शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

धनंजय मुंडेंनी डीबीटी धोरणाला बगल का दिली? सदाभाऊ खोत यांचा सवाल

By नितीन चौधरी | Updated: February 7, 2025 19:53 IST

हात मारता येत नसल्याने थेट खरेदी करण्यात आली का, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे?

पुणे : राजकीयदृष्ट्या अडचणीत आलेले अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आता भाजपच्या मित्रपक्षांनी आरोप करण्यास सुरुवात केली आहे. कृषी विभागात थेट हस्तांतरण लाभ (डीबीटी) धोरण लागू असताना तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या योजनेला का बगल दिली? असा प्रश्न उपस्थित करून यात हात मारता येत नसल्याने थेट खरेदी करण्यात आली का, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे? असा सवाल रयत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली. याबाबत विधानसभेत आवाज उठवू, असेही ते म्हणाले.

विभागीय आयुक्त कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. खोत म्हणाले, देशात तसेच राज्यातही २०१५ नंतर शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे अनुदान वाटप करण्याचे धोरण अवलंबलेले आहे. असे असताना सरकारने ही उठाठेव का केली. कुठल्या तरी एकाच कंपनीमार्फत खत खरेदी करावे, खरेदी करण्यासाठी दलाल नेमावे आणि या दलालांना शेतकऱ्यांना पैसे वाटावे. हे कशासाठी करण्यात आले. डीबीटीचे धोरण बाजूला ठेवून थेट खरेदीचा घाट का घालण्यात आला. हे चुकीचे आहे. तंत्रज्ञानावर तुमचा विश्वास नाही का?

आता सगळ्यांच्या हातात मोबाइल आले आहेत. पानटपरीवाले सुद्धा पैसे गुगल पेच्या माध्यमातून घेत आहेत. एवढ्या सुविधा मिळत आहे. तंत्रज्ञान पुढे गेले आहे असताना डीबीटीचे धोरण बाजूला ठेवून थेट खरेदीचा घाट का घालण्यात आला. हे चुकीचे आहे. तंत्रज्ञानावर तुमचा विश्वास नाही का, तुम्हाला हात मारता येत नव्हता का म्हणून थेट खरेदी राबविली का? असा आरोप करत हे सगळं स्पष्ट होणे गरजेचे आहे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

या प्रकरणाने राज्याची मान खाली गेली आहे. शेतकऱ्याबद्दल संवेदना कधी दाखवणार की नाही? असा सवाल उपस्थित करत मातीशी इमान राखून काम केले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. काही लोक हे करत नाहीत. मुंडे यांचा राजीनामा देणे घेण हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, जो कोणी शेतकऱ्यांच्या अन्नात विष घालत असेल तर त्याच्या विरोधात आम्ही आहे. या विरोधात विधानसभेत आवाज उठवणार असल्याचा इशारा, खोत यांनी दिला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSadabhau Khotसदाभाउ खोत Dhananjay Mundeधनंजय मुंडे