शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हे आता दिसतंय - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 20:20 IST

केंद्र सरकार निष्क्रिय आहे. महागाईमुळे जनता त्रासली आहे. नोटाबंदीपासून ते जीएसटी पर्यंत केंद्राचा एकही निर्णय जनहिताचा ठरलेला नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली

ठळक मुद्देनोटाबंदीपासून ते जीएसटी पर्यंत केंद्राचा एकही निर्णय जनहिताचा ठरलेला नाही अशी टीका शरद पवार यांनी केलीसमविचारी पक्षांनी एकत्र येऊन केंद्र सरकारला पर्याय दिला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलंमहाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे हे दिसतंय असा टोला शरद पवारांनी राज्य सरकारला यावेळी लगावला

पुणे - केंद्र सरकार निष्क्रिय आहे. महागाईमुळे जनता त्रासली आहे. नोटाबंदीपासून ते जीएसटी पर्यंत केंद्राचा एकही निर्णय जनहिताचा ठरलेला नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. समविचारी पक्षांनी एकत्र येऊन केंद्र सरकारला पर्याय दिला पाहिजे असंही ते बोलले आहेत. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असं तीन वर्षांपुर्वी विचारत होते, मात्र आता महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे हे दिसतंय असा टोला शरद पवारांनी राज्य सरकारला लगावला.

काही कार्यक्रमांसाठी म्हणून पवार दोन दिवस पुण्यात मुक्कामी आहेत. शिवदर्शन येथील लक्ष्मीमाता मंदीरातील कार्यक्रमानंतर शनिवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना शरद पवार बोलले की, 'नोटाबंदीने जनता होरपळली आहे. लहान व्यावसायिक मंदीमुळे कंटाळले आहेत. यापुर्वी कधीही अशी स्थिती नव्हती. त्रासलेल्या जनतेला दिलासा देण्याची गरज आहे. केंद्र सरकार ते करायला तयार नाही'.  

'सरकारला महाईगाईवर नियंत्रण ठेवला आलेले नाही. त्यांचा प्रत्येक निर्णय जनतेला आगीत टाकणारा ठरला आहे. पेट्रोल, डिझेल यांची भाववाढ थांबवणे सरकारला शक्य होते, मात्र त्यांनी ते केलेले नाही. आता सगळ्या निर्णयामागचे गणित जनतेलाही कळते.  महागाईमुळे सामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. त्याचा विचार करून सरकारी निर्णय झाले पाहिजेत, मात्र तसे दिसत नाही. अशा वेळी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. तसे केले तरच चांगला पर्याय निर्माण होऊ शकतो', असे मत पवार यांनी व्यक्त केले. 

राष्ट्रवादी काँग्रेसची याचसाठी एक बैठक ३ ऑक्टोबर रोजी मुंबईत ठेवली आहे. पक्षाचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी बैठकीला उपस्थित असतील. त्यात देशातील, राज्यातील सध्याच्या स्थितीवर विचार करण्यात येईल असे पवार यांनी सांगितले.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBJPभाजपा