शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

संमेलनाध्यक्षपदाची निवड सन्मानाने होणार का? लक्ष्मीकांत देशमुख यांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 21:25 IST

काही दिवसांपूर्वी साहित्य संमेलन अध्यक्षाची निवड सन्मानपूर्वक करण्याचा निर्णय मराठी साहित्य परिषदेने घेतला होता.

ठळक मुद्देघटक संस्था, समाविष्ट संस्था यांना नावे सुचवण्यास सांगण्यापेक्षा पाच जणांची समिती नियुक्त करावी संमेलनाध्यक्ष निवडप्रक्रिया मूळ हेतूला काळिमा फासणारी२८ आॅक्टोबर रोजी होणारी बैठक वादळी होण्याची चिन्हे निर्माण

पुणे : अखिल भारतीय मराठीसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड सन्मानान होणार का, असा सवाल माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी उपस्थित केला आहे. काही दिवसांपूर्वी साहित्य संमेलनाचा अध्यक्षाची निवड सन्मानपूर्वक करण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे घेण्यात आला होता . 

यवतमाळच्या संमेलनापासून अंमलात येणार असलेली अध्यक्ष निवडीची प्रक्रिया अत्यंत चुकीची आणि अध्यक्षांची सन्मानाने निवड या घटनादुरुस्तीच्या मूळ हेतूला काळिमा फासणारी आहे, अशा शब्दांत संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी महामंडळावर ताशेरे ओढले आहेत. ही प्रक्रिया रद्द करुन महामंडळाने दरवर्षी पाच मान्यवर साहित्यिक आणि विचारवंतांची एक समिती स्थापन करुन त्यांच्यामार्फत एका मान्यवर साहित्यिकाची संमेलनाध्यक्षपदी निवड करावी, असा पर्याय सुचवून देशमुख यांनी नव्या घटनादुरुस्तीची मागणी पत्राद्वारे महामंडळाकडे केली आहे. प्रत्यक्ष निवडीपूर्वीच मतभेद निर्माण झाल्याने २८ आॅक्टोबर रोजी होणारी बैठक वादळी होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी घेतली जाणारी निवडणूक रद्द होऊन यंदाच्या संमेलापासून अध्यक्षांची निवड सन्मानाने केली जाणार, असा ऐतिहासिक निर्णय साहित्य महामंडळाने घेतला. त्यानुसार महामंडळाच्या घटनेमध्ये दुरुस्तीही करण्यात आली. निवड प्रक्रियेनुसार, चार घटक संस्थांनी प्रत्येकी तीन नावे, संलग्न संस्थांनी प्रत्येकी एक, निमंत्रक संस्था आणि विद्यमान संमेलनाध्यक्ष यांनी प्रत्येकी एक अशी वीस नावे महामंडळाला सुचवायची आहेत. त्यापैकी एक नाव एकमत किंवा बहुमताने शिक्कामोर्तब केले जाणार आहे. त्यामुळे उर्वरित नावांचा सन्मान राखला जाणार नाही, अशी तीव्र नाराजी देशमुख यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. महामंडळाने निवडीच्या कामातून स्वत:ला अलग ठेवावे, म्हणजे कोणत्याही साहित्यबाह्य निकषाविनाा संमेलनाध्यक्षाची निवड होऊ शकेल.देशमुख म्हणाले, ‘वीस नावांमधून बहुमताने महामंडळ सदस्यांनी अध्यक्ष निवडीची प्रक्रिया निवड न झालेल्या साहित्यिकांचा सन्मान राखणारी नाही. ती रद्द करुन महामंडळाने दरवर्षी पाच मान्यवर साहित्यिक आणि विचारवंतांची समिती स्थापन करुन त्यांच्यामार्फत एका मान्यवर साहित्यिकाची संमेलनाध्यक्षपदासाठी निवड करावी. या समितीने निवडलेल्या साहित्यिकांची निवड का केली, याची एक टिपण्णी सह्या करुन द्यावी. ही निवड वाड,मयीन गुणवत्तेचे कोणते निकष लावून केली, याची कारणमींमासा द्यावी. यामुळे अध्यक्ष म्हणून एकाची सन्मानाने निवड होईल आणि कोणतेही वादविवाद होणार नाहीत. त्याऐवजी पाच विचारवंतांची समिती नेमून त्यांनी संमेलनाध्यक्ष निवडावा, असा पर्याय त्यांनी महामंडळाला पत्राद्वारे सुुचवला आहे. त्यादृष्टीने महामंडळामधील घटनादुरुस्तीचा प्रस्ताव चर्चेला घेण्याचे त्यांनी सुचवले आहे. 

टॅग्स :Puneपुणेmarathiमराठीliteratureसाहित्य