शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हे आता दिसतंय - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 20:20 IST

केंद्र सरकार निष्क्रिय आहे. महागाईमुळे जनता त्रासली आहे. नोटाबंदीपासून ते जीएसटी पर्यंत केंद्राचा एकही निर्णय जनहिताचा ठरलेला नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली

ठळक मुद्देनोटाबंदीपासून ते जीएसटी पर्यंत केंद्राचा एकही निर्णय जनहिताचा ठरलेला नाही अशी टीका शरद पवार यांनी केलीसमविचारी पक्षांनी एकत्र येऊन केंद्र सरकारला पर्याय दिला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलंमहाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे हे दिसतंय असा टोला शरद पवारांनी राज्य सरकारला यावेळी लगावला

पुणे - केंद्र सरकार निष्क्रिय आहे. महागाईमुळे जनता त्रासली आहे. नोटाबंदीपासून ते जीएसटी पर्यंत केंद्राचा एकही निर्णय जनहिताचा ठरलेला नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. समविचारी पक्षांनी एकत्र येऊन केंद्र सरकारला पर्याय दिला पाहिजे असंही ते बोलले आहेत. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असं तीन वर्षांपुर्वी विचारत होते, मात्र आता महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे हे दिसतंय असा टोला शरद पवारांनी राज्य सरकारला लगावला.

काही कार्यक्रमांसाठी म्हणून पवार दोन दिवस पुण्यात मुक्कामी आहेत. शिवदर्शन येथील लक्ष्मीमाता मंदीरातील कार्यक्रमानंतर शनिवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना शरद पवार बोलले की, 'नोटाबंदीने जनता होरपळली आहे. लहान व्यावसायिक मंदीमुळे कंटाळले आहेत. यापुर्वी कधीही अशी स्थिती नव्हती. त्रासलेल्या जनतेला दिलासा देण्याची गरज आहे. केंद्र सरकार ते करायला तयार नाही'.  

'सरकारला महाईगाईवर नियंत्रण ठेवला आलेले नाही. त्यांचा प्रत्येक निर्णय जनतेला आगीत टाकणारा ठरला आहे. पेट्रोल, डिझेल यांची भाववाढ थांबवणे सरकारला शक्य होते, मात्र त्यांनी ते केलेले नाही. आता सगळ्या निर्णयामागचे गणित जनतेलाही कळते.  महागाईमुळे सामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. त्याचा विचार करून सरकारी निर्णय झाले पाहिजेत, मात्र तसे दिसत नाही. अशा वेळी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. तसे केले तरच चांगला पर्याय निर्माण होऊ शकतो', असे मत पवार यांनी व्यक्त केले. 

राष्ट्रवादी काँग्रेसची याचसाठी एक बैठक ३ ऑक्टोबर रोजी मुंबईत ठेवली आहे. पक्षाचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी बैठकीला उपस्थित असतील. त्यात देशातील, राज्यातील सध्याच्या स्थितीवर विचार करण्यात येईल असे पवार यांनी सांगितले.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBJPभाजपा