शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

...तर शेतकरी कंपन्याही बंद पडतील - सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 02:57 IST

शेतकरी उत्पादन कंपन्यांनी केवळ कमिशन एजंट म्हणून काम न करता शेतकऱ्यांचे दूत म्हणून काम करावे. अन्यथा त्यांना केवळ नाफेड व राज्य सरकारच्या कुबड्या घेवूनच काम करावे लागेल. खरेदी-विक्री संघाप्रमाणे या कंपन्याही बंद पडतील, अशी आशंका सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज (दि.६) येथे बोलताना व्यक्त केली.

इंदापूर - शेतकरी उत्पादन कंपन्यांनी केवळ कमिशन एजंट म्हणून काम न करता शेतकऱ्यांचे दूत म्हणून काम करावे. अन्यथा त्यांना केवळ नाफेड व राज्य सरकारच्या कुबड्या घेवूनच काम करावे लागेल. खरेदी-विक्री संघाप्रमाणे या कंपन्याही बंद पडतील, अशी आशंका सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज (दि.६) येथे बोलताना व्यक्त केली.महाएफपीसी व नाफेड यांच्या तर्फे भीमाव्हॅली शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत कांदा खरेदी २०१८ चा उद्घाटन समारंभ त्यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. महाएफपीसीचे व्यवस्थापकीय संचालक योगेश थोरात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतमाल निर्यात सुविधा केंद्राच्या आवारात हा कार्यक्रम पार पडला.आपल्या भाषणात देशमुख म्हणाले की, काही कंपन्या केवळ शेतकºयांचे शोषण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या विश्वासाने शेतकरी उत्पादन कंपन्या काढल्या गेल्या त्या विश्वासाला तडा जातो आहे. आपण मध्यस्थ आहोत याची काळजी घ्यावी, असे सांगून ते म्हणाले की, चांगली भूमिका घेतली तर शेतकºयांची वाट लागणार नाही. चुकीची भूमिका घेतली तर शेतकरी अडचणीत येणार आहेत. कर रूपाने सरकारला भरलेला आपला पैसा मातीत जाण्याची शक्यता आहे. यावेळी अप्पासाहेब जगदाळे, योगेश थोरात यांचीभाषणे झाली.परवाना रद्द करावाबाजार समित्यांनी शेतकºयांकडून कमिशन कापून घेवू नये, असा आदेश शासनाने काढला आहे. तरी देखील वेगळ्या पद्धतीने कमिशन कापण्याचा प्रकार बाजार समित्यांकडून होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा कमिशन एजंटांवर कठोर कारवाई करावी. त्याचा परवाना रद्द करावा, अशी सूचना देशमुख यांनी दिली.भाव वाढू द्या;खिशाला परवडत नसेल तर कांदा खावू नका!कांद्याचे भाव थोडा जरी वाढला तरी कांदा खाताना डोळ्यात पाणी येवू लागले, असे पत्रकार लिहितात. वर्षभर कांदा नाही खाल्ला तर काय होईल शरीराचं, काही नाही.जैन समाज तर कांदाच खात नाही. जे कांदा खावून रडतात ना त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही. त्यांना सल्ला द्या कांद्याचा भाव वाढू द्या; खिशाला परवडत नसेल तर कांदा खावू नका.शेतकºयाला चांगला भाव मिळत असेल तर मिळू द्या,असा सल्ला सहकार मंत्री देशमुख यांनी दिला.

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुखMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे