शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
3
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
4
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
5
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
6
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
8
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
9
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
10
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
11
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
12
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
13
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
14
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
15
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
16
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
17
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
18
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
19
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
20
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!

दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा आम्हाला का : सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचा सवाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:25 IST

विद्यार्थी १०वीमध्ये गेल्यावर तर त्याला अधिकाधिक अभ्यास करण्याच्या सूचना वर्षभर मिळत असतात. अशात मार्च महिन्यात बोर्डाच्या परीक्षा सुरु झाल्या की घरात अक्षरश: कर्फ्यूसारखे वातावरण तयार होते. यंदा मात्र सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना हा कर्फ्यू अधिक काळ सहन करावा लागणार आहे.  

ठळक मुद्दे अनेक विद्यार्थ्यांच्या सुट्यांचे प्लॅन रद्द वर्षभर अभ्यास करून विनाकारण त्रास झाल्याची विद्यार्थ्यांची भावना

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे पेपर  फुटल्याचे समोर आल्याने  या दोन्ही विषयांची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय सीबीएसई बोर्डाने घेतला आहे.या निर्णयामुळे परीक्षा लांबणार असून महिन्याभरापेक्षा अधिक काळ विद्यार्थी परीक्षार्थीची भूमिका निभावणार आहेत. त्यामुळे वर्षभर अभ्यास करून परीक्षेनंतर सहल किंवा इतर काही आखलेले कार्यक्रमही अनेकांनी रद्द केले आहेत. कोणीतरी केलेल्या चुकीची शिक्षा संपूर्ण देशभरातील विद्यार्थ्यांना आणि पालकांना  भोगावी लागणार असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.१५ मार्च पासून सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली. नियोज़नानुसार येत्या सोमवारी (दि.२) रोजी या परीक्षा संपणार होत्या. मात्र दहावीचा गणित आणि बारावीच्या अर्थशास्त्राचा पेपरफुटल्याने पुन्हा परीक्षा होणार आहेत. यामुळे यंदा प्रथमच असल्याने महिन्याभरापेक्षा अधिक काळ परीक्षा सुरु राहण्याची शक्यता आहे. यामुळे विद्यार्थी साहजिकच नाराज झाले असले तरी निदान आता तरी गैरप्रकाराविना परीक्षा पार पडेल अशी त्यांना आशा आहे.  

   नववीच्या वर्गात विद्यार्थी गेले की त्यांना घरचे, बाहेरचे सगळे जण 'पुढच्या वर्षी अशा मजा नाही' असं बजावायला लागतात. त्याच्या करीअरमधला १०वी हा महत्वपूर्ण टप्पा आहे याची जाणीवही त्याला वेळोवेळी करून दिली जाते. प्रत्यक्षात विद्यार्थी १०वीमध्ये गेल्यावरही तर त्याला अधिकाधिक अभ्यास करण्याच्या सूचना वर्षभर मिळत असतात. अशात मार्च महिन्यात बोर्डाच्या परीक्षा सुरु झाल्या की घरात अक्षरश: कर्फ्यूसारखे वातावरण तयार होते.यंदा मात्र सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना हा कर्फ्यू अधिक काळ सहन करावा लागणार आहे. 

    या विषयावर आम्ही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. १०वी शिकणाऱ्या रिया सोनी हिने या निर्णयाचे स्वागत केले. आम्ही वर्षभर अभ्यास केला आहे. त्यामुळे चुकीचे मार्ग वापरून कोणी मार्क घेत असतील तर त्यांना शिक्षा व्हायला हवी. अभ्यास झालेला असल्याने पुन्हा परीक्षा घेण्यास हरकत नाही असंही ती म्हणाली.मधुरा शिर्के हिने मात्र काहीस वेगळं मत मांडलं  असून पुढच्या वेळी परीक्षा देताना पेपर फुटणार नाही याची काय खात्री असा प्रश्न तिने विचारला. माझ्या अनेक मैत्रिणी परीक्षा संपल्यावर बाहेरगावी जाणार होत्या मात्र आता ते सर्व प्लॅन रद्द करावे लागणार आहे असेही तिने स्पष्ट केले. अनुश्री करवा हिने गणित आम्हाला अवघड होता. मात्र आजचा पेपर बघून मी खूप खुश होते. पण बातमी समजल्यावर  आम्हा सर्व मैत्रिणींना धक्का बसला असून आता पुढे होणारा पेपर कसा येईल याचीचं धास्ती आहे असे ती म्हणाली. पालक रुपाली चाकणकर यांनी बोलताना हा निर्णय कळल्यावर मुलाने चिडचिड केल्याचे सांगितले. वर्षभर मुलं अभ्यास करत असून परत आता परीक्षेचा कालावधी वाढल्याने मुलाने चिडून आता अभ्यास करणार नसल्याचे सांगितले. आजचा पेपर चांगला गेला असतानाही दुसऱ्याच्या चुकीमुळे मार्क मिळणार नाही समजल्यावर त्याचे डोळे भरून आल्याची प्रतिक्रियाही त्यांनी नोंदवली. दुसऱ्या पालक राखी सोनी यांनीही पाच दिवस मुलांनी जीवाचं रान करून अभ्यास केल्यावर अशी वेळ येणं दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया नोंदवली. यामुळे संपूर्ण सुट्यांचं नियोजन बिघडणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

 

 

टॅग्स :CBSE Examsकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ परीक्षाexamपरीक्षाeducationशैक्षणिकStudentविद्यार्थी