शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

राज्यात मनसेची सत्ता येईल का?; शर्मिला ठाकरे म्हणाल्या, "आम्ही कायमच चांगल्या..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 16:47 IST

सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. त्यांना थोडा वेळ द्यायला हवा, मंत्रिमंडळावर बोलताना शर्मिला ठाकरे यांचं वक्तव्य.

“आम्ही काय चांगल्या इच्छा व्यक्त करतो. इतक्या वर्षात मुंबईतील, महाराष्ट्रातील रस्ते झाले नाही, पाण्याचे प्रश्न सुटले नाहीत. स्वातंत्र्याला ७५ वर्ष झाली, या गोष्टीच केव्हाच व्हायला हव्या होत्या. आपण मोठ्या प्रमाणात कर देतो. महाराष्ट्राची कोणती हद्द ओलांडा रस्ते गुळगुळीत दिसतात. खड्डे आपल्याकडेच दिसतात. चांगलं सरकार हवं असेल तर बदल घडवायलाच पाहिजे,” असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. राज्यात मनसेची सत्ता येईल का असा सवाल त्यांना करण्यात आला होता.

"गणपती आमचा, किंमत तुमची - २०२२" या मनसे शहर संघटक प्रल्हाद गवळी आयोजित उपक्रमाचे उद्घाटन शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आम्हाला भेटी देऊन उपयोग नाही. लोकांच्या समस्या सुटल्या तर आम्हाला आनंद आहे. आमच्याकडे कोणीही समस्या घेऊन आलं तर राज ठाकरे आपणहून जाऊन त्याची कल्पना देत असल्याचंही त्या म्हणाल्या.

मंत्रिमंडळावरही भाष्य “सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे आहे. त्यांना थोडा वेळ द्यायला हवा. काही सणवार सुरू झालेत, विधानसभा अधिवेश सुरू झालं, त्यांच्याकडे फाईल्स येऊ दे, काम तर सुरू होऊ दे. आपण दोन महिने तर थांबूया. घोड्यावर बसल्यावर लगाम धरायला थोडा तर वेळ लागतो,” असंही त्या एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या.

टॅग्स :sharmila thackerayशर्मिला ठाकरेMNSमनसेMaharashtraमहाराष्ट्र