शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईनच घेण्याचा विद्यार्थ्यांचा अट्टहास का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 18:18 IST

बुधवारी राज्यातील महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय झाला

- शिवानी खोरगडे 

पुणे : बुधवारी राज्यातील महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय झाला. पण विद्यापीठ परिक्षांबाबत मात्र विद्यार्थी संभ्रमातच आहेत. आता वैतागून सोशल मिडियावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री आणि विद्यापीठ प्रशासनाला नाराजी व्यक्त करत प्रश्न विचारायला सुरुवात केलीय. 

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरु होणार असल्याची घोषणा केली खरी. पण नियमित सत्राच्या परिक्षांचा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. एकीकडे महाविद्यालये सुरु होणार आहेत तरी सुध्दा विद्यार्थी मात्र परिक्षा ऑनलाईनच घेण्याचा अट्टहास करत आहेत. महाराष्ट्र स्टुडेंट वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष वैभव इडके यांनी केलेल्या ट्विटनुसार, 'विद्यार्थ्यांची मानसिक परिस्थिती लक्षात घेता नियमित सत्राच्या परीक्षा ऑनलाईन मोडनेच व्हायला हव्यात. हा विषय विद्यापीठांकडे सोपवून उदय सामंत यांनी या विषयातून काढता पाय घेतला आहे. सर्व विद्यापीठांसाठी समसमान निर्णय व्हायला हवा व खासकरुन पुणे आणि नागपूर विद्यापीठाने आपला निर्णय लवकरात लवकर जाहीर करावा.' 

याशिवाय इडके यांनी 'लोकमत'शी बोलताना हेही सांगितलं की, 'उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून सतत सांगण्यात येत होतं की परिक्षा या ऑनलाईनच घेण्यात येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तशाच पध्दतीच्या/पॅटर्न परीक्षेची तयारी केलीय. महाराष्ट्रातील बहुतांश विद्यापीठं ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेत आहेत. त्यांमुळे पुणे विद्यापीठाच्या परीक्षा जर ऑफलाईन पध्दतीनं झाल्यात तर भविष्यात विद्यार्थ्यांपुढे स्पर्धा निर्माण होऊ शकते. म्हणजे इतर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना जास्त टक्केवारी असेल आणि पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना कमी टक्केवारी असेल. विद्यार्थी अजूनही आपापल्या गावी आहेत. आणि महाविद्यालये सुरु होणार म्हणजे काही पूर्णतः सुरु होऊ शकत नाहीत. टप्प्याटप्प्यानंच सुरु होतील. म्हणून शंभर टक्के विद्यार्थी महाविद्यालयात येणार नाहीत. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा झाली तर ती सर्वांना सोयीस्कर ठरणार आहे.' 

या संदर्भात 'लोकमत'नं विद्यापीठ प्रशासनाशी संपर्क साधला. तेव्हा परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'परीक्षा मंडळाची बैठक येत्या आठवडाभरात विद्यापीठात होईल. संबंधित विषयासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार मंडळाचे आहेत. मी त्या मंडळाचा फक्त सदस्य सेक्रेटरी आहे. त्यामुळे तिथे जे कुलगुरु, प्र-कुलगुरु आणि इतर तज्ज्ञ मंडळी आलेला शासन निर्णय आणि एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतील. जिल्ह्यातील परिस्थिती काय आहे ते विचारात घेऊन परीक्षा मंडळाकडून परीक्षांबाबत ठरवलं जाईल. काही ठिकाणी ऑनलाईन, काही ठिकाणी सेंटर्सवर बोलवून ऑनलाईन तर काही ठिकाणी ऑफलाईन परीक्षा होऊ शकतात.' 

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षाonlineऑनलाइनMaharashtraमहाराष्ट्र