शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वन्य प्राणी मानवी वस्तीकडे

By admin | Updated: January 10, 2017 03:02 IST

मावळ तालुक्यातील अनेक दुर्गम गावांमध्ये वन विभागाचे मोठे कार्यक्षेत्र असून, मोठी जंगले आहेत. या जंगलात वन्य प्राण्यांचे मुख्य निवासस्थान आहे

 कामशेत : मावळ तालुक्यातील अनेक दुर्गम गावांमध्ये वन विभागाचे मोठे कार्यक्षेत्र असून, मोठी जंगले आहेत. या जंगलात वन्य प्राण्यांचे मुख्य निवासस्थान आहे. परंतु, वाढते शहरीकरण, मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, ओसाड होणारे डोंगर, वाढत्या शिकारी, जंगलातील नागरिकांचा वाढता वावर, जंगलातील संपत चाललेले पाण्याचे स्रोत, धोक्यात येत असलेला निवारा आदी कारणांमुळे वन्य प्राणी मानवी वस्तीत येऊ लागल्याच्या घटनांमध्ये काही वर्षात वाढ झाली आहे. स्थानिक नागरिक, पाळीव प्राणी, शेती आदींना या वन्यप्राण्यांमुळे धोका निर्माण होऊ शकतो. याला जबाबदार कोण, असा प्रश्न पर्यावरणप्रेमी व प्राणीमित्र संघटना उपस्थित करत आहेत. तालुक्यातील नाणे, पवन, आंदर मावळामध्ये मोठी धरणे आहेत. नाणे मावळात शिरोता व वडिवळे, पवन मावळात पवना, आंदर मावळात आंद्रा आदी धरणे, छोटे मोठे तलाव, इतर जलाशय आणि अनेक नद्या आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात दाट जंगले आहेत. या भागांमध्ये अनेक लहान मोठी गावे, वाड्यावस्त्या असून येथे वास्तव्य करणाऱ्या सर्वांचाच उदरनिर्वाह हा शेती व शेतीपूरक व्यवसायांवर अवलंबून आहे. यात शेळीपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन आदी जोडव्यवसाय आहेत. शेतीत प्रामुख्याने भात, गहू, विविध कडधान्य व खरीप, रब्बी हंगामातील इतर पिके घेतली जातात. मावळातील वाढत्या शहरीकरणाचा फटका अनेक ग्रामीण व दुर्गम भागांमधील गावांनाही बसला आहे. वृक्षतोडीमुळे जंगले ओसाड होत चालली आहेत. याचप्रमाणे गौण खनिज माती, मुरूम व डबर आदींचे अनेक व्यावसायिक सरकारी विभागांच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने होत असलेले बेसुमार उत्खननामुळे मावळातील अनेक टेकड्या नामशेष झाल्या आहेत. डोंगर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जळणासाठी व इतर व्यावसायिक कारणांसाठी जंगल व परिसरातील वृक्षांची कत्तल वाढली असून, वन विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. राजकीय पुढारी व सरकारी अधिकारी वृक्षारोपण कार्यक्रमाच्या फोटो व प्रसिद्धीसाठी येतात. लागवड केलेल्या वृक्षांची कोणत्याही प्रकारे काळजी न घेतल्याने तसेच संवर्धनाचे कोणतेही नियोजन नसल्याने लागवड केलेल्या शंभर झाडांपैकी पाच झाडेही जगत नसल्याचा आरोप अनेक पर्यावरणप्रेमी संघटना करीत आहेत. वृक्षतोड ग्रामीण भागातील अनेकांचा व्यवसाय बनला असून, यात वनरक्षकांचाही मोठा वाट असल्याचे बोलले जात आहे. नैसर्गिक कारणांबरोबरच मानवनिर्मित कृत्रिम कारणांमुळे वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीत वावर वाढला आहे. या प्राण्यांमुळे शेतीचे तर नुकसान होतच आहे, शिवाय पाळीव प्राण्यांवरती हल्ले वाढले आहेत. जनावरांना रानात चरावयास सोडणे धोकादायक झाले असून, अनेक गावांतील नागरिकही रात्री उशिरा बाहेर पडण्यास घाबरत आहेत. मागील काही महिन्यांमध्ये बिबट्याने नाणे मावळातील भाजगाव येथे दोन शेळ्या, साई येथे वासरू व इतर पाच पाळीव प्राणी व इतर अनेक प्राण्यांचा फडशा पडला. ताजेजवळ एका आश्रमात कुत्र्यावर वन्यप्राण्याने हल्ला केला होता.उंबरवाडी येथील पठारावरील धनगरवस्तीजवळ बिबट्याचा वावर वाढला आहे. याशिवाय अन्य वन्यप्राणी शेतीचे मोठे नुकसान करत आहेत. (वार्ताहर)शिकारी वाढल्या : बंदुकीच्या परवान्याचा होतोय गैरवापर दुर्गम भागातील ठराविक गावांमध्ये शासनाने संरक्षणासाठी बंदुकीचे परवाने दिले असून, त्याचा विधायक कामांसाठी फारसा उपयोग केला जात नसल्याच्या तक्रारी आहेत. शिकारी करणे, पाहुणे मंडळींना व व्यावसायिक शिकाऱ्यांना बोलावून रानात शिकार करून पार्ट्या करणे, वन्य प्राण्यांच्या मांसाची विक्री करणे आदीत वाढ झाली आहे. स्थानिकांचा कल याकडे वाढला आहे. याचा फायदा शहरांमधील बंदूकधारी शिकारी घेत असून, याकडे अनेक शासकीय विभागांचा काणाडोळा होत आहे. जंगलांच्या ऱ्हासाला व वन्य प्राणी मानवी वस्तीत येण्याला जबाबदार कोण?  वाढत्या शिकारीच्या घटनांमुळे वन्यप्राण्यांचे जीवन धोक्यात आले आहे. बेसुमार वृक्षतोड व उत्खनन या सर्वांमुळे जैवसाखळीच धोक्यात आली आहे. याचा त्रास या दुर्गम भागातील शेतकरी व नागरिकांनाच होत आहे. सरकार व वनविभागाने या संवेदनशील विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. दोषी नागरिक, वनरक्षक व इतरांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे; अन्यथा मावळातील जंगले लयास जातील व वन्य प्राण्यांचा माणसांवरतीही हल्ला सुरू होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.