शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

धर्मनिरपेक्ष आहात का, विचारणे गंभीर

By admin | Updated: April 25, 2017 04:16 IST

राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ लष्कराशी संबंधित गोष्ट नाही. ती प्रत्येक नागरिकांशी निगडित गोष्ट आहे. भारत हा लोकशाही मानणारा देश आहे.

पुणे : राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ लष्कराशी संबंधित गोष्ट नाही. ती प्रत्येक नागरिकांशी निगडित गोष्ट आहे. भारत हा लोकशाही मानणारा देश आहे. धर्मनिरपेक्ष देश आहे. या देशात तुम्ही धर्मनिरपेक्ष आहात का? तुम्ही राष्ट्रवादी आहात का? असे प्रश्न विचारले जाणे हे गंभीर आहे. राष्ट्रीय प्रश्नांची हाताळणी करण्याची पद्धत चुकते आहे का? असा सवाल माजी गृहसचिव माधव गोडबोले यांनी उपस्थित केला.चिनार पब्लिशर्स तसेच सरहदच्या वतीने ‘कारगिल : अनपेक्षित धक्का ते विजय’ या माजी लष्करप्रमुख जनरल वेद प्रकाश मलिक यांच्या प्रशांत तळणीकर यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून वेद प्रकाश मलिक, सरहदचे संस्थापक-अध्यक्ष संजय नहार उपस्थित होते. उद्योजक अभय फिरोदिया अध्यक्षस्थानी होते. गोडबोले म्हणाले, ‘‘भारत ज्या प्रकारे काश्मीरप्रश्न हाताळत आहे, ते पाहून काळजी वाटते. काश्मीरमधील जनता आणि सरकारमध्ये थेट संवादाची गरज आहे. संसदेत काश्मीरमधील जनतेच्या म्हणण्यावर चर्चा होत नाही. इंटरलोक्युटर्सना मंत्र्यांना भेटण्यातही अडचणी येतात. लोकशाही देशात त्यांना म्हणणे मांडण्याची संधी मिळत नाही. तेथील सामान्यांचे म्हणणे सरकारलाच ऐकून घ्यावे लागेल.’’मलिक म्हणाले, ‘‘राष्ट्रीय सुरक्षेला गृहीत धरले जाता कामा नये. आजूबाजूला खूप गोष्टी घडत आहेत. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने तयार असले पाहिजे. संरक्षणक्षेत्राचे बजेट दिवसेंदिवस वाढत आहे. या बजेटची तपासणी कॅग कडून केली जाते. ही तपासणी होण्याबरोबर संरक्षणक्षेत्रातील आपल्या क्षमतेचेही ‘आॅडिट’ झाले पाहिजे. कारगिल युद्धाने देशाला चांगले आणि वाईट धडे दिले. मात्र, त्यानंतरही लष्कर तितकेसे सुसज्ज झालेले नाही. आजकाल ‘हायब्रिड वॉर’ची भीती वाढली आहे. वेगळया प्रकारची युद्धजन्य परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेबाबत लष्कराप्रमाणेच सामान्यांनीही सतर्क राहण्याची गरज आहे. दोन देशांमध्ये सामंजस्य करार होतात; मात्र त्यांची अंमलबजावणी करण्यास अनेक वर्षे लागतात. त्यामुळे लष्करातील त्रुटी दूर होण्यासाठी ठोस पावले उचलली जावीत.’’फिरोदिया म्हणाले, ‘‘पाकिस्तानची लोकशाही फसवी आहे. तो दहशतवादाला प्रोत्साहन देणारा, लष्करातर्फे चालवला जाणारा देश आहे. पाकिस्तान भारतात कधीच शांतता नांदू देणार नाही. त्यामुळे पाकिस्तानला भारताची भीती नव्हे, तर धाक वाटला पाहिजे. त्यासाठी भारताची आर्थिक, सामाजिक आणि सैैन्यसामर्थ्य वाढले पाहिजे.’’जाहिद भट यांनी सूत्रसंचालन केले. शैलेश वाडेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)