शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
7
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
8
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
9
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
10
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
11
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
12
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
13
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
14
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
15
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
17
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
18
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
19
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी

...तर शेतकरी कंपन्याही बंद पडतील - सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 02:57 IST

शेतकरी उत्पादन कंपन्यांनी केवळ कमिशन एजंट म्हणून काम न करता शेतकऱ्यांचे दूत म्हणून काम करावे. अन्यथा त्यांना केवळ नाफेड व राज्य सरकारच्या कुबड्या घेवूनच काम करावे लागेल. खरेदी-विक्री संघाप्रमाणे या कंपन्याही बंद पडतील, अशी आशंका सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज (दि.६) येथे बोलताना व्यक्त केली.

इंदापूर - शेतकरी उत्पादन कंपन्यांनी केवळ कमिशन एजंट म्हणून काम न करता शेतकऱ्यांचे दूत म्हणून काम करावे. अन्यथा त्यांना केवळ नाफेड व राज्य सरकारच्या कुबड्या घेवूनच काम करावे लागेल. खरेदी-विक्री संघाप्रमाणे या कंपन्याही बंद पडतील, अशी आशंका सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज (दि.६) येथे बोलताना व्यक्त केली.महाएफपीसी व नाफेड यांच्या तर्फे भीमाव्हॅली शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत कांदा खरेदी २०१८ चा उद्घाटन समारंभ त्यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. महाएफपीसीचे व्यवस्थापकीय संचालक योगेश थोरात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतमाल निर्यात सुविधा केंद्राच्या आवारात हा कार्यक्रम पार पडला.आपल्या भाषणात देशमुख म्हणाले की, काही कंपन्या केवळ शेतकºयांचे शोषण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या विश्वासाने शेतकरी उत्पादन कंपन्या काढल्या गेल्या त्या विश्वासाला तडा जातो आहे. आपण मध्यस्थ आहोत याची काळजी घ्यावी, असे सांगून ते म्हणाले की, चांगली भूमिका घेतली तर शेतकºयांची वाट लागणार नाही. चुकीची भूमिका घेतली तर शेतकरी अडचणीत येणार आहेत. कर रूपाने सरकारला भरलेला आपला पैसा मातीत जाण्याची शक्यता आहे. यावेळी अप्पासाहेब जगदाळे, योगेश थोरात यांचीभाषणे झाली.परवाना रद्द करावाबाजार समित्यांनी शेतकºयांकडून कमिशन कापून घेवू नये, असा आदेश शासनाने काढला आहे. तरी देखील वेगळ्या पद्धतीने कमिशन कापण्याचा प्रकार बाजार समित्यांकडून होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा कमिशन एजंटांवर कठोर कारवाई करावी. त्याचा परवाना रद्द करावा, अशी सूचना देशमुख यांनी दिली.भाव वाढू द्या;खिशाला परवडत नसेल तर कांदा खावू नका!कांद्याचे भाव थोडा जरी वाढला तरी कांदा खाताना डोळ्यात पाणी येवू लागले, असे पत्रकार लिहितात. वर्षभर कांदा नाही खाल्ला तर काय होईल शरीराचं, काही नाही.जैन समाज तर कांदाच खात नाही. जे कांदा खावून रडतात ना त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही. त्यांना सल्ला द्या कांद्याचा भाव वाढू द्या; खिशाला परवडत नसेल तर कांदा खावू नका.शेतकºयाला चांगला भाव मिळत असेल तर मिळू द्या,असा सल्ला सहकार मंत्री देशमुख यांनी दिला.

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुखMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे