शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

प्रचंड ताकद उभारून देखील कांचन कुल यांना " बारामती " जिंकण्यात का आले अपयश..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 19:09 IST

'' ह्या '' गोष्टींनी कुल यांच्या पराभवाला आणि सुळे यांच्या विजयाला हातभार लावला..

बारामती  : बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात असला तरी हा गड आम्ही जिंकणारच असा विश्वास व्यक्त करीत भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. सुळे आणि कांचन यांच्यात ’कॉंटे की ट्क्कर’ पाहायला मिळाली. मात्र, भाजपला हा गड जिंकण्यात अपयश आले.  

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शेवटच्या काही टप्प्यात भाजपा प्रणित महायुती कुल यांच्या प्रचारात कमी पडल्याचे पाहायला मिळाले. हीच बाब सुळे यांच्या पथ्यावर पडली. तसेच सुळेंसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून दाखविलेली एकजूटही बारामतीतील विजयासाठी पूरक ठरली.त्यांनी सुरुवातीपासून जनसंपर्क; लोकांचे प्रश्न, समस्यांवर सोडविण्यावर भर देत दुष्काळी भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासही प्राधान्य दिले.त्यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत तरुणाईशी थेट संवाद ठेवला. गेली पाच वर्षे विविध कार्यक्रम व उपक्रमांनी मतदारसंघ पिंजून काढला होता.हि सगळी सुळे यांच्या विजयी हॅट्रिक मध्ये जमेच्या बाजू ठरल्या.  

गुरुवारी सकाळी आठ वाजता शासकीय गोदामात मतमोजणीस सुरूवात झाली. कांचन कुल यांनी आरंभापासून आघाडी घेतल्याने राष्ट्रवादीच्या कोटात अस्वस्थता पसरू लागली होती. दौंड हा कांचन कुल यांचा घरचा मतदारसंघ असल्याने त्यांना तिथे कुल यांना ६९५0 मते तर सुळे यांना २६५३ मते पडली. खडकवासल्यामध्येही त्या आघाडीवर होत्या. मात्र, बारामती, इंदापूर, भोर आणि पुरंदरमध्ये सुळे यांनी आघाडी घेतली.

पहिल्या आणि दुस-या फेरीमध्ये सुळे आणि कांचन कुल यांच्यात घासून लढत झाली. दुस-या फेरीत दौंड,खडकवासला आणि भोर, पुरंदरमध्ये कुल आघाडीवरच होत्या. दोन फेरींमध्ये सुळे यांना एकूण ५८ हजार ६२६ मते तर कुल यांना ५८ हजार ९१९ मते होती. दोघांच्या मतांमध्ये केवळ २९३ मतांचा फरक होता. कुल यांचे पारडे जड होते की काय असे वाटत असतानाच सुळे यांनी हळूहळू तिस-या फेरीनंतर मतांची आघाडी घेतली.सुळे यांनी पाचव्या फेरीनंतर आघाडी कायम राखली. दोघींच्या मतांमध्ये जवळपास १७00२ मतांचा फरक पडल्याचे दिसून आले. सातव्या फेरीमध्ये सुळे यांना एकूण २ लाख ११ हजार 0९१ तर कुल यांना १ लाख ८७ हजार ५६0 मते पडली. नवनाथ पडळकर यांना १३ हजार २00 मते पडल्याने आश्चर्य व्यक्त झाले. दहाव्या फेरीनंतर सुळे यांच्याच गळ्यात विजयाची माळ पडणार असे काहीसे चित्र निर्माण होऊ लागल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाचे वातावरण दिसू लागले. सुळे यांनी हळूहळू लीड घेण्यास सुरूवात केली. दहाव्या फेरीत एकूण २ लाख ९९ हजार ४0६ वरून पंधराव्या फेरीपर्यंत सुळे यांनी ४ लाख ५३ हजार ८0 पर्यंत मजल मारली. तर कांचन कुल यांना ३ लाख ५७ हजार ८४१ मते पडली. सुळे यांनी ९५ हजार २३९ मतांनी आघाडी घेतली. त्यानंतर सुळे यांचे मताधिक्य शेवटपर्यंत वाढतच गेले.. आणि बहुचर्चित तसेच भाजपाकडून प्रतिष्ठेची करण्यात आलेल्या बारामतीच्या लढतीत कुल यांना दीड लाखांहून अद्धिक मतांनी पराभव स्वीकारावा लागला.. .........कांचन कुल यांच्या पराभवाची ५ कारणेमहाविद्यालयीन विद्यार्थी संघटना, तरूणाईशी संपर्क. सोशल मीडियाचा प्रभावी वापर ठरला राष्ट्रवादीसाठी निर्णायक.बहुतांश सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांमुळे तुलनेने राष्ट्रवादीचा अधिक जनसंपर्क आहे.राष्ट्रीय समाज पक्षाच्या तुलनेने सहकारी संस्थांवर पवार कुटुंबाचे वर्चस्व आहे.गेल्या ५ वर्षांपासून खासदार सुप्रिया सुळे यांनी संपूर्ण मतदारसंघात प्रभावी जनसंपर्क ठेवला. नवख्या भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचा दौंड वगळता इतरत्र थेट जनसंपर्क कमी होता. ......................... 

टॅग्स :Baramatiबारामतीbaramati-pcबारामतीBJPभाजपाSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल