शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पुरंदर विमानतळाला जागा दिल्यास शेतकऱ्यांना वैमानिक बनवणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 16:31 IST

या विमानतळासाठी सुमारे तीन हजार हेक्टर जमीन घेण्यात येणार आहे...

- श्रीकिशन काळे

पुणे :विमानतळाला जागा दिल्यानंतर आम्ही घर, दार सोडून जायचे कुठे? जमीन विकून पैसे हातात येतील; पण ते घेऊन करणार काय? इंडस्ट्री आली असती तर नोकऱ्या तरी लागल्या असत्या; पण आता विमानतळात आम्हा शेतकऱ्यांना वैमानिक थोडेच बनवणार आहेत ! आम्ही शेती विकल्या तर बेरोजगारच होऊ, त्यामुळे आमचा सर्व गावांचा जमीन देण्यास विरोध आहे, अशी भूमिका शेतकऱ्यांची आहे.

पुण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर येथे प्रस्तावित केले आहे. या विमानतळासाठी सुमारे तीन हजार हेक्टर जमीन घेण्यात येणार आहे. त्यासाठी पारगाव, मेमाणे, खानवडी, एखतपूर, मुंजवडी, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाचीवाडी या गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमधील ग्रामस्थांचा या विमानतळाला जमीन देण्यास विरोध आहे. त्यामुळे सरकार नेमके करणार तरी काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

कुंभारकर म्हणाले की, आम्ही या गावातील सर्व ग्रामस्थ अल्पभूधारक आहेत. त्यामुळे शेती करून गुजराण करतो. पाणी सिंचनाची सोय पुरंदर तालुक्यात झाली आहे. शेतीवर फळबागा आहेत. सीताफळ, डाळिंब, अंजीर या फळाला चांगली मागणी आहे. त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी सुखी आहोत. विमानतळ आल्यानंतर आमचे विस्थापन होणार आणि हा सर्व परिसर गजबजणार आहे. म्हणून आम्हाला ते सर्व नको आहे. जागा दिल्यानंतर आम्ही करायचे काय? एक तर इकडे कोणते उद्योग नाहीत. रोजगार कोण देणार आम्हाला?

जागा देऊन आम्ही वाॅचमनचे काम करायचे का? विमानतळामुळे सर्वत्र शहरीकरण होईल. आता निसर्गसंपन्न परिसर आहे. तिकडे चाकणला लोकांना विमानतळ हवे आहे, तर तिकडे करायला हवे. आम्हाला विमानतळ नकोय. शेवटपर्यंत आम्ही विमानतळाला विरोध करणार आहोत.

- संतोष कुंभारकर, सरपंच, उदाचीवाडी

स्थानिकांचा विराेधच

एकीकडे प्रशासन स्तरावर पुरंदर विमानतळाची अधिसूचना काढली, जमिनीचे दर जाहीर करणार, लवकर भूसंपादन करणार अशी सातत्याने चर्चा होत आहे. दुसरीकडे स्थानिक नागरिक मात्र जागा देण्यासाठी विरोध करीत आहेत.

गवताळ प्रदेशही धोक्यात

पुरंदर परिसरात कोल्हा, तरस, लांडगे यांचा अधिवास असलेली माळरानेही आहेत. त्यामुळे विमानतळ झाले तर त्यांचा संपूर्ण अधिवास नष्ट होणार आहे. येथील माळरान संवर्धन द ग्रासलॅन्ड ट्रस्टतर्फे करण्यात येत आहे. विमानतळामुळे गवताळ प्रदेशच धोक्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेPurandarपुरंदरAirportविमानतळ