शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
2
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
3
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
4
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
5
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
6
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
7
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
8
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
9
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
10
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
11
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
12
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
13
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
14
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
15
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
16
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
17
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
18
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

धनंजय मुंडेंनी डीबीटी धोरणाला बगल का दिली? सदाभाऊ खोत यांचा सवाल

By नितीन चौधरी | Updated: February 7, 2025 19:53 IST

हात मारता येत नसल्याने थेट खरेदी करण्यात आली का, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे?

पुणे : राजकीयदृष्ट्या अडचणीत आलेले अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आता भाजपच्या मित्रपक्षांनी आरोप करण्यास सुरुवात केली आहे. कृषी विभागात थेट हस्तांतरण लाभ (डीबीटी) धोरण लागू असताना तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या योजनेला का बगल दिली? असा प्रश्न उपस्थित करून यात हात मारता येत नसल्याने थेट खरेदी करण्यात आली का, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे? असा सवाल रयत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली. याबाबत विधानसभेत आवाज उठवू, असेही ते म्हणाले.

विभागीय आयुक्त कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. खोत म्हणाले, देशात तसेच राज्यातही २०१५ नंतर शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे अनुदान वाटप करण्याचे धोरण अवलंबलेले आहे. असे असताना सरकारने ही उठाठेव का केली. कुठल्या तरी एकाच कंपनीमार्फत खत खरेदी करावे, खरेदी करण्यासाठी दलाल नेमावे आणि या दलालांना शेतकऱ्यांना पैसे वाटावे. हे कशासाठी करण्यात आले. डीबीटीचे धोरण बाजूला ठेवून थेट खरेदीचा घाट का घालण्यात आला. हे चुकीचे आहे. तंत्रज्ञानावर तुमचा विश्वास नाही का?

आता सगळ्यांच्या हातात मोबाइल आले आहेत. पानटपरीवाले सुद्धा पैसे गुगल पेच्या माध्यमातून घेत आहेत. एवढ्या सुविधा मिळत आहे. तंत्रज्ञान पुढे गेले आहे असताना डीबीटीचे धोरण बाजूला ठेवून थेट खरेदीचा घाट का घालण्यात आला. हे चुकीचे आहे. तंत्रज्ञानावर तुमचा विश्वास नाही का, तुम्हाला हात मारता येत नव्हता का म्हणून थेट खरेदी राबविली का? असा आरोप करत हे सगळं स्पष्ट होणे गरजेचे आहे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

या प्रकरणाने राज्याची मान खाली गेली आहे. शेतकऱ्याबद्दल संवेदना कधी दाखवणार की नाही? असा सवाल उपस्थित करत मातीशी इमान राखून काम केले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. काही लोक हे करत नाहीत. मुंडे यांचा राजीनामा देणे घेण हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, जो कोणी शेतकऱ्यांच्या अन्नात विष घालत असेल तर त्याच्या विरोधात आम्ही आहे. या विरोधात विधानसभेत आवाज उठवणार असल्याचा इशारा, खोत यांनी दिला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSadabhau Khotसदाभाउ खोत Dhananjay Mundeधनंजय मुंडे