शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

नावातच ‘राष्ट्र’ शब्द असताना संघ हिंदू समाजापुरता बंदिस्त का? भय्याजी जोशी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 12:54 IST

देशाचे नुकसान हे सज्जन शक्तीच्या निष्क्रियतेनेच झाले आहे. हीच निष्क्रियता झटकून हिंदू समाजाला सक्रिय करायचे आहे.

ठळक मुद्दे ' राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक विशाल संघटन' पुस्तकाचे प्रकाशन  धर्माचे रक्षण करण्यासाठी संघ विचार महत्त्वाचा समाजात  एकरूप झालेली व्यक्ती निर्माण करणे हे आमचे काम

 पुणे :  ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’ च्या नावात  ‘राष्ट्र’ हा शब्द असतानाही संघाने हिंदू समाजापुरतेच का स्वत:ला बांधून घेतले. हा विपर्यास आणि विसंगती आहे असे नेहमीच म्हटले जाते. मात्र या देशाचे उत्थान आणि पतन हे हिंदुमुळेच झाले. त्यांना उभे करणे हेच आमचे काम आहे. देशाचे नुकसान हे सज्जन शक्तीच्या निष्क्रियतेनेच झाले आहे. हीच निष्क्रियता झटकून हिंदू समाजाला सक्रिय करायचे आहे. धर्माचे रक्षण केल्यानेच हा देश परम वैभवाला जाणार आहे, अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी संघावर होणा-या टिकेला प्रत्युत्तर दिले.     स्नेहल प्रकाशनच्या वतीने रामकृष्ण पटवर्धन लिखित ' राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक विशाल संघटन' पुस्तकाचे प्रकाशन  भय्याजी जोशी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योगपती अरुण फिरोदिया, एअरमार्शल भूषण गोखले (निवृृत्त) प्रकाशक रवींद्र घाटपांडे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्त्रबुद्धधे, लेखक रामकृष्ण पटवर्धन आणि जयंत रानडे उपस्थित होते.     संघाचे संघटन कौशल्य आगामी काळात सांभाळणं हेच मोठे आव्हान असल्याचे सांगून भय्याजी जोशी यांनी संघाची कार्यपद्धती विशद केली. ते म्हणाले,  व्याप्ती, स्वयंसेवक किती, भौगोलिक क्षेत्र हे संघाचे मापदंड असले तरी संघाची काही वैशिष्ट्य आहेत. हजारो वर्षे समाज परिवर्तनाचे प्रयत्न झाले त्यात संघ जोडला गेला. संस्था स्थापनेच्या साचेबद्ध पद्धती डावलून संघाचे काम सुरू झाले. संघाचे काम करताना प्रारंभ कर्त्याची एक दृष्टी असते सरसंघचालकांनी आराखडा देण्यापेक्षा लक्ष्य दिले.  संघ शक्तिशाली, विचारांनी प्रेरित आणि निष्क्रियता सोडून सक्रिय झाला पाहिजे. धर्माचे रक्षण करण्यासाठी संघ विचार महत्त्वाचा आहे.समाज कालप्रवाहात जागृत राहिला नाही तर काय होते? याचे उदाहरण भारत आहे.  विचार विमानातून चालला आहे आणि आचरण बैलगाडीतून चालले आहे असे होता कामा नये.  आचरणात आणता येत नाही ते सिद्धांतच नाहीत. एक निर्दोष समाज उभा करायचा आहे हे दोष दूर करण्यासाठी पुरुषार्थ निर्माण केला पाहिजे. आम्ही मुस्लिम ख्रिश्चन विरोधी आहात का? तर नाही. कुणाच्या विरोधात नाही  केवळ हिंदू समाजातील दोष दूर करायचा आहे. सकारात्मक दृष्टीकोन घेऊन जात आहोत. हिंदू संघाच्या शाखेवर येईल अशी आमची धारणा नाही. पण किमान नेतृत्व निर्माण करीत आहोत. समाजात  एकरूप झालेली व्यक्ती निर्माण करणे हे आमचे काम आहे. आदर्शाच्या मागे लोक उभे राहतात अशी मंडळी गावोगावी निर्माण करणे ही संघाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.      आपले ' आदेश' काय आहेत यामधील  ‘आदेश’  या शब्दाला संघाने तिलांजली दिली आहे. आपली इच्छा काय आहे. समाजासाठी मीच काम केले पाहिजे .स्वयंसेवक कुठलीही गोष्ट स्पर्धेसाठी करीत नाहीत.  धार्मिक नेतृत्ब सामाजिक परिवर्तनात सहभागी झाले पाहिजे याकडे त्यांनी लक्ष वेधले.     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम भुर्के यांनी केले.--------------------------------चौकट१९९२ मध्ये अयोध्येतील ’ वादग्रस्त’ ढाचा आम्ही पडला असा गैरसमज आमचाही अनेक वर्षे होता. पण, हिंदू समाजाच्या जागरणातून हे घडले असे संघ मानतो अशी पृष्टी भय्याजी जोशी यांनी जोडली.

टॅग्स :PuneपुणेHinduहिंदूRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ