शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, गौरीकुंडजवळ अपघात; सात जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
6
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
7
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
8
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
9
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
10
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
11
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
12
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
13
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
14
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
15
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
16
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
17
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
18
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
19
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
20
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा

का घालण्यात आली होती संभाजी पुलावर दुचाकीला बंदी ; वाचा रंजक इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 21:22 IST

संभाजी पुलावरुन दुचाकी वाहनांना जाण्यास बंदी घालण्याचा आदेश तत्कालीन अपर पोलीस आयुक्तांनी ७ एप्रिल १९९४ रोजी काढलेल्या आदेशानुसार घालण्यात आले होते़.  त्याचा इतिहासही मोठा रंजक आहे़. 

विवेक भुसेपुणे : संभाजी पुलावरुन दुचाकी वाहनांना जाण्यास बंदी घालण्याचा आदेश तत्कालीन अपर पोलीस आयुक्तांनी ७ एप्रिल १९९४ रोजी काढलेल्या आदेशानुसार घालण्यात आले होते़.  त्याचा इतिहासही मोठा रंजक आहे़.          पुणे महापालिकेने संभाजी पुलाला समांतर सायकलींसाठी दोन पुल बांधण्याचा निर्णय घेतला होता़.  हा निर्णय १९८०च्या दरम्यान घेण्यात आला होता़ त्यानुसार काकासाहेब गाडगीळ पुल (झेड ब्रिज) आणि पुना हॉस्पिटलजवळील यशवंतराव चव्हाण पुल यांचे बांधकाम सुरु झाले़, पण हे बांधकाम विविध कारणांमुळे वर्षानुवर्षे रेंगाळले़.  त्या दरम्यान, सर्वाधिक सायकलीच्या शहरातून गायब होऊ लागल्या होत्या व दुचाकींची संख्या वेगाने वाढू लागली होती़. कालांतराने या दोन्ही पुलांचे बांधकाम पुर्ण झाले़. तरीही लोकांना सवय असल्याने लोक या दोन्ही पुलावरुन जाण्याऐवजी संभाजी पुलावरुनच जात होते़. कोथरुडचा विकास वेगाने होत असल्याने सर्व जण या पुलाचा वापर शहराच्या दुसरी बाजूला येण्यासाठी करत असत़. त्यामुळे या पुलावर वाहतूक कोंडी होऊ लागली होती़. पुलावरील वाहनांची संख्या कमी व्हावी व या दोन्ही पुलांचा वापर व्हावा, या हेतूने १९९४ मध्ये संभाजी पुलावरुन दुचाकी वाहनांना जाण्यास बंदी करण्यात आली़ त्यात रात्री साडेनऊ ते सकाळी सात यावेळेत सुट देण्यात आली होती़.           वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने जरी हा निर्णय घेतला असला तरी त्याचा वाहतूक पोलीस गैरफायदा घेऊ लागले़.  एखादा दुचाकीस्वार चुकून या पुलावर गेला तर त्याला पुलाच्या सुरुवातीला कोणी अडवत नसत़ पण दुसऱ्या टोकाला गेल्यावर तो पोलिसांच्या तावडीत सापडत असे़.  त्यातून अनेकांवर दंडात्मक कारवाई होत असे़. त्याचबरोबर वाहनचालकांकडून चिरीमिरी घेण्याचे एक नवे साधन वाहतूक पोलिसांना मिळाले होते. त्याच्या असंख्य तक्रारी कायमच येत असत़ त्यातून अनेक तक्रारी या वरिष्ठांपर्यंत नेहमी जात होत्या़. ही बंदी उठविण्यात येणार असल्याने आता या तक्रारीही बंद होतील.

टॅग्स :sambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडtraffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडीhistoryइतिहास