शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
2
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
3
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
4
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
5
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
6
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
7
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
8
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
9
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
10
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
11
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
12
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
13
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
14
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
15
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
16
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
17
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
18
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
19
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
20
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज

धर्मनिरपेक्ष आहात का, विचारणे गंभीर

By admin | Updated: April 25, 2017 04:16 IST

राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ लष्कराशी संबंधित गोष्ट नाही. ती प्रत्येक नागरिकांशी निगडित गोष्ट आहे. भारत हा लोकशाही मानणारा देश आहे.

पुणे : राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ लष्कराशी संबंधित गोष्ट नाही. ती प्रत्येक नागरिकांशी निगडित गोष्ट आहे. भारत हा लोकशाही मानणारा देश आहे. धर्मनिरपेक्ष देश आहे. या देशात तुम्ही धर्मनिरपेक्ष आहात का? तुम्ही राष्ट्रवादी आहात का? असे प्रश्न विचारले जाणे हे गंभीर आहे. राष्ट्रीय प्रश्नांची हाताळणी करण्याची पद्धत चुकते आहे का? असा सवाल माजी गृहसचिव माधव गोडबोले यांनी उपस्थित केला.चिनार पब्लिशर्स तसेच सरहदच्या वतीने ‘कारगिल : अनपेक्षित धक्का ते विजय’ या माजी लष्करप्रमुख जनरल वेद प्रकाश मलिक यांच्या प्रशांत तळणीकर यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून वेद प्रकाश मलिक, सरहदचे संस्थापक-अध्यक्ष संजय नहार उपस्थित होते. उद्योजक अभय फिरोदिया अध्यक्षस्थानी होते. गोडबोले म्हणाले, ‘‘भारत ज्या प्रकारे काश्मीरप्रश्न हाताळत आहे, ते पाहून काळजी वाटते. काश्मीरमधील जनता आणि सरकारमध्ये थेट संवादाची गरज आहे. संसदेत काश्मीरमधील जनतेच्या म्हणण्यावर चर्चा होत नाही. इंटरलोक्युटर्सना मंत्र्यांना भेटण्यातही अडचणी येतात. लोकशाही देशात त्यांना म्हणणे मांडण्याची संधी मिळत नाही. तेथील सामान्यांचे म्हणणे सरकारलाच ऐकून घ्यावे लागेल.’’मलिक म्हणाले, ‘‘राष्ट्रीय सुरक्षेला गृहीत धरले जाता कामा नये. आजूबाजूला खूप गोष्टी घडत आहेत. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने तयार असले पाहिजे. संरक्षणक्षेत्राचे बजेट दिवसेंदिवस वाढत आहे. या बजेटची तपासणी कॅग कडून केली जाते. ही तपासणी होण्याबरोबर संरक्षणक्षेत्रातील आपल्या क्षमतेचेही ‘आॅडिट’ झाले पाहिजे. कारगिल युद्धाने देशाला चांगले आणि वाईट धडे दिले. मात्र, त्यानंतरही लष्कर तितकेसे सुसज्ज झालेले नाही. आजकाल ‘हायब्रिड वॉर’ची भीती वाढली आहे. वेगळया प्रकारची युद्धजन्य परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेबाबत लष्कराप्रमाणेच सामान्यांनीही सतर्क राहण्याची गरज आहे. दोन देशांमध्ये सामंजस्य करार होतात; मात्र त्यांची अंमलबजावणी करण्यास अनेक वर्षे लागतात. त्यामुळे लष्करातील त्रुटी दूर होण्यासाठी ठोस पावले उचलली जावीत.’’फिरोदिया म्हणाले, ‘‘पाकिस्तानची लोकशाही फसवी आहे. तो दहशतवादाला प्रोत्साहन देणारा, लष्करातर्फे चालवला जाणारा देश आहे. पाकिस्तान भारतात कधीच शांतता नांदू देणार नाही. त्यामुळे पाकिस्तानला भारताची भीती नव्हे, तर धाक वाटला पाहिजे. त्यासाठी भारताची आर्थिक, सामाजिक आणि सैैन्यसामर्थ्य वाढले पाहिजे.’’जाहिद भट यांनी सूत्रसंचालन केले. शैलेश वाडेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)