शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
3
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
4
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
6
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
7
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
8
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
9
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
10
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
11
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
12
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
13
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
14
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
15
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
16
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
17
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
18
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
19
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
20
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या यशाचे ओझे पेलणार कोण; काँग्रेस कशी मारेल मुसंडी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 00:58 IST

सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतल्या मतदानावर मोदी लाटेचा प्रचंड प्रभाव असल्याचे निकालानंतरच स्पष्ट झाले होते. त्यामुळेच पुण्याच्या इतिहासात यापूर्वी कधी नव्हे इतक्या मताधिक्याने भाजपाचा विजय झाला.

- सुकृत करंदीकरपुणे - सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतल्या मतदानावर मोदी लाटेचा प्रचंड प्रभाव असल्याचे निकालानंतरच स्पष्ट झाले होते. त्यामुळेच पुण्याच्या इतिहासात यापूर्वी कधी नव्हे इतक्या मताधिक्याने भाजपाचा विजय झाला. शहरातल्या सहाही विधानसभा मतदारसंघात भाजपाने निर्णायक मतदान मिळवले होते. मात्र, गेल्या पाच वर्षांत मुठेवरल्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. गेल्या पाच वर्षांत पुण्यात मिळवलेल्या दैदीप्यमान यशाची पुनरावृत्ती करण्याचे ओझे भाजपापुढे असणार आहे. काँग्रेस आघाडीला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.युती आणि आघाडीने इतर मतदारसंघांमधल्या उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात केली असली तरी या दोन्ही बाजुंना पुण्यातला उमेदवार अद्याप ठरवता आलेला नाही. ‘समोरून कोण येणार,’ याचाच अंदाज दोन्ही बाजूंनी घेतला जात असल्याचे सांगितले जात आहे. उमेदवारी शहराच्या कोणत्या भागाला द्यायची, कोणत्या समाजाला उमेदवारी द्यायचे याचाही विचार उमेदवार निश्चित करताना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश पुणे लोकसभा मतदारसंघात होतो. यातल्या सहाही मतदारसंघांमध्ये २०१४ मध्ये भाजपाने आघाडी घेतली होती. विशेष म्हणजे त्यावेळी वडगावशेरी (बापू पठारे), कॅन्टोन्मेंट (रमेश बागवे) आणि शिवाजीनगर (विनायक निम्हण) या सहापैकी तीन मतदारसंघांमध्ये काँग्रेस आघाडीचे आमदार होते. कसबा (गिरीश बापट), कोथरूड (चंद्रकांत मोकाटे) आणि पर्वती (माधुरी मिसाळ) या तीन विधानसभा मतदारसंघ भाजपा-शिवसेना युतीकडे होते. लोकसभा निवडणुकीत मात्र या सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस आघाडीची प्रचंड पिछेहाट झाली. त्यामुळेच भाजपाला पुण्यात ‘न भुतो’ असे ३ लाख १५ हजारांचे मताधिक्य मिळवता आले. गमतीचा भाग असा, की २०१४ पूर्वीच्या निवडणुकांमध्ये भाजपाच्या उमेदवाराला मिळालेली एकूण मतेदेखील एवढी नव्हती.कोथरूड, कसबा आणि शिवाजीनगर हे पुण्यातले युतीचे पारंपरिक मतदारसंघ मानले जातात. त्यातही कोथरूडने भाजपाला सर्वाधिक म्हणजे थेट ९१ हजार ८९८ इतक्या विक्रमी मतांची आघाडी मिळवून दिली होती. कोथरूडमध्ये भाजपाला मिळालेली एकूण मते १ लाख २२ हजार ७२१ होती. काँग्रेसला ३० हजार ८२३ तर तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या मनसेला १६ हजार ३५३ मतांवर समाधान मानावे लागले होते. शिवाजीनगरमध्ये भाजपाने काँग्रेसपेक्षा ३९ हजार १३१ जास्त मते मिळवली. पर्वतीमध्येही ६९ हजार ६७८ मतांनी काँग्रेसला मागे टाकले होते. कसबा या कमी मतदारसंख्येच्या मतदारसंघातही भाजपाने काँग्रेसपेक्षा ५८ हजार ५३० मते जास्तीची मिळवली. काँग्रेस आघाडीला खरा धक्का बसला होता तो त्यांच्या दृष्टीने पारंपरिक मतदार असलेल्या वडगाव शेरी आणि पुणे कॅन्टोन्मेंट या दोन मतदारसंघांमध्ये. या दोन्ही ठिकाणी भाजपाने अनुक्रमे ४२ हजार ४०८ आणि ३ हजार ९३१ मतांनी काँग्रेसला मागे टाकले. पुण्यातल्या सहाही मतदारसंघांमधली लोकसभा निवडणुकीतली भाजपाची यशाची कमान त्या नंतरच्या विधानसभा आणि महापालिका निवडणुकीतही चढती राहिली. लोकसभेनंतर अवघ्या काही महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढली. काँग्रेस आघाडीनेही ती निवडणूक स्वतंत्रपणे लढवली. या चौरंगी लढतींमध्ये पुण्यातल्या सहाही जागा भाजपाने काबीज केल्या. दोन वर्षांपूर्वीच्या महापालिका निवडणुकीत भाजपाच्या नगरसेवकांची संख्या नव्वदच्या पुढे गेली. या यशाने पुणे लोकसभा मतदारसंघापुरती भाजपाची स्थिती ‘गल्ली ते दिल्ली फक्त भाजपा’ अशी झाली आहे. सन २०१४ पासून एका पाठोपाठ मिळवलेल्या तिहेरी यशामुळे पुण्यात भाजपाची संघटनात्मक ताकद कधी नव्हे इतकी मजबूत दिसते आहे. दुसरीकडे पुणे लोकसभा मतदारसंघातली काँग्रेस आघाडी यापूर्वी कधी नव्हे इतकी कमकुवत आहे. अर्थात हे चित्र कागदावरचे आहे. कारण, निकाल शेवटी पुणेकर घेणार आहेत; आणि क्रिकेटच्या मैदानात किंवा निवडणुकीच्या रिंगणात इतिहासाला फारशी किंमत नसते. 

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक