शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

प्रचंड ताकद उभारून देखील कांचन कुल यांना " बारामती " जिंकण्यात का आले अपयश..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 19:09 IST

'' ह्या '' गोष्टींनी कुल यांच्या पराभवाला आणि सुळे यांच्या विजयाला हातभार लावला..

बारामती  : बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात असला तरी हा गड आम्ही जिंकणारच असा विश्वास व्यक्त करीत भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. सुळे आणि कांचन यांच्यात ’कॉंटे की ट्क्कर’ पाहायला मिळाली. मात्र, भाजपला हा गड जिंकण्यात अपयश आले.  

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शेवटच्या काही टप्प्यात भाजपा प्रणित महायुती कुल यांच्या प्रचारात कमी पडल्याचे पाहायला मिळाले. हीच बाब सुळे यांच्या पथ्यावर पडली. तसेच सुळेंसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून दाखविलेली एकजूटही बारामतीतील विजयासाठी पूरक ठरली.त्यांनी सुरुवातीपासून जनसंपर्क; लोकांचे प्रश्न, समस्यांवर सोडविण्यावर भर देत दुष्काळी भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासही प्राधान्य दिले.त्यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत तरुणाईशी थेट संवाद ठेवला. गेली पाच वर्षे विविध कार्यक्रम व उपक्रमांनी मतदारसंघ पिंजून काढला होता.हि सगळी सुळे यांच्या विजयी हॅट्रिक मध्ये जमेच्या बाजू ठरल्या.  

गुरुवारी सकाळी आठ वाजता शासकीय गोदामात मतमोजणीस सुरूवात झाली. कांचन कुल यांनी आरंभापासून आघाडी घेतल्याने राष्ट्रवादीच्या कोटात अस्वस्थता पसरू लागली होती. दौंड हा कांचन कुल यांचा घरचा मतदारसंघ असल्याने त्यांना तिथे कुल यांना ६९५0 मते तर सुळे यांना २६५३ मते पडली. खडकवासल्यामध्येही त्या आघाडीवर होत्या. मात्र, बारामती, इंदापूर, भोर आणि पुरंदरमध्ये सुळे यांनी आघाडी घेतली.

पहिल्या आणि दुस-या फेरीमध्ये सुळे आणि कांचन कुल यांच्यात घासून लढत झाली. दुस-या फेरीत दौंड,खडकवासला आणि भोर, पुरंदरमध्ये कुल आघाडीवरच होत्या. दोन फेरींमध्ये सुळे यांना एकूण ५८ हजार ६२६ मते तर कुल यांना ५८ हजार ९१९ मते होती. दोघांच्या मतांमध्ये केवळ २९३ मतांचा फरक होता. कुल यांचे पारडे जड होते की काय असे वाटत असतानाच सुळे यांनी हळूहळू तिस-या फेरीनंतर मतांची आघाडी घेतली.सुळे यांनी पाचव्या फेरीनंतर आघाडी कायम राखली. दोघींच्या मतांमध्ये जवळपास १७00२ मतांचा फरक पडल्याचे दिसून आले. सातव्या फेरीमध्ये सुळे यांना एकूण २ लाख ११ हजार 0९१ तर कुल यांना १ लाख ८७ हजार ५६0 मते पडली. नवनाथ पडळकर यांना १३ हजार २00 मते पडल्याने आश्चर्य व्यक्त झाले. दहाव्या फेरीनंतर सुळे यांच्याच गळ्यात विजयाची माळ पडणार असे काहीसे चित्र निर्माण होऊ लागल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाचे वातावरण दिसू लागले. सुळे यांनी हळूहळू लीड घेण्यास सुरूवात केली. दहाव्या फेरीत एकूण २ लाख ९९ हजार ४0६ वरून पंधराव्या फेरीपर्यंत सुळे यांनी ४ लाख ५३ हजार ८0 पर्यंत मजल मारली. तर कांचन कुल यांना ३ लाख ५७ हजार ८४१ मते पडली. सुळे यांनी ९५ हजार २३९ मतांनी आघाडी घेतली. त्यानंतर सुळे यांचे मताधिक्य शेवटपर्यंत वाढतच गेले.. आणि बहुचर्चित तसेच भाजपाकडून प्रतिष्ठेची करण्यात आलेल्या बारामतीच्या लढतीत कुल यांना दीड लाखांहून अद्धिक मतांनी पराभव स्वीकारावा लागला.. .........कांचन कुल यांच्या पराभवाची ५ कारणेमहाविद्यालयीन विद्यार्थी संघटना, तरूणाईशी संपर्क. सोशल मीडियाचा प्रभावी वापर ठरला राष्ट्रवादीसाठी निर्णायक.बहुतांश सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांमुळे तुलनेने राष्ट्रवादीचा अधिक जनसंपर्क आहे.राष्ट्रीय समाज पक्षाच्या तुलनेने सहकारी संस्थांवर पवार कुटुंबाचे वर्चस्व आहे.गेल्या ५ वर्षांपासून खासदार सुप्रिया सुळे यांनी संपूर्ण मतदारसंघात प्रभावी जनसंपर्क ठेवला. नवख्या भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचा दौंड वगळता इतरत्र थेट जनसंपर्क कमी होता. ......................... 

टॅग्स :Baramatiबारामतीbaramati-pcबारामतीBJPभाजपाSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल