शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

नावातच ‘राष्ट्र’ शब्द असताना संघ हिंदू समाजापुरता बंदिस्त का? भय्याजी जोशी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 12:54 IST

देशाचे नुकसान हे सज्जन शक्तीच्या निष्क्रियतेनेच झाले आहे. हीच निष्क्रियता झटकून हिंदू समाजाला सक्रिय करायचे आहे.

ठळक मुद्दे ' राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक विशाल संघटन' पुस्तकाचे प्रकाशन  धर्माचे रक्षण करण्यासाठी संघ विचार महत्त्वाचा समाजात  एकरूप झालेली व्यक्ती निर्माण करणे हे आमचे काम

 पुणे :  ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’ च्या नावात  ‘राष्ट्र’ हा शब्द असतानाही संघाने हिंदू समाजापुरतेच का स्वत:ला बांधून घेतले. हा विपर्यास आणि विसंगती आहे असे नेहमीच म्हटले जाते. मात्र या देशाचे उत्थान आणि पतन हे हिंदुमुळेच झाले. त्यांना उभे करणे हेच आमचे काम आहे. देशाचे नुकसान हे सज्जन शक्तीच्या निष्क्रियतेनेच झाले आहे. हीच निष्क्रियता झटकून हिंदू समाजाला सक्रिय करायचे आहे. धर्माचे रक्षण केल्यानेच हा देश परम वैभवाला जाणार आहे, अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी संघावर होणा-या टिकेला प्रत्युत्तर दिले.     स्नेहल प्रकाशनच्या वतीने रामकृष्ण पटवर्धन लिखित ' राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक विशाल संघटन' पुस्तकाचे प्रकाशन  भय्याजी जोशी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योगपती अरुण फिरोदिया, एअरमार्शल भूषण गोखले (निवृृत्त) प्रकाशक रवींद्र घाटपांडे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्त्रबुद्धधे, लेखक रामकृष्ण पटवर्धन आणि जयंत रानडे उपस्थित होते.     संघाचे संघटन कौशल्य आगामी काळात सांभाळणं हेच मोठे आव्हान असल्याचे सांगून भय्याजी जोशी यांनी संघाची कार्यपद्धती विशद केली. ते म्हणाले,  व्याप्ती, स्वयंसेवक किती, भौगोलिक क्षेत्र हे संघाचे मापदंड असले तरी संघाची काही वैशिष्ट्य आहेत. हजारो वर्षे समाज परिवर्तनाचे प्रयत्न झाले त्यात संघ जोडला गेला. संस्था स्थापनेच्या साचेबद्ध पद्धती डावलून संघाचे काम सुरू झाले. संघाचे काम करताना प्रारंभ कर्त्याची एक दृष्टी असते सरसंघचालकांनी आराखडा देण्यापेक्षा लक्ष्य दिले.  संघ शक्तिशाली, विचारांनी प्रेरित आणि निष्क्रियता सोडून सक्रिय झाला पाहिजे. धर्माचे रक्षण करण्यासाठी संघ विचार महत्त्वाचा आहे.समाज कालप्रवाहात जागृत राहिला नाही तर काय होते? याचे उदाहरण भारत आहे.  विचार विमानातून चालला आहे आणि आचरण बैलगाडीतून चालले आहे असे होता कामा नये.  आचरणात आणता येत नाही ते सिद्धांतच नाहीत. एक निर्दोष समाज उभा करायचा आहे हे दोष दूर करण्यासाठी पुरुषार्थ निर्माण केला पाहिजे. आम्ही मुस्लिम ख्रिश्चन विरोधी आहात का? तर नाही. कुणाच्या विरोधात नाही  केवळ हिंदू समाजातील दोष दूर करायचा आहे. सकारात्मक दृष्टीकोन घेऊन जात आहोत. हिंदू संघाच्या शाखेवर येईल अशी आमची धारणा नाही. पण किमान नेतृत्व निर्माण करीत आहोत. समाजात  एकरूप झालेली व्यक्ती निर्माण करणे हे आमचे काम आहे. आदर्शाच्या मागे लोक उभे राहतात अशी मंडळी गावोगावी निर्माण करणे ही संघाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.      आपले ' आदेश' काय आहेत यामधील  ‘आदेश’  या शब्दाला संघाने तिलांजली दिली आहे. आपली इच्छा काय आहे. समाजासाठी मीच काम केले पाहिजे .स्वयंसेवक कुठलीही गोष्ट स्पर्धेसाठी करीत नाहीत.  धार्मिक नेतृत्ब सामाजिक परिवर्तनात सहभागी झाले पाहिजे याकडे त्यांनी लक्ष वेधले.     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम भुर्के यांनी केले.--------------------------------चौकट१९९२ मध्ये अयोध्येतील ’ वादग्रस्त’ ढाचा आम्ही पडला असा गैरसमज आमचाही अनेक वर्षे होता. पण, हिंदू समाजाच्या जागरणातून हे घडले असे संघ मानतो अशी पृष्टी भय्याजी जोशी यांनी जोडली.

टॅग्स :PuneपुणेHinduहिंदूRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ