शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

दलित, आदिवासींनी कागदपत्रे कुठून आणायची?; अरुणा रॉय यांची सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 06:39 IST

महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार प्रदान सोहळा

पुणे : संविधानाच्या विरोधात सरकार काम करते तेव्हा आवाज उठविल्यानंतर आम्हाला ‘अर्बन नक्षलवादी’ म्हणून हिणवले जाते. आमची ओळख काय ती आम्हीच ठरवू. दुसऱ्यांनी ती ठरविण्याची गरज नाही. एनआरसी, एनपीआर आणि सीएए यामुळे केवळ मुस्लिमच नव्हे तर देशातील गरीब, दलित आणि आदिवासी यांचे काय होणार? त्यांनी कुठून कागदपत्रे आणायची? निर्णय घेण्याची ताकद संसदीय सदस्याच्या हातात देणे हीच लोकशाही आहे का?, असा सवाल माहिती अधिकार कायद्याच्या प्रणेत्या अरुणा रॉय यांनी विचारला आहे.

महाराष्ट्र फांडेशन (अमेरिका) यांच्यावतीने साहित्य व समाजकार्य पुरस्काराचे वितरण रॉय यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. या पुरस्कार सोहळ््यात ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांना दिलीप चित्रे साहित्य जीवनगौरव पुरस्कार, कृ ष्णात खोत यांच्या रिंगण कादंबरीकरिता ग्रंथ पुरस्कार, नितीन रिंढे यांच्या लीळा पुस्तकांच्या याला अपारंपारिक गटातून ग्रंथ पुरस्कार, दत्ता पाटील यांच्या ‘हंडाभर चांदण्या’ या नाटकाला रा. शं. दातार पुरस्कार, केरळ साहित्य परिषदेला डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार, राजेंद्र बहाळकर यांना विशेष कृतज्ञता पुरस्कार, शहाजी गडहिरे यांना कार्यकर्ता पुरस्कार, जमिलाबेगम पठाण यांना मोहिनी केळकर स्मृती कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

व्यासपीठावर महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्काराचे प्रवर्तक सुनील देशमुख, महाराष्ट्र फाउंडेशनचे अध्यक्ष राजीव भालेराव उपस्थित होते.रॉय म्हणाल्या, देश सध्या नाजुक स्थितीत आहे. युवा पिढीकडून आपल्याला आता प्रेरणा घ्यावी लागत आहे. एनसीआर, सीएए हे आम्हाला नको आहे. प्रास्ताविक डॉ. मनीषा गुप्ते यांनी केले. सूत्रसंचालन विनोद शिरसाठ यांनी केले. हमीद दाभोलकर यांनी आभार मानले.महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका) यांच्यावतीने साहित्य व समाजकार्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी डावीकडून डॉ.मनीषा गुप्ते, विनोद शिरसाठ, दत्ता पाटील, कृष्णात खोत, नितीन रिंढे, वसंत आबाजी डहाके, अरुणा रॉय, ए.पी.मुरलीधरन, सुनील देशमुख, शहाजी गडहिरे, जमीलाबेगम पठाण इताकुला आणि राजेंद्र बहाळकर यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.काळोख असला तरी दिवट्या पेटत असतातजो पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल आनंद व्यक्त करावा, असे पोषक वातावरण नाही. धर्मसत्तेचे राजसत्तेवर आणि राजसत्तेचे अर्थसत्तेवर आक्रमण होते त्यावेळी परवड होते. जगण्याचा व स्वत:चा शोध सारखे प्रश्न गंभीर बनले आहेत. घनदाट काळोख असला तरी दिवट्या पेटत असतात, अशा शब्दांत डहाके यांनी भावना व्यक्त केल्या.

 

टॅग्स :Dalit assaultदलितांना मारहाणMuslimमुस्लीम