शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

दलित, आदिवासींनी कागदपत्रे कुठून आणायची?; अरुणा रॉय यांची सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 06:39 IST

महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार प्रदान सोहळा

पुणे : संविधानाच्या विरोधात सरकार काम करते तेव्हा आवाज उठविल्यानंतर आम्हाला ‘अर्बन नक्षलवादी’ म्हणून हिणवले जाते. आमची ओळख काय ती आम्हीच ठरवू. दुसऱ्यांनी ती ठरविण्याची गरज नाही. एनआरसी, एनपीआर आणि सीएए यामुळे केवळ मुस्लिमच नव्हे तर देशातील गरीब, दलित आणि आदिवासी यांचे काय होणार? त्यांनी कुठून कागदपत्रे आणायची? निर्णय घेण्याची ताकद संसदीय सदस्याच्या हातात देणे हीच लोकशाही आहे का?, असा सवाल माहिती अधिकार कायद्याच्या प्रणेत्या अरुणा रॉय यांनी विचारला आहे.

महाराष्ट्र फांडेशन (अमेरिका) यांच्यावतीने साहित्य व समाजकार्य पुरस्काराचे वितरण रॉय यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. या पुरस्कार सोहळ््यात ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांना दिलीप चित्रे साहित्य जीवनगौरव पुरस्कार, कृ ष्णात खोत यांच्या रिंगण कादंबरीकरिता ग्रंथ पुरस्कार, नितीन रिंढे यांच्या लीळा पुस्तकांच्या याला अपारंपारिक गटातून ग्रंथ पुरस्कार, दत्ता पाटील यांच्या ‘हंडाभर चांदण्या’ या नाटकाला रा. शं. दातार पुरस्कार, केरळ साहित्य परिषदेला डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार, राजेंद्र बहाळकर यांना विशेष कृतज्ञता पुरस्कार, शहाजी गडहिरे यांना कार्यकर्ता पुरस्कार, जमिलाबेगम पठाण यांना मोहिनी केळकर स्मृती कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

व्यासपीठावर महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्काराचे प्रवर्तक सुनील देशमुख, महाराष्ट्र फाउंडेशनचे अध्यक्ष राजीव भालेराव उपस्थित होते.रॉय म्हणाल्या, देश सध्या नाजुक स्थितीत आहे. युवा पिढीकडून आपल्याला आता प्रेरणा घ्यावी लागत आहे. एनसीआर, सीएए हे आम्हाला नको आहे. प्रास्ताविक डॉ. मनीषा गुप्ते यांनी केले. सूत्रसंचालन विनोद शिरसाठ यांनी केले. हमीद दाभोलकर यांनी आभार मानले.महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका) यांच्यावतीने साहित्य व समाजकार्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी डावीकडून डॉ.मनीषा गुप्ते, विनोद शिरसाठ, दत्ता पाटील, कृष्णात खोत, नितीन रिंढे, वसंत आबाजी डहाके, अरुणा रॉय, ए.पी.मुरलीधरन, सुनील देशमुख, शहाजी गडहिरे, जमीलाबेगम पठाण इताकुला आणि राजेंद्र बहाळकर यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.काळोख असला तरी दिवट्या पेटत असतातजो पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल आनंद व्यक्त करावा, असे पोषक वातावरण नाही. धर्मसत्तेचे राजसत्तेवर आणि राजसत्तेचे अर्थसत्तेवर आक्रमण होते त्यावेळी परवड होते. जगण्याचा व स्वत:चा शोध सारखे प्रश्न गंभीर बनले आहेत. घनदाट काळोख असला तरी दिवट्या पेटत असतात, अशा शब्दांत डहाके यांनी भावना व्यक्त केल्या.

 

टॅग्स :Dalit assaultदलितांना मारहाणMuslimमुस्लीम