शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

काेराेना विषाणूची तपासणी केवळ NIV संस्थेतच का हाेते ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 21:00 IST

कुठलाही साथीचा राेग उद्भवल्यास पुण्यातील एनआयव्ही या संस्थेचे महत्त्व वाढते.

पुणे : कुठलाही साथीचा राेग झाल्यानंतर एनआयव्ही अर्थात राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचा उल्लेख हाेत असताे. स्वाईन फ्लूपासून या संस्थेचे महत्त्व अधिक अधाेरेखित झाले. प्राण्यांमार्फत हाेणाऱ्या साथिच्या राेगांवार संशाेधन करणारी एनआयव्ही ही भारतातील एकमेव संस्था आहे. 1952 साली पुण्यात या संस्थेची स्थापना करण्यात आली. 

काेराेना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला आहे. जगभरातील अनेक नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे. भारतात 29 जणांना या विषाणूची लागण झाल्याचे समाेर आले आहे. त्यामुळे सर्वत्र खबरदारी घेण्यात येत आहे. एखाद्या व्यक्तीला काेराेनाची लागण झाली आहे की नाही याची तपासणी एनआयव्ही संस्थेकडून करण्यात येते. देशभरातील संशयित रुग्णांच्या घशातील द्रवाचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले जातात. या आधी स्वाईन फ्लू तसेच निपाह विषाणूची लागण झाली आहे की नाही याची तपासणी सुद्धा एनआयव्हीकडूनच केली जात हाेती.  

एनआयव्ही संस्था काय करते एनआयव्ही ही विषाणूजन्य राेगांवर संशाेधन करणारी भारतातील एकमेव संस्था आहे. विषाणूजन्य राेगांवर लस शाेधून काढण्याचे काम या संस्थेद्वारे केले जाते. देशभरातील तज्ञ संशाेधक या संस्थेमध्ये संशाेधन करतात. एचआयव्ही एड्स या आजारावर देखील या संस्थेद्वारे माेठ्याप्रमाणावर संशाेधन करण्यात येत आहे. जागतिक आराेग्य संघटनेसाेबत देखील ही संस्था काम करते. या संस्थेकडून प्राण्यांमार्फत संसर्गजन्य राेग कसा हाेताे, त्याची कुठली लक्षणे शरिरावर दिसतात, त्यावर काय उपाय केले जाऊ शकतात यावर संशाेधन करण्यात येते. या संस्थेची माेठी प्रयाेगशाळा असून तेथे विविध प्रयाेग केले जातात. 

टॅग्स :corona virusकोरोनाPuneपुणेHealthआरोग्य