शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

मानवी हस्तक्षेपामुळेच वन्य जीवन धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 4:11 AM

----- लोणी काळभोर : भारतात फार पूर्वीपासून प्राण्यांना महत्त्वाचे स्थान आहे. मात्र, अलिकडच्या काळात माणसाचे निसर्गाशी संबंध दुरावले असल्याने ...

-----

लोणी काळभोर : भारतात फार पूर्वीपासून प्राण्यांना महत्त्वाचे स्थान आहे. मात्र, अलिकडच्या काळात माणसाचे निसर्गाशी संबंध दुरावले असल्याने आणि लोकसंख्या वाढ, जंगलतोड यामुळे वन्यजीव कमी झाले आहेत. अनेक प्रजाती नामशेष झाल्या आहेत तर काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मानवाच्या अतिरेकी हस्तक्षेपामुळेच वन्य जीवन धोक्यात आले आहे, असे प्रतिपादन आयकर विभागाचे आयुक्त छावी अनुपम यांनी केले.

माजी सैनिक व वाघोली वनरक्षक बळीराम वायकर यांनी वने व वन्यजीव यांच्या संरक्षणाची जबाबदारी उत्कृष्टरित्या पार पडल्याबद्दल अनुपम यांनी त्यांचा पुरस्कार देऊन गौरव केला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अनुपम बोलत होते. वानवडी वनविहार येथे झालेल्या या कार्यक्रमाला वनपरिक्षेत्र अधिकारी मुकेश सणस, वनपाल मंगेश सपकाळे यांच्यासह वन व आयकर विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आयुक्त अनुपम म्हणाले की, पूर्वी घनदाट अरण्ये असल्यामुळे वन व वन्यजीवांचे आपोआपच रक्षण होत असे. जंगलतोडीमुळे वन्यजीवांचे अधिवास संपुष्टात आल्याने वन्य जीवनही धोक्यात आले. एकीकडे शासन विविध प्रजातींना वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे प्राण्यांच्या विविध अवयव विक्रीसाठी होणारी तस्करी, चोरटी शिकार यामुळे समस्या कमी होत नाही. मानवी हस्तक्षेपामुळे जगभरातील अनेक सस्तन प्राणी आणि पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत. पक्षी व प्राणी सुरक्षित व प्रदूषणमुक्त स्थळच प्रजननासाठी निवडतात. तसे नसेल तर त्यांच्या प्रजननावर विपरित परिणाम होऊन त्यांचे अस्तित्व धोक्यात येते. काहीवेळा ते स्थलांतरही करतात, यामुळे जंगलातील अन्नसाखळीही धोक्यात येते. विपरित परिस्थितीत टिकून राहणे अवघड झाल्याने अनेक वन्यजीवांच्या प्रजाती नामशेष झाल्या असून, अनेक लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. या प्रतिकुल परिस्थितीत बळीराम वायकर यांनी केलेली कामगिरी असाधारण आहे. प्रत्येकाने त्यांचे अनुकरण करत वने व वन्यजीव यांना वाचवावे, असे आवाहन अनुपम यांनी केले.