शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

नाती निभावताना कायद्याची गरज का पडते? डॉ. शालिनी फणसळकर- जोशी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 18:53 IST

कुटुंब व कायदा या दोन गोष्टी कधीच जुळू शकत नाहीत़...

पुणे : कुटुंब व कायदा या दोन गोष्टी कधीच जुळू शकत नाहीत़. जे नाते कायद्यावर आधारितच नाही, ते कायद्याने जोडू अथवा तूटू शकत नाही़ त्यामुळे नाती निभावताना आपल्याला कायद्याची गरज का पडते, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती डॉ़ शालिनी फणसळकर-जोशी यांनी उपस्थित केला़     कुटुंब कायदा : समज-गैरसमज या विषयाच्या अनुषंगाने, कुटुंब कायदेविषयक माहिती आणि जनजागृतीपर युट्यूबवरील व्हिडिओजचे विमोचन आणि लोकार्पण सोहळा डॉ़ फणसळकर-जोशी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला़ यावेळी अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे उपस्थित होत्या़ अ‍ॅड़ भूषण कुलकर्णी यांनी या व्हिडिओज तयार केले आहेत़    डॉ़.फ़णसळकर-जोशी म्हणाल्या, कुटुंब म्हणजे भावना, जन्मोजन्मीची नाती़ व कायदा म्हणजे रूक्ष व्यवहार होय़.  कुटुंब कायद्यात जो जिंकतो तो कधीच जिंकलेला नसतो तर समोरच्याबरोबरच तो व त्याचे कुटुंबही हरलेले असते़. त्यामुळे कायदा आपण कुटुंबाच्या बाहेरच ठेवला पाहिजे़.     आमच्या समोर घटस्फोटाचे दावे येतात तेव्हा, त्या पती-पत्नीमधील भांडणाचा त्यांचा मुलांवर होणारा मानसिक परिणाम हा विचार करायला लावणारा असतो़ असे सांगून न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांनी, कौटुंबिक न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम करताना आम्हा न्यायधीशांना एखाद्याच्या बाजूने निकाल देण्यात कधीच आंनद होत नसल्याचे सांगितले़. या दाव्यांमध्ये त्या कुटुंबाला एकत्र कसे आणता येईल ते आम्ही प्राधान्याने पाहतो़. कुटुंब कायदा यातील मूळ उद्देश हा भांडणांतून मार्ग काढून त्यांना एकत्र आणणे हाच असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले़.     अ‍ॅड. भूषण कुलकर्णी यांनी हे व्हिडिओ तयार करण्यामागील भूमिका मांडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्मिता जोशी यांनी केले तर, आभार श्रेयस कुलकर्णी यांनी मानले़. ================

संभाषण सुखी कुटुंबाची किल्लीआजच्या तंत्रज्ञानाच्या युगात ‘व्हॉटअप’, व्टिटर, फेसबुक यामुळे नवरा-बायको, आई-वडिल मुलांमधील संभाषण कमी झाले आहे़ कुठेही पाहिले तर प्रत्येक जण यामध्येच गुरफटलेला असतो़ कुटुंबातील तसेच नवरा-बायकोमधील संभाषण संपुष्टात आले असून नाती दूरावली आहेत़ मात्र संभाषणच एकमेकांना जवळ आणू शकते व संभाषण हीच सुखी कुटुंबाची किल्ली आहे़ असे मत न्यायमुर्ती रेवती मोहिते-डेरे यांनी व्यक्त केले़ 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयrelationshipरिलेशनशिप