शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z समाज आक्रमक, सरकारविरोधात जोरदार निदर्शने
2
बिहारमध्ये झाला मोठा कांड! गावातील हिंदू घराघरातून निघाले मुस्लीम मतदार; गावकरीही झाले हैराण
3
Maratha Reservation : सरकारच्या GR विरोधातच मंत्री छगन भुजबळ कोर्टात जाणार; मराठा आरक्षणावरून OBC नेते आक्रमक
4
उद्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक; संख्याबळ कोणाकडे? कोणाचा कोणाला पाठिंबा? जाणून घ्या...
5
World Record Broken! ४०० पारच्या लढाईत इंग्लंडनं साधला टीम इंडियाचा विश्व विक्रम मोडण्याचा डाव
6
अवघ्या १५० रुपयांत मिळतं लोकेशन, तर ६०० रुपयांत फोन रेकॉर्ड! पाकिस्तानी मंत्र्यांची सुरक्षा धोक्यात 
7
१५ वर्षीय मुलगी पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात, भेटायला निघाली पण...; चॅटमधून खळबळजनक खुलासा
8
प्रयत्नांती परमेश्वर! लेक नापास पण आई झाली पास; वयाच्या पन्नाशीत लॉ कॉलेज प्रवेश परीक्षा क्रॅक
9
"कॅन्सर असल्याचं समजल्यानंतर ३ तास रडत होतो", संजय दत्तचा खुलासा, म्हणाला- "माझी पत्नी, मुलं सगळंच..."
10
विभाग प्रमुखांची नियुक्ती; शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीनाट्य, यादीत कुणाची नावे?
11
Pitru Paksha 2025: पितृपक्षात इतर प्राणी पक्षी सोडून कावळ्यालाच एवढं महत्त्व का? वाचा!
12
खुशखबर! मुंबई लोकल प्रवास आता गारेगार, वेगवानही; वंदे मेट्रोसारखे असतील डबे
13
नादखुळा...! उत्तराखंडमध्ये रस्ते बंद होते, चार विद्यार्थी बीएडची परीक्षा देण्यासाठी हेलिकॉप्टरने आले...
14
'भारतावर टॅरिफ लादणे योग्य निर्णय'; झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईचे केले समर्थन
15
अमेरिकेच्या डोळ्यात खुपताहेत भारत-चीन; "जास्त टॅरिफ लावा," आणखी एका अधिकाऱ्यानं गरळ ओकली
16
AIच्या मदतीने सामान्य माणूस बनवू शकतो अणुबॉम्ब! एआयच्या 'गॉडफादर'चा इशारा
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात पितरांच्या नैवेद्याआधी 'हे' पाच घास तुम्ही काढून ठेवता का?
18
Lunar Eclipse: येत्या ८ वर्षात तब्ब्ल २० चंद्रग्रहण, पण सगळीच भारतातून दिसणार का? वाचा!
19
वजन कमी करा, पैसे मिळवा! कंपनी देतेय जबरदस्त ऑफर; कर्मचाऱ्यांना वजन कमी केल्यावर लाखो डॉलर्स मिळणार
20
बापरे! नवऱ्याशी भांडल्यावर चिडली, गंगेत उडी मारली; मगर दिसताच रात्रभर झाडावर बसली अन्...

मानवी हस्तक्षेपामुळेच वन्य जीवन धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:11 IST

----- लोणी काळभोर : भारतात फार पूर्वीपासून प्राण्यांना महत्त्वाचे स्थान आहे. मात्र, अलिकडच्या काळात माणसाचे निसर्गाशी संबंध दुरावले असल्याने ...

-----

लोणी काळभोर : भारतात फार पूर्वीपासून प्राण्यांना महत्त्वाचे स्थान आहे. मात्र, अलिकडच्या काळात माणसाचे निसर्गाशी संबंध दुरावले असल्याने आणि लोकसंख्या वाढ, जंगलतोड यामुळे वन्यजीव कमी झाले आहेत. अनेक प्रजाती नामशेष झाल्या आहेत तर काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मानवाच्या अतिरेकी हस्तक्षेपामुळेच वन्य जीवन धोक्यात आले आहे, असे प्रतिपादन आयकर विभागाचे आयुक्त छावी अनुपम यांनी केले.

माजी सैनिक व वाघोली वनरक्षक बळीराम वायकर यांनी वने व वन्यजीव यांच्या संरक्षणाची जबाबदारी उत्कृष्टरित्या पार पडल्याबद्दल अनुपम यांनी त्यांचा पुरस्कार देऊन गौरव केला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अनुपम बोलत होते. वानवडी वनविहार येथे झालेल्या या कार्यक्रमाला वनपरिक्षेत्र अधिकारी मुकेश सणस, वनपाल मंगेश सपकाळे यांच्यासह वन व आयकर विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आयुक्त अनुपम म्हणाले की, पूर्वी घनदाट अरण्ये असल्यामुळे वन व वन्यजीवांचे आपोआपच रक्षण होत असे. जंगलतोडीमुळे वन्यजीवांचे अधिवास संपुष्टात आल्याने वन्य जीवनही धोक्यात आले. एकीकडे शासन विविध प्रजातींना वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे प्राण्यांच्या विविध अवयव विक्रीसाठी होणारी तस्करी, चोरटी शिकार यामुळे समस्या कमी होत नाही. मानवी हस्तक्षेपामुळे जगभरातील अनेक सस्तन प्राणी आणि पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत. पक्षी व प्राणी सुरक्षित व प्रदूषणमुक्त स्थळच प्रजननासाठी निवडतात. तसे नसेल तर त्यांच्या प्रजननावर विपरित परिणाम होऊन त्यांचे अस्तित्व धोक्यात येते. काहीवेळा ते स्थलांतरही करतात, यामुळे जंगलातील अन्नसाखळीही धोक्यात येते. विपरित परिस्थितीत टिकून राहणे अवघड झाल्याने अनेक वन्यजीवांच्या प्रजाती नामशेष झाल्या असून, अनेक लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. या प्रतिकुल परिस्थितीत बळीराम वायकर यांनी केलेली कामगिरी असाधारण आहे. प्रत्येकाने त्यांचे अनुकरण करत वने व वन्यजीव यांना वाचवावे, असे आवाहन अनुपम यांनी केले.