शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

समृद्धी महामार्गावरील बळींची जबाबदारी घेणार का? - राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 06:29 IST

पक्षाच्या बैठकीसाठी ठाकरे बुधवारी पुण्यात आले होते. 

पुणे : अमित ठाकरे यांच्याकडे फास्टॅग असूनही टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी अरेरावी केली. त्याची रिॲक्शन आली. त्याच्यावर बोलता तर मग सदोष असणाऱ्या समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात बळी पडलेल्यांची जबाबदारी भाजप किंवा सरकार घेणार का, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. पक्षाच्या बैठकीसाठी ठाकरे बुधवारी पुण्यात आले होते. 

अमित ठाकरे यांच्या समर्थकांनी टोलनाक्यावर केलेल्या तोडफोडीसंदर्भात टीका होत आहे. त्यावर बोलताना राज म्हणाले, ‘दिसला टोलनाका की फोड’ असे तो करत नाही. एका टोलनाक्यावर अरेरावी करण्यात आली. त्याचा परिणाम म्हणून तोडफोड झाली. मनसेने राज्यातील अनेक टोल बंद केले. त्यावर कोणी बोलत नाही. मग महाराष्ट्र टोलमुक्त करण्याचे आश्वासन भाजपने दिले होते त्याचे काय झाले?

रस्ते खराब झाले आहेत, खड्डे पडले आहेत. केंद्रात राज्यातील मंत्री असूनही अशी स्थिती आहे. असे होते याचे कारण आपला समाज आहे. त्यांनीच सांगितले की, यांनी ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला. मग त्यांनाच सरकारमध्ये कसे घेतले? हे कोणी विचारत नाहीत तोपर्यंत असेच चालणार. राष्ट्रवादीची पहिली टीम गेली असे मी म्हटले होते. आता दुसरी टीमही जाईल. शरद पवार यांचे राजकारण इतकी वर्षे राज्य पाहत आहे, ही मिली भगत आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे