शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

'मी कोण, तुम्ही कोण, तुमची जात कोणती' ही दरी समाजात आजही कायम: नंदेश उमप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 08:20 IST

अण्णा भाऊ वाचायला सोपा आहे पण झिरपायला अवघड आहे .

ठळक मुद्देनंदेश उमप यांना अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्रदान

पुणे: तुम्ही कोण, मी कोण, तुमची जात कोणती ही दरी समाजात आजही आहे. तुम्ही भावगीत गाता‌, लोकसंगीत गाता की शास्त्रीय संगीत गाता यावरून विशिष्ट दृष्टीने तुमच्याकडे पाहिले जाते. हे प्रकार मी भोगले आहेत. अण्णा भाऊ साठे यांना मानणारे लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानत नाहीत आणि  बाबासाहेबांना मानणारे अण्णांना मानत नाहीत. हा काय प्रकार आहे ? असा सवाल प्रसिद्ध शाहीर नंदेश उमप यांनी उपस्थित केला.

या महान व्यक्तिमत्त्वांना आपण बंदिस्त केले आहे. ज्यांनी महाराष्ट्र घडवला अशा शाहिरांना, साहित्यिकांना आणि १०५ हुतात्म्यांना आपण विसरलो आहोत. लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंना विसरलो आहोत. अशाने महाराष्ट्र 'महाराष्ट्र' राहणार नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.   

    संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत डफलीवर थाप मारून समस्त मराठी बांधवांना बुलंद आवाजात ललकारी देणारी ' माझी मैना गावाकडं राहिली' ही छक्कड सादर करून नंदेश उमप यांनी अण्णाभाऊ साठे यांना मानवंदना दिली. उद्या ( 1 ऑगस्ट) अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षांची सांगता होत आहे. त्यानिमित्त संवाद पुणे आणि समर्थ युवा फाैऊडेशन यांच्या वतीने नंदेश उमप यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांच्या हस्ते ' अण्णाभाऊ साठे  पुरस्कार' देऊन सन्मनित करण्यात आले.त्यानंतर प्रसिद्ध निवेदक मिलिंद कुलकर्णी यांनी नंदेश उमप यांचा लोककलेतील प्रवास गप्पांमधून उलगडला.    पुरस्कार प्रदान समारंभाप्रसंगी अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुनील कांबळे, उपमहापाैर सरस्वती शेडगे, सचिन ईटकर, तसेच राजेश पांडे , सुनील महाजन आणि निकिता मोघे उपस्थित होते.    पुण्यगरीत अण्णांच्या नावाने पुरस्कार मिळाला याचा आनंद आहे.पुणेरी पगडीचा मोठा मान आणि आशीर्वाद मिळाला आहे.  या पुरस्काराने जबाबदारी अधिक वाढली आहे. महामानव आणि शाहिरांनी चळवळीची दोरी हातात दिली आहे ती पुढे घेऊन जाण्याचा नक्की प्रयत्न करेन अशी भावना नंदेश उमप यांनी व्यक्त केली.    अण्णाभाऊ साठे यांचे अजरामर 'महाराष्ट्र गीत' सादर करून उमप यांनी अण्णाभाऊंना मानवंदना दिली. खरंतर अण्णाभाऊ समाजायला वेळ लागणार आहे.  मी त्यांना साहित्यरत्न म्हणणण्यापूर्वी स्वातंत्रसैनिक मानतो ' ये आझादी झुठी है देश की जनता भूखी' है असे ते सडेतोडपणे म्हणायचे.  'माझी मैना'  किंवा बंगाली पोवाडा मध्ये अण्णांचे वेगळे दर्शन घडते. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंचा अभ्यास करायला हवा. अण्णा वाचायला सोपा आहे पण झिरपायला अवघड आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. अण्णाभाऊ साठे आणि शाहीर विठ्ठल उमप यांच्यातील ऋणानुबंध देखील त्यांनी आठवणींमधून उलगडले.    नितीन करमळकर म्हणाले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी अडीअडचणींचा सामना करीत आयुष्याला दिशा दिली. ते फारशे शिकलेले नसूनही, त्यांनी  विपुल ग्रंथसंपदा निर्माण केली. सामान्यांचं जगणं लेखनातून मांडले. त्यामुळे केवळ त्यांच्या साहित्याचे वाचन न होता ते लेखन जगता आलं पाहिजे. ......चौकटचार महिन्यांनी सभागृहात रसिकांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद लुटला      कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या चार महिन्यांपासून सांस्कृतिक विश्व ठप्प झाले होते..मैफिली सुन्या सुन्या झाल्या होत्या. शहराच्या दैनंदिन जगण्यातील ताजेपणा हरवला होता. मात्र शुक्रवारी पहिल्यांदाच रसिकांनी सभागृहात जाऊन लाईव्ह कार्यक्रमाची अनुभूती घेतली. सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत, सभागृहात प्रवेश करणाऱ्या लोकांच्या शरीराचे तापमान चेक करीत  संयोजकांनी कार्यक्रमाचे शिवधनुष्य यशस्वीरीत्या पेलले.  इतर रसिकांसाठी हा कार्यक्रम फेसबुक पेजवर लाईव्ह सादर झाला...... 

टॅग्स :Puneपुणेnitin karmalkarनितीन करमळकरPune universityपुणे विद्यापीठ