शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईनच घेण्याचा विद्यार्थ्यांचा अट्टहास का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 18:18 IST

बुधवारी राज्यातील महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय झाला

- शिवानी खोरगडे 

पुणे : बुधवारी राज्यातील महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय झाला. पण विद्यापीठ परिक्षांबाबत मात्र विद्यार्थी संभ्रमातच आहेत. आता वैतागून सोशल मिडियावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री आणि विद्यापीठ प्रशासनाला नाराजी व्यक्त करत प्रश्न विचारायला सुरुवात केलीय. 

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरु होणार असल्याची घोषणा केली खरी. पण नियमित सत्राच्या परिक्षांचा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. एकीकडे महाविद्यालये सुरु होणार आहेत तरी सुध्दा विद्यार्थी मात्र परिक्षा ऑनलाईनच घेण्याचा अट्टहास करत आहेत. महाराष्ट्र स्टुडेंट वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष वैभव इडके यांनी केलेल्या ट्विटनुसार, 'विद्यार्थ्यांची मानसिक परिस्थिती लक्षात घेता नियमित सत्राच्या परीक्षा ऑनलाईन मोडनेच व्हायला हव्यात. हा विषय विद्यापीठांकडे सोपवून उदय सामंत यांनी या विषयातून काढता पाय घेतला आहे. सर्व विद्यापीठांसाठी समसमान निर्णय व्हायला हवा व खासकरुन पुणे आणि नागपूर विद्यापीठाने आपला निर्णय लवकरात लवकर जाहीर करावा.' 

याशिवाय इडके यांनी 'लोकमत'शी बोलताना हेही सांगितलं की, 'उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून सतत सांगण्यात येत होतं की परिक्षा या ऑनलाईनच घेण्यात येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तशाच पध्दतीच्या/पॅटर्न परीक्षेची तयारी केलीय. महाराष्ट्रातील बहुतांश विद्यापीठं ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेत आहेत. त्यांमुळे पुणे विद्यापीठाच्या परीक्षा जर ऑफलाईन पध्दतीनं झाल्यात तर भविष्यात विद्यार्थ्यांपुढे स्पर्धा निर्माण होऊ शकते. म्हणजे इतर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना जास्त टक्केवारी असेल आणि पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना कमी टक्केवारी असेल. विद्यार्थी अजूनही आपापल्या गावी आहेत. आणि महाविद्यालये सुरु होणार म्हणजे काही पूर्णतः सुरु होऊ शकत नाहीत. टप्प्याटप्प्यानंच सुरु होतील. म्हणून शंभर टक्के विद्यार्थी महाविद्यालयात येणार नाहीत. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा झाली तर ती सर्वांना सोयीस्कर ठरणार आहे.' 

या संदर्भात 'लोकमत'नं विद्यापीठ प्रशासनाशी संपर्क साधला. तेव्हा परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'परीक्षा मंडळाची बैठक येत्या आठवडाभरात विद्यापीठात होईल. संबंधित विषयासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार मंडळाचे आहेत. मी त्या मंडळाचा फक्त सदस्य सेक्रेटरी आहे. त्यामुळे तिथे जे कुलगुरु, प्र-कुलगुरु आणि इतर तज्ज्ञ मंडळी आलेला शासन निर्णय आणि एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतील. जिल्ह्यातील परिस्थिती काय आहे ते विचारात घेऊन परीक्षा मंडळाकडून परीक्षांबाबत ठरवलं जाईल. काही ठिकाणी ऑनलाईन, काही ठिकाणी सेंटर्सवर बोलवून ऑनलाईन तर काही ठिकाणी ऑफलाईन परीक्षा होऊ शकतात.' 

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षाonlineऑनलाइनMaharashtraमहाराष्ट्र