शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

का घालण्यात आली होती संभाजी पुलावर दुचाकीला बंदी ; वाचा रंजक इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 21:22 IST

संभाजी पुलावरुन दुचाकी वाहनांना जाण्यास बंदी घालण्याचा आदेश तत्कालीन अपर पोलीस आयुक्तांनी ७ एप्रिल १९९४ रोजी काढलेल्या आदेशानुसार घालण्यात आले होते़.  त्याचा इतिहासही मोठा रंजक आहे़. 

विवेक भुसेपुणे : संभाजी पुलावरुन दुचाकी वाहनांना जाण्यास बंदी घालण्याचा आदेश तत्कालीन अपर पोलीस आयुक्तांनी ७ एप्रिल १९९४ रोजी काढलेल्या आदेशानुसार घालण्यात आले होते़.  त्याचा इतिहासही मोठा रंजक आहे़.          पुणे महापालिकेने संभाजी पुलाला समांतर सायकलींसाठी दोन पुल बांधण्याचा निर्णय घेतला होता़.  हा निर्णय १९८०च्या दरम्यान घेण्यात आला होता़ त्यानुसार काकासाहेब गाडगीळ पुल (झेड ब्रिज) आणि पुना हॉस्पिटलजवळील यशवंतराव चव्हाण पुल यांचे बांधकाम सुरु झाले़, पण हे बांधकाम विविध कारणांमुळे वर्षानुवर्षे रेंगाळले़.  त्या दरम्यान, सर्वाधिक सायकलीच्या शहरातून गायब होऊ लागल्या होत्या व दुचाकींची संख्या वेगाने वाढू लागली होती़. कालांतराने या दोन्ही पुलांचे बांधकाम पुर्ण झाले़. तरीही लोकांना सवय असल्याने लोक या दोन्ही पुलावरुन जाण्याऐवजी संभाजी पुलावरुनच जात होते़. कोथरुडचा विकास वेगाने होत असल्याने सर्व जण या पुलाचा वापर शहराच्या दुसरी बाजूला येण्यासाठी करत असत़. त्यामुळे या पुलावर वाहतूक कोंडी होऊ लागली होती़. पुलावरील वाहनांची संख्या कमी व्हावी व या दोन्ही पुलांचा वापर व्हावा, या हेतूने १९९४ मध्ये संभाजी पुलावरुन दुचाकी वाहनांना जाण्यास बंदी करण्यात आली़ त्यात रात्री साडेनऊ ते सकाळी सात यावेळेत सुट देण्यात आली होती़.           वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने जरी हा निर्णय घेतला असला तरी त्याचा वाहतूक पोलीस गैरफायदा घेऊ लागले़.  एखादा दुचाकीस्वार चुकून या पुलावर गेला तर त्याला पुलाच्या सुरुवातीला कोणी अडवत नसत़ पण दुसऱ्या टोकाला गेल्यावर तो पोलिसांच्या तावडीत सापडत असे़.  त्यातून अनेकांवर दंडात्मक कारवाई होत असे़. त्याचबरोबर वाहनचालकांकडून चिरीमिरी घेण्याचे एक नवे साधन वाहतूक पोलिसांना मिळाले होते. त्याच्या असंख्य तक्रारी कायमच येत असत़ त्यातून अनेक तक्रारी या वरिष्ठांपर्यंत नेहमी जात होत्या़. ही बंदी उठविण्यात येणार असल्याने आता या तक्रारीही बंद होतील.

टॅग्स :sambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडtraffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडीhistoryइतिहास