शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

प्रचंड ताकद उभारून देखील कांचन कुल यांना " बारामती " जिंकण्यात का आले अपयश..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 19:09 IST

'' ह्या '' गोष्टींनी कुल यांच्या पराभवाला आणि सुळे यांच्या विजयाला हातभार लावला..

बारामती  : बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात असला तरी हा गड आम्ही जिंकणारच असा विश्वास व्यक्त करीत भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. सुळे आणि कांचन यांच्यात ’कॉंटे की ट्क्कर’ पाहायला मिळाली. मात्र, भाजपला हा गड जिंकण्यात अपयश आले.  

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शेवटच्या काही टप्प्यात भाजपा प्रणित महायुती कुल यांच्या प्रचारात कमी पडल्याचे पाहायला मिळाले. हीच बाब सुळे यांच्या पथ्यावर पडली. तसेच सुळेंसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून दाखविलेली एकजूटही बारामतीतील विजयासाठी पूरक ठरली.त्यांनी सुरुवातीपासून जनसंपर्क; लोकांचे प्रश्न, समस्यांवर सोडविण्यावर भर देत दुष्काळी भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासही प्राधान्य दिले.त्यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत तरुणाईशी थेट संवाद ठेवला. गेली पाच वर्षे विविध कार्यक्रम व उपक्रमांनी मतदारसंघ पिंजून काढला होता.हि सगळी सुळे यांच्या विजयी हॅट्रिक मध्ये जमेच्या बाजू ठरल्या.  

गुरुवारी सकाळी आठ वाजता शासकीय गोदामात मतमोजणीस सुरूवात झाली. कांचन कुल यांनी आरंभापासून आघाडी घेतल्याने राष्ट्रवादीच्या कोटात अस्वस्थता पसरू लागली होती. दौंड हा कांचन कुल यांचा घरचा मतदारसंघ असल्याने त्यांना तिथे कुल यांना ६९५0 मते तर सुळे यांना २६५३ मते पडली. खडकवासल्यामध्येही त्या आघाडीवर होत्या. मात्र, बारामती, इंदापूर, भोर आणि पुरंदरमध्ये सुळे यांनी आघाडी घेतली.

पहिल्या आणि दुस-या फेरीमध्ये सुळे आणि कांचन कुल यांच्यात घासून लढत झाली. दुस-या फेरीत दौंड,खडकवासला आणि भोर, पुरंदरमध्ये कुल आघाडीवरच होत्या. दोन फेरींमध्ये सुळे यांना एकूण ५८ हजार ६२६ मते तर कुल यांना ५८ हजार ९१९ मते होती. दोघांच्या मतांमध्ये केवळ २९३ मतांचा फरक होता. कुल यांचे पारडे जड होते की काय असे वाटत असतानाच सुळे यांनी हळूहळू तिस-या फेरीनंतर मतांची आघाडी घेतली.सुळे यांनी पाचव्या फेरीनंतर आघाडी कायम राखली. दोघींच्या मतांमध्ये जवळपास १७00२ मतांचा फरक पडल्याचे दिसून आले. सातव्या फेरीमध्ये सुळे यांना एकूण २ लाख ११ हजार 0९१ तर कुल यांना १ लाख ८७ हजार ५६0 मते पडली. नवनाथ पडळकर यांना १३ हजार २00 मते पडल्याने आश्चर्य व्यक्त झाले. दहाव्या फेरीनंतर सुळे यांच्याच गळ्यात विजयाची माळ पडणार असे काहीसे चित्र निर्माण होऊ लागल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाचे वातावरण दिसू लागले. सुळे यांनी हळूहळू लीड घेण्यास सुरूवात केली. दहाव्या फेरीत एकूण २ लाख ९९ हजार ४0६ वरून पंधराव्या फेरीपर्यंत सुळे यांनी ४ लाख ५३ हजार ८0 पर्यंत मजल मारली. तर कांचन कुल यांना ३ लाख ५७ हजार ८४१ मते पडली. सुळे यांनी ९५ हजार २३९ मतांनी आघाडी घेतली. त्यानंतर सुळे यांचे मताधिक्य शेवटपर्यंत वाढतच गेले.. आणि बहुचर्चित तसेच भाजपाकडून प्रतिष्ठेची करण्यात आलेल्या बारामतीच्या लढतीत कुल यांना दीड लाखांहून अद्धिक मतांनी पराभव स्वीकारावा लागला.. .........कांचन कुल यांच्या पराभवाची ५ कारणेमहाविद्यालयीन विद्यार्थी संघटना, तरूणाईशी संपर्क. सोशल मीडियाचा प्रभावी वापर ठरला राष्ट्रवादीसाठी निर्णायक.बहुतांश सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांमुळे तुलनेने राष्ट्रवादीचा अधिक जनसंपर्क आहे.राष्ट्रीय समाज पक्षाच्या तुलनेने सहकारी संस्थांवर पवार कुटुंबाचे वर्चस्व आहे.गेल्या ५ वर्षांपासून खासदार सुप्रिया सुळे यांनी संपूर्ण मतदारसंघात प्रभावी जनसंपर्क ठेवला. नवख्या भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचा दौंड वगळता इतरत्र थेट जनसंपर्क कमी होता. ......................... 

टॅग्स :Baramatiबारामतीbaramati-pcबारामतीBJPभाजपाSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल