चा होत आहेत, पण तसं काही घडत नाही. निवडणुका घेण्याचा असेल तर कोल्हापूरच्या निवडणूक निकालाने तेही दाखवून दिलंय. त्यामुळे, निवडणुका घेण्यात येतील, असेही मला वाटत नाही, असे पवारांनी स्पष्टच सांगितले. 

जुन्या परिस्थितीवर पूर्ववत येण्याची काळजी घेऊ

मुख्यंत्र्यांवर धोरणात्मक टिका करण्याचा अधिकार सर्वांना आहे. पण, त्यांचा एकेरी उल्लेख करुन वेडवाकडं बोलणं शोभत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणून मी बघत नाही, ती एक संस्था आहे. या संस्थेचा सन्मान ठेवायला हवा, पण या संस्थेचा मान न ठेवण्याची भूमिका काही लोक घेतात. राज्यातील ही परिस्थिती काही दिवसांत खाली जाईल, अशी अपेक्षा करुयात. महाराष्ट्र राज्याची जुनी परंपरा जशी आहे, त्यावर पूर्ववत येण्याची काळजी घेण्यासाठी आपली जबाबदारी आहे, आम्ही ते करुयात, असे शरद पवार यांनी म्हटलं. आमच्या स्नेह्यांनाही यातून काहीतरी समजेल आणि योग्य वातावरण निर्माण करायला तेही प्रयत्नशील राहतील अशी अपेक्षा करूयात, असेही पवार यांनी म्हटले. 

सत्ता गेल्याने लोकं अस्वस्थ होतात

सत्ता गेल्यानं अस्वस्थ होण्याचं कारण नाही. मी अनेकदा सत्ता गमावली आहे. मात्र, त्यामुळे कधीही अस्वस्थ झालो नाही. १९८० मध्ये पुलोद सरकार बरखास्त झाल्याची आठवण त्यांनी सांगितली. १९७८ मध्ये राज्यात पुलोदचं सरकार होतं. १९८० मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या शिफारशीनंतर पुलोद सरकार बरखास्त करण्यात आलं. मात्र, मी अस्वस्थ झालो नाही. सरकार बरखास्त करण्यात आल्याची माहिती मला मुख्य सचिवांकडून समजली. त्यानंतर मी माझ्या काही मित्रांना निवासस्थानी बोलवून घेतलं. सामानाची आवराआवर, बांधाबांध केली आणि सकाळी दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलो. तेव्हा वानखेडेवर भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना सुरू होता. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान सोडल्यावर मी कसोटी सामना पाहायला मैदानावर गेलो होतो, असा किस्सा पवारांनी सांगितलं.

हनुमान चालिसा वादावर काय म्हणाले पवार?

प्रत्येकानं आपल्या धार्मिक भावना स्वत:पर्यंत मर्यादित ठेवाव्यात. धर्माबद्दल असलेल्या भावनांचं प्रदर्शन नको, असं शरद पवारांनी म्हटलं. मशिदीवरील भोंग्यांच्या प्रश्वावरून तोडगा काढण्यासाठी ठाकरे सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सर्वांनी निर्णय घेऊन सामोपचारानं प्रश्न निकाली निघाल्यास उत्तमच होईल, असं पवार पुढे म्हणाले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPresident Ruleराष्ट्रपती राजवटGovernmentसरकार