शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
5
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
6
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
7
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
8
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
9
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
10
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
11
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
12
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
13
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
14
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
15
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
16
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
17
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
18
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
19
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
20
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?

...तर शेतकरी कंपन्याही बंद पडतील - सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 02:57 IST

शेतकरी उत्पादन कंपन्यांनी केवळ कमिशन एजंट म्हणून काम न करता शेतकऱ्यांचे दूत म्हणून काम करावे. अन्यथा त्यांना केवळ नाफेड व राज्य सरकारच्या कुबड्या घेवूनच काम करावे लागेल. खरेदी-विक्री संघाप्रमाणे या कंपन्याही बंद पडतील, अशी आशंका सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज (दि.६) येथे बोलताना व्यक्त केली.

इंदापूर - शेतकरी उत्पादन कंपन्यांनी केवळ कमिशन एजंट म्हणून काम न करता शेतकऱ्यांचे दूत म्हणून काम करावे. अन्यथा त्यांना केवळ नाफेड व राज्य सरकारच्या कुबड्या घेवूनच काम करावे लागेल. खरेदी-विक्री संघाप्रमाणे या कंपन्याही बंद पडतील, अशी आशंका सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज (दि.६) येथे बोलताना व्यक्त केली.महाएफपीसी व नाफेड यांच्या तर्फे भीमाव्हॅली शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत कांदा खरेदी २०१८ चा उद्घाटन समारंभ त्यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. महाएफपीसीचे व्यवस्थापकीय संचालक योगेश थोरात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतमाल निर्यात सुविधा केंद्राच्या आवारात हा कार्यक्रम पार पडला.आपल्या भाषणात देशमुख म्हणाले की, काही कंपन्या केवळ शेतकºयांचे शोषण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या विश्वासाने शेतकरी उत्पादन कंपन्या काढल्या गेल्या त्या विश्वासाला तडा जातो आहे. आपण मध्यस्थ आहोत याची काळजी घ्यावी, असे सांगून ते म्हणाले की, चांगली भूमिका घेतली तर शेतकºयांची वाट लागणार नाही. चुकीची भूमिका घेतली तर शेतकरी अडचणीत येणार आहेत. कर रूपाने सरकारला भरलेला आपला पैसा मातीत जाण्याची शक्यता आहे. यावेळी अप्पासाहेब जगदाळे, योगेश थोरात यांचीभाषणे झाली.परवाना रद्द करावाबाजार समित्यांनी शेतकºयांकडून कमिशन कापून घेवू नये, असा आदेश शासनाने काढला आहे. तरी देखील वेगळ्या पद्धतीने कमिशन कापण्याचा प्रकार बाजार समित्यांकडून होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा कमिशन एजंटांवर कठोर कारवाई करावी. त्याचा परवाना रद्द करावा, अशी सूचना देशमुख यांनी दिली.भाव वाढू द्या;खिशाला परवडत नसेल तर कांदा खावू नका!कांद्याचे भाव थोडा जरी वाढला तरी कांदा खाताना डोळ्यात पाणी येवू लागले, असे पत्रकार लिहितात. वर्षभर कांदा नाही खाल्ला तर काय होईल शरीराचं, काही नाही.जैन समाज तर कांदाच खात नाही. जे कांदा खावून रडतात ना त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही. त्यांना सल्ला द्या कांद्याचा भाव वाढू द्या; खिशाला परवडत नसेल तर कांदा खावू नका.शेतकºयाला चांगला भाव मिळत असेल तर मिळू द्या,असा सल्ला सहकार मंत्री देशमुख यांनी दिला.

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुखMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे