शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

राज्यात मनसेची सत्ता येईल का?; शर्मिला ठाकरे म्हणाल्या, "आम्ही कायमच चांगल्या..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 16:47 IST

सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. त्यांना थोडा वेळ द्यायला हवा, मंत्रिमंडळावर बोलताना शर्मिला ठाकरे यांचं वक्तव्य.

“आम्ही काय चांगल्या इच्छा व्यक्त करतो. इतक्या वर्षात मुंबईतील, महाराष्ट्रातील रस्ते झाले नाही, पाण्याचे प्रश्न सुटले नाहीत. स्वातंत्र्याला ७५ वर्ष झाली, या गोष्टीच केव्हाच व्हायला हव्या होत्या. आपण मोठ्या प्रमाणात कर देतो. महाराष्ट्राची कोणती हद्द ओलांडा रस्ते गुळगुळीत दिसतात. खड्डे आपल्याकडेच दिसतात. चांगलं सरकार हवं असेल तर बदल घडवायलाच पाहिजे,” असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. राज्यात मनसेची सत्ता येईल का असा सवाल त्यांना करण्यात आला होता.

"गणपती आमचा, किंमत तुमची - २०२२" या मनसे शहर संघटक प्रल्हाद गवळी आयोजित उपक्रमाचे उद्घाटन शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आम्हाला भेटी देऊन उपयोग नाही. लोकांच्या समस्या सुटल्या तर आम्हाला आनंद आहे. आमच्याकडे कोणीही समस्या घेऊन आलं तर राज ठाकरे आपणहून जाऊन त्याची कल्पना देत असल्याचंही त्या म्हणाल्या.

मंत्रिमंडळावरही भाष्य “सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे आहे. त्यांना थोडा वेळ द्यायला हवा. काही सणवार सुरू झालेत, विधानसभा अधिवेश सुरू झालं, त्यांच्याकडे फाईल्स येऊ दे, काम तर सुरू होऊ दे. आपण दोन महिने तर थांबूया. घोड्यावर बसल्यावर लगाम धरायला थोडा तर वेळ लागतो,” असंही त्या एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या.

टॅग्स :sharmila thackerayशर्मिला ठाकरेMNSमनसेMaharashtraमहाराष्ट्र