शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

सामान्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कोंडीतून बाहेर काढणारा नवा जयप्रकाश कोण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 14:21 IST

- डॉ. बाबा आढाव : देशाला आणीबाणीच्या खाईत ढकलणाऱ्या घटनेला आज (बुधवारी) पन्नास वर्षे पूर्ण

पुणे : आणीबाणीच्या काळात जयप्रकाश नारायण यांचा आधार होता. मात्र, आज सर्वसामान्यांची, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कोंडी होत आहे. देशाला या कोंडीतून बाहेर काढण्यासाठी नवा जयप्रकाश कोण होतोय? याची वाट पाहतोय. युद्धखोरीच्या वल्गनांमुळे देश नव्हे, तर संपूर्ण जगच युद्धाच्या छायेखाली आहे.अभिव्यक्तीसह सर्वच बाजूंनी होणाऱ्या कोंडीमुळे श्वास गुदमरतोय. सामान्यांचे केवळ मानसिकच नव्हे, तर सामाजिक जीवनमान घसरत चालले आहे. याकडे पाहण्यासाठी कोणी तयार नाही. देश एकीकडे विज्ञानाच्या वाटेवर असल्याचे सांगताना इतिहासातील कथा घेऊन दिशाभूल करणाऱ्या वल्गना गंभीर आहेत, अशी खंत ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ मध्ये देशावर आणीबाणी लादली. या घटनेला आज बुधवारी (दि २५) पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त आणीबाणीचे साक्षीदार ठरलेले डॉ. आढाव यांनी आणीबाणीच्या आठवणी ‘लोकमत’शी बोलताना उलगडल्या.

ते म्हणाले, आणीबाणीच्या काळात आम्ही आंदोलन करीत होतो. या आंदोलनाच्या निमित्ताने माझाही दोन महिन्यांनी तुरुंगात प्रवेश झाला. येरवड्यातील आतल्या बराकीत आम्हाला बंदिस्त करण्यात आले. इंदिरा गांधींनी आणीबाणी लादल्यानंतर देशभर मुस्कटदाबी सुरू होती.लोक त्याविरोधात उभे राहत होते, बोलत होते, निषेध करीत होते. सर्वांना जयप्रकाश नारायण यांचा आधार होता. आणीबाणीची आठवण करावी लागावी तीही प्रकर्षाने, हे खटकत आहे. पन्नास वर्षांपूर्वी देशाने जो अनुभव घेतला त्यापेक्षा अत्यंत वाईट अनुभव आज येत आहे. राज्यकर्त्यांची ही चाल असून मूलभूत प्रश्न डावलले जात आहेत. पुस्तकातील धडे बदलणे, भाषा वाद, शालेय अभ्यासक्रमात तीन भाषांचा समावेश यांसारख्या अनेक मुद्द्यांना महत्त्व दिले जात आहे. एकंदरीतच देशातील जीवनमान ढासळत चालले आहे.

 अलाहाबाद उच्च न्यायालयाने १२ जून १९७५ रोजी इंदिरा गांधी यांना निवडणुकीत सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याप्रकरणी पुढील सहा वर्षांसाठी निवडणूक लढण्यास बंदी घातली. आत्ता नाही तर पुढे कधीच परत येता येणार नाही, अशी भीती त्यांना वाटत होती. दिल्लीत २५ जून १९७५ रोजी ‘सिंहासन छोडो’ अशी घोषणा देणारा मोर्चा काढण्यात आला होता. त्याच रात्री देशात इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली. त्यासाठी त्यांनी तत्काळ मध्यरात्री तत्कालीन राष्ट्रपती यांची स्वाक्षरी घेतली. त्यांनी सकाळी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. जयप्रकाश नारायण कुठे आहेत? हे विचारल्यानंतर त्यांनी कारागृहात आहेत आणि सुरक्षित आहेत, इतकाच संदेश दिला. आणीबाणी लागू झाल्यावर नागरिकांचे घटनात्मक मूलभूत अधिकार रद्द झाले. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातल्याने वृत्तपत्रे व प्रसारमाध्यमांवर सेन्सॉरशिप लागू झाली. भूमिगत असतानाच मला २ ऑक्टोबर १९७५ रोजी अटक झाली. येरवडा कारागृहात आम्ही चारशे राजबंदी अटकेत होतो. अखेर १९७७ मध्ये अचानक लोकसभेच्या निवडणुका घोषित झाल्या अन् आम्ही तुरुंगातून सुटलो. कालांतराने इंदिरा गांधी यांना त्यांची चूक लक्षात आली. त्यांनी विदेशातील वृत्तपत्रांना मुलाखत देताना ही चूक मान्य केली होती.- कुमार सप्तर्षी, युकांद्रचे संस्थापक 

१९७५ मध्ये आणीबाणी जाहीर झाली. त्याचवर्षी स्त्री मुक्ती वर्ष जाहीर झाले. मी तेव्हा महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून शिकवत होते. आम्ही बरेच जाहीर कार्यक्रम घेत होते. पण, आम्हाला अधिकृत जाहीरपणे कुणी सांगितले नव्हते की कार्यक्रम घेऊ नका. आम्ही कार्यक्रम करू शकत होतो. त्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये एक शिथिलता आली होती. त्यांना शिस्त लागावी असे आदेश होते, तेव्हा विनोबा भावे यांनी अनुशासन पर्व असे म्हटले. त्यावेळी आमच्या प्राध्यापकांच्या मागण्या होत्या. त्यासाठी प्राध्यापकांनी अर्ज केले होते. पण, आमच्या अर्जाला सहा महिने शिक्षण खात्याने कोणतीही दाद दिली नाही. पण, आणीबाणीनंतर साचून राहिलेल्या कामांना गती दिली. शिथिल यंत्रणेला एक शिस्त आली. सरकारच्या विरोधात बोलण्याचे विषय नसतील, तर आडकाठी केली जात नसे.  -  डाॅ. तारा भवाळकर, साहित्य संमेलनाध्यक्ष 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रElectionनिवडणूक 2024Muncipal Corporationनगर पालिकाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड