शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

दीड हजार कोटींची कामे दिसली तरी कुठे ? मोदींच्या विधानावर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 01:48 IST

मोदींच्या विधानावर चर्चा : कमांड सेंटरचा उपयोग काय?

पुणे : स्मार्ट सिटी कंपनीची पुण्यातील दीड हजार कोटी रुपयांची कामे व कमांड सेंटर पंतप्रधानांना दिसले तरी कुठे? अशी चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंजवडी मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमात केलेल्या विधानानंतर जोरात सुरू झाली आहे. कार्यालयाच्या जागेसाठी धडपडणाऱ्या व महापालिकेला विनंती कराव्या लागणाºया स्मार्ट सिटी योजनेच्या कामकाजाबाबत पुणेकरांमध्ये नाराजी असून, मोदी यांच्या या विधानाने ती अधिक वाढण्याची चिन्हे आहेत.

एका विशिष्ट क्षेत्रातच काम करण्याच्या स्मार्ट सिटीच्या मूळ धोरणाबद्दलच महापालिकेपासून सर्वत्र नाराजी आहे. खुद्द सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारीच स्मार्ट सिटीच्या योजनांबाबत नाराजीने बोलतात. संचालक मंडळाची रचना प्रशासकीय अधिकारी वरचढ राहतील, अशी केली असल्याने तिथे संचालक म्हणून गेलेले महापौर व महापालिकेचे अन्य पदसिद्ध सदस्यही त्रस्त झाले आहेत. प्रशासन त्याला हवे तसे निर्णय घेऊन त्याच पद्धतीने काम करीत आहे. याविरोधात लोकनियुक्त संचालकांना काही करता येणे संख्याबळामुळे अशक्य झाले आहे.औंध-बाणेर-बालेवाडी असे क्षेत्र स्मार्ट सिटीने कामांसाठी म्हणून निश्चित केले आहे. तिथे त्यांनी मॉडेल रस्ता हेच काय ते दिसणारे असे एकमेव काम केले आहे. ब्रेमेन चौक ते परिहार चौक अशा या रस्त्यावर प्रशस्त पदपथ, स्वतंत्र सायकल ट्रॅक, वृद्धांना बसण्यासाठी बाक, वृक्षांना पार, त्याला कट्टा असे बरेच काही या रस्त्यावर केले आहे.उर्वरित कामे झाली आहेत; मात्र थेट नागरिकांना त्याचा तसा काहीच उपयोग नाही. त्यामुळे स्मार्ट सिटी म्हणजे काय? असे शालेय मुलेपुन्हा आपल्या आईबाबांनाविचारू लागली आहेत. सुरुवातीचा काही काळ फ्री असलेली काही वायफाय सेंटर, रस्त्यांवरील प्रमुख चौकांमध्ये लावलेले डिस्प्ले बोर्ड अशी किरकोळ कामेच जास्त झाली आहे.सिंहगड रस्त्यावर सेंटर : डिस्प्ले बोर्डावर प्रबोधनपर निवेदनेमोदी यांनी सांगितलेले कमांड सेंटर स्मार्ट सिटीने सिंहगड रस्त्यावर महापालिकेने बांधलेल्या एका मंडईची जागा ताब्यात घेऊन महापालिकेने हे सेंटर सुरू केले आहे. शहरातील सर्व डिस्प्ले बोर्डांचे नियंत्रण या कमांड सेंटरमधून होणे अपेक्षित आहे. तशी यंत्रणाही तिथे उभी करण्यात आली आहे; मात्र तेवढे एक काम सोडले तर दुसरे तिथे काहीच होत नाही.रस्त्यांवरच्या त्या डिस्प्ले बोर्डांचा त्यावरील प्रबोधनपर निवेदने वाचण्याशिवाय दुसरा काही उपयोग नाही. महापालिकेची जागा विनापरवाना, विनाभाडे वापरली म्हणून त्याबद्दल नगरसेवक नाराज आहेत. कमांड सेंटरमधून भविष्यातील आणखी काही कामांचे नियंत्रण होणार असल्याचे सांगितले जाते; मात्र त्याचे कोणालाच काही वाटत नाही.दीड हजार कोटींची कामे झाली आहेत, असे सांगणाºया मोदींनी निधी तरी तेवढा दिला आहे का याची चौकशी करायला हवी होती, अशी टीका विरोधकांकडून होत आहे. खासगी कंपन्यांचे साह्य घेऊन इंटिग्रेटड ट्रॅफिक अशी एक योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यात वाहनधारकाला त्याच्या मोबाईलवर समोरच्या चौकात किती ट्रॅफिक आहे, कोणत्या बसथांब्यावर कोणती बस कधी येणार आहे, याची माहिती मिळेल. याचेही नियंत्रण त्याच कमांड सेंटरमधून होईल म्हणून सांगण्यात आले आहे.४महापालिकेच्या जागेत स्मार्ट सिटीचे कार्यालय होते. ही जागा भाडेतत्त्वावर देऊन स्मार्ट सिटीचे कार्यालय आता महापालिकेच्या जुन्या इमारतीमध्ये तिसºया मजल्यावर हलवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. महापालिकेशी संबंधित कामे जास्त असल्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीचे कार्यालय महापालिकेतच हवे, असा युक्तिवाद त्यासाठी करण्यात येत आहे.

टॅग्स :Puneपुणेprime ministerपंतप्रधान